शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

लॉकडाउनमध्येही जुळताय आॅनलाइन रेशीमगाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 23:52 IST

पेठ : कोरोनासारखा संसर्गजन्य आजार आणि त्यामुळे सर्व जगच थबकले असताना आयुष्याचा जोडीदार शोधणाऱ्या भावी वधू-वरांच्या रेशीमगाठी कशा जुळणार, या विवंचनेत असलेल्या पालकांना दिलासा मिळाला आहे. नाशिकच्या एका संस्थेच्या वतीने प्रथमच आॅनलाइन वधू-वर सूचक मेळावा आयोजित करून याही समस्येवर उपाय शोधून काढला आहे.

पेठ : (रामदास शिंदे ) कोरोनासारखा संसर्गजन्य आजार आणि त्यामुळे सर्व जगच थबकले असताना आयुष्याचा जोडीदार शोधणाऱ्या भावी वधू-वरांच्या रेशीमगाठी कशा जुळणार, या विवंचनेत असलेल्या पालकांना दिलासा मिळाला आहे. नाशिकच्या एका संस्थेच्या वतीने प्रथमच आॅनलाइन वधू-वर सूचक मेळावा आयोजित करून याही समस्येवर उपाय शोधून काढला आहे.लग्न जमविण्यासाठी आता अनेक पद्धती अवलंबिल्या जातात. गेल्या काही वर्षात वेबसाइट, वधू-वर परिचय मेळावा, माहिती पुस्तिका या माध्यमातून अनेकांना आपला योग्य जीवनसाथी मिळाला आहे. लग्न जमविण्यासाठी अनेक संस्था आता विविध शहरात स्थापन झाल्या आहेत. या सर्व आधुनिक माध्यमातून टेक्नोसॅव्ही अ‍ॅपच्या माध्यमातून लॉकडाउनच्या काळातदेखील मराठा समाज वधू-वर परिचय मेळावा पार पडला.सध्या आपण कोरोनासारख्या गंभीर समस्येला तोंड देत आहोत. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळ्या जगाची दिशा बदलली असून, दशा झाली आहे. संपूर्ण जग या महामारीचा सामना करीत आहे. सगळ्यांनी एक वास्तव स्वीकारले आहे ते म्हणजे यापुढे आपल्या कोरोना सोबतच जगावे लागेल. दोन महिन्यांपासून आपण घरात शांत आहोत. मात्र, यापुढे जगायचं असेल, प्रगती करायची असेल, काही साध्य करायचे असेल तर शांत राहून चालणार नाही. लॉकडाउन चालू झाले तरीही मल्टिनॅशनल कंपन्यांनी आपले काम थांबविले नाही. त्यांनी मार्ग काढला आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले. कंपन्यांचा हा फंडा यशस्वीही झाला. यापुढे आपल्यालाही असाच विचार करावा लागेल. कारण वेळ कोणासाठी थांबत नसते हा नियम तर आपल्या बाबतीत अधिकच लागू होतो. कारण वधू-वरांचे वय हे न थांबणारे आहे आणि जर वय वाढत गेले तर पुढील स्थळांचे पर्याय दिवसेंदिवस कमी होत जातात. आधीच हातातले दोन महिने वाया गेले आहेत. मग आपण का थांबायचे? यासाठी काळाची पाऊले ओळखून आॅनलाइन वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला होता. घरात बसून वधू-वरांनी अ‍ॅपच्या माध्यमातून आपला परिचय करून दिला.-----------------खर्चिक लग्नपद्धतीला ब्रेककोरोनामुळे सर्वच थांबलेलं असताना अनेकांना आपली लग्न पुढे ढकलावी लागली तर काहींनी मोठ्या लग्नाला फाटा देत कुटुंबीयांच्या उपस्थितीत घरातच लग्नाला पसंती दिली. काहींनी तर आॅनलाइन वधू-वरांना पसंत करत साखरपुडादेखील आॅनलाइन केल्याच्या बातम्या आपण बघितल्या. या हायटेक लग्नपद्धतीला राजकीय मंडळीदेखील अपवाद राहिली नाही. यामुळे अनेक प्रथांंना फाटा देत खर्चाचीही बचत होत असल्याचे वधू-वर पित्यांनी समाधान व्यक्त केले आहे.--------------संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत २५०० विवाह जमले असून, लॉकडाउनमध्येदेखील साध्या विवाहांना लोक पसंती देत आहेत. आॅनलाइन मेळाव्याचा हा समाजातील पहिलाच प्रयोग होता. वधू-वरांसोबतच पालकदेखील टेक्नोसॅव्ही झाल्याचे या माध्यमातून बघायला मिळाले.- हेमंत पगार, संचालक,वधू-वर मेळावा संस्था

टॅग्स :Nashikनाशिक