शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
7
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
8
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
9
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
10
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
11
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
12
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
13
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
14
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
15
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
17
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
18
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
19
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
20
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी

नाफेडकडून होणार केवळ एकरी बारा क्विंटल मक्याची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 00:01 IST

सायखेडा : व्यापारी वर्गाकडून भरड्या मालातील मक्याला कवडीमोल किंमत मिळत असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने नाफेडच्या माध्यमातून एकरी बारा क्विंटल मका खरेदीला परवानगी दिली आहे. तथापि, उर्वरित मक्याचे काय करायचे असा संतप्त सवाल उत्पादकांनी विचारला आहे.

सायखेडा : (बाजीराव कमानकर) व्यापारी वर्गाकडून भरड्या मालातील मक्याला कवडीमोल किंमत मिळत असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने नाफेडच्या माध्यमातून एकरी बारा क्विंटल मका खरेदीला परवानगी दिली आहे. तथापि, उर्वरित मक्याचे काय करायचे असा संतप्त सवाल उत्पादकांनी विचारला आहे.या संदर्भात बाजार समित्यांना पत्र प्राप्त झाले असून, निफाड खरेदी विक्री संघ लासलगाव बाजार समितीत १७६० रुपये दराने मका खरेदी करणार आहे. मका खरेदी करताना एका शेतकºयाची एकरी अवघी १२ क्विंटल मका खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे उर्वरित मकाचे करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिला उभा राहिला आहे.केंद्र शासन आणि राज्य शासन शेतमालाचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी सातत्याने घोषणा करीत आहे. यासाठी योग्य प्रकारे उपाययोजना केल्या जात आहेत. शासन एकीकडे उत्पादन दुप्पट करण्याच्या उपाययोजना राबविताना दिसते तर दुसरीकडे केवळ १२ क्विंटल मका खरेदी करीत आहे. शेतकºयांना एकरी साधारणत: ४० क्विंटल मक्याचे उत्पादन होत असते. बारा क्विंटल शासन खरेदी करणार असेल तर २८ क्विंटल मक्याचे करायचे काय? असा प्रश्न शेतकºयात उपस्थित होत आहे. शासन स्वत: इतकी कमी खरेदी करून उत्पादन दुप्पट करण्याच्या धोरणाला हरताळ फासण्याचे काम करीत आहे.बाजार समित्यांमध्ये केवळ बाराशे ते तेराशे रुपये दर शेतकºयांना मिळत आहे. त्यांना कष्टाचे फळ मिळत नसल्याने फेडरेशनद्वारे मका खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतला, मात्र एकरी १२ क्विंटल मका खरेदी करणार असल्याने उर्वरित २८ क्विंटल मक्याचे करायचे काय असा प्रश्न शेतकºयांना सतावत आहे; शासनाचे उत्पादनवाढीचे उद्दिष्ट दुप्पट असल्याने उत्पादन दुप्पट झाले आहे. अशा परिस्थितीत शासनाने सर्व मका खरेदी करावा अशी जोरदार मागणी होत आहे.-----------------------------------पोल्ट्री व्यवसाय धोक्यातरब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड केली जाते. शेतकºयांना चांगले उत्पादन मिळते. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला आणि त्याचा परिणाम मक्याच्या बाजारभावावर झाला. त्यांचे प्रमुख खाद्य असणारा मका कवडीमोल दरात विकला जाऊ लागला.-------------------------------शासन एकीकडे शेतकºयांचे उत्पादन दुप्पट होण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे मक्याचे उत्पादन दुप्पट झाले. एकरी किमान ४० क्विंटल मक्याचे उत्पादन शेतात मिळते. शासन मात्र अवघे बारा क्विंटल मका खरेदी करणार आहे. उरणारा २८क्विंटल मका विकायचा कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने एकरी ४० क्विंटल मका खरेदी करण्याचे आदेश फेडरेशनला देऊन शेतकºयांना दिलासा द्यावा.- विकास रायते, मका उत्पादक शेतकरी,खडक माळेगाव

टॅग्स :Nashikनाशिक