शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

लॉकडाउनमध्येही जुळताय आॅनलाइन रेशीमगाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 23:52 IST

पेठ : कोरोनासारखा संसर्गजन्य आजार आणि त्यामुळे सर्व जगच थबकले असताना आयुष्याचा जोडीदार शोधणाऱ्या भावी वधू-वरांच्या रेशीमगाठी कशा जुळणार, या विवंचनेत असलेल्या पालकांना दिलासा मिळाला आहे. नाशिकच्या एका संस्थेच्या वतीने प्रथमच आॅनलाइन वधू-वर सूचक मेळावा आयोजित करून याही समस्येवर उपाय शोधून काढला आहे.

पेठ : (रामदास शिंदे ) कोरोनासारखा संसर्गजन्य आजार आणि त्यामुळे सर्व जगच थबकले असताना आयुष्याचा जोडीदार शोधणाऱ्या भावी वधू-वरांच्या रेशीमगाठी कशा जुळणार, या विवंचनेत असलेल्या पालकांना दिलासा मिळाला आहे. नाशिकच्या एका संस्थेच्या वतीने प्रथमच आॅनलाइन वधू-वर सूचक मेळावा आयोजित करून याही समस्येवर उपाय शोधून काढला आहे.लग्न जमविण्यासाठी आता अनेक पद्धती अवलंबिल्या जातात. गेल्या काही वर्षात वेबसाइट, वधू-वर परिचय मेळावा, माहिती पुस्तिका या माध्यमातून अनेकांना आपला योग्य जीवनसाथी मिळाला आहे. लग्न जमविण्यासाठी अनेक संस्था आता विविध शहरात स्थापन झाल्या आहेत. या सर्व आधुनिक माध्यमातून टेक्नोसॅव्ही अ‍ॅपच्या माध्यमातून लॉकडाउनच्या काळातदेखील मराठा समाज वधू-वर परिचय मेळावा पार पडला.सध्या आपण कोरोनासारख्या गंभीर समस्येला तोंड देत आहोत. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळ्या जगाची दिशा बदलली असून, दशा झाली आहे. संपूर्ण जग या महामारीचा सामना करीत आहे. सगळ्यांनी एक वास्तव स्वीकारले आहे ते म्हणजे यापुढे आपल्या कोरोना सोबतच जगावे लागेल. दोन महिन्यांपासून आपण घरात शांत आहोत. मात्र, यापुढे जगायचं असेल, प्रगती करायची असेल, काही साध्य करायचे असेल तर शांत राहून चालणार नाही. लॉकडाउन चालू झाले तरीही मल्टिनॅशनल कंपन्यांनी आपले काम थांबविले नाही. त्यांनी मार्ग काढला आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले. कंपन्यांचा हा फंडा यशस्वीही झाला. यापुढे आपल्यालाही असाच विचार करावा लागेल. कारण वेळ कोणासाठी थांबत नसते हा नियम तर आपल्या बाबतीत अधिकच लागू होतो. कारण वधू-वरांचे वय हे न थांबणारे आहे आणि जर वय वाढत गेले तर पुढील स्थळांचे पर्याय दिवसेंदिवस कमी होत जातात. आधीच हातातले दोन महिने वाया गेले आहेत. मग आपण का थांबायचे? यासाठी काळाची पाऊले ओळखून आॅनलाइन वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला होता. घरात बसून वधू-वरांनी अ‍ॅपच्या माध्यमातून आपला परिचय करून दिला.-----------------खर्चिक लग्नपद्धतीला ब्रेककोरोनामुळे सर्वच थांबलेलं असताना अनेकांना आपली लग्न पुढे ढकलावी लागली तर काहींनी मोठ्या लग्नाला फाटा देत कुटुंबीयांच्या उपस्थितीत घरातच लग्नाला पसंती दिली. काहींनी तर आॅनलाइन वधू-वरांना पसंत करत साखरपुडादेखील आॅनलाइन केल्याच्या बातम्या आपण बघितल्या. या हायटेक लग्नपद्धतीला राजकीय मंडळीदेखील अपवाद राहिली नाही. यामुळे अनेक प्रथांंना फाटा देत खर्चाचीही बचत होत असल्याचे वधू-वर पित्यांनी समाधान व्यक्त केले आहे.--------------संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत २५०० विवाह जमले असून, लॉकडाउनमध्येदेखील साध्या विवाहांना लोक पसंती देत आहेत. आॅनलाइन मेळाव्याचा हा समाजातील पहिलाच प्रयोग होता. वधू-वरांसोबतच पालकदेखील टेक्नोसॅव्ही झाल्याचे या माध्यमातून बघायला मिळाले.- हेमंत पगार, संचालक,वधू-वर मेळावा संस्था

टॅग्स :Nashikनाशिक