शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

वादळी पावसामुळे कांद्याचे शेड जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 01:38 IST

शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने सोमवारी जोरदार हजेरी लावली. दुपारी झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे कळवण खुर्द शिवारातील कांदा व्यापारी योगेश शिंदे यांचे कांद्याचे २ शेड जमीनदोस्त झाल्याने शेडमधील कांद्याचे व शेडचे असे एकूण १५ लाख रु पयांचे नुकसान झाले.

कळवण : शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने सोमवारी जोरदार हजेरी लावली. दुपारी झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे कळवण खुर्द शिवारातील कांदा व्यापारी योगेश शिंदे यांचे कांद्याचे २ शेड जमीनदोस्त झाल्याने शेडमधील कांद्याचे व शेडचे असे एकूण १५ लाख रु पयांचे नुकसान झाले. तसेच भेंडी येथील मराठी शाळेचे पत्रे उडून गेल्याने शाळेचे नुकसान झाले आहे.  सोमवारी दुपारी कळवण शहरासह तालुक्यातील विविध भागात वादळी वाºयासह पावसाने जोरदार हजेरी लावली. कळवण खुर्द येथील कांदा व्यापारी योगेश शिंदे यांचे कांदा साठवणीचे दोन शेड जमीनदोस्त झाले. दोन्ही शेडमध्ये साठवून ठेवलेला १६०० क्विंटल कांदा पावसात भिजून जवळपास १५ लाख रु पयांचे नुकसान झाले. गेल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे बोरदैवत परिसरातील शेकडो घरांची पडझड होऊन घरांवरील पत्रे उडाले होते. तर काही घरांच्या भिंती पडल्यामुळे नुकसान झाले होते. शिवाय घरातील अन्नधान्याचे नुकसान झाले होते. सोमवारी झालेल्या वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे महसूल प्रशासनाने पंचनामे करून शासनस्तरावरून तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी तहसीलदार कैलास चावडे यांच्याकडे केली आहे. तहसीलदार चावडे यांनी मंडल अधिकारी व तलाठी यांना नुकसानीबाबत पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.जुनी बेज परिसरात पाऊसपिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोससह जुनी बेज, नवी बेज, भादवण, विसापूर, गांगवण आदी परिसरात सोमवारी (दि. १८) सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाºयासह पाऊस झाला. यात जुनी बेज येथील शेतकरी बाजीराव एकनाथ धनवटे यांच्या गांगवण शिवारातील कांदाचाळीचे पत्रे उडून गेल्याने साठवून ठेवलेला २० ट्रॉली कांदा पावसात पूर्णत: भिजल्याने धनवटे यांचे मोठे नुकसान झाले आहे.  परिसरात पहिल्याच पावसाने दाणादाण उडवली आहे. अर्धा तास झालेल्या या पावसात पाऊस कमी आणि वारा अधिक असल्याने कांदा चाळीचे पत्रे उडाले, तर काही ठिकाणची झाडे उन्मळून पडली आहेत. वादळी वाºयासह होणाºया पावसामुळे दरवर्षी शेतकºयांचे मोठे नुकसान होत असते. मात्र शासनाकडून पंचनामे होऊनही भरपाई मिळत नसल्याची तक्रार नंदकिशोर बच्छाव, सचिन पाटील, शीतलकुमार अहेर, संदीप पाटील, विवेक बच्छाव, दौलत बच्छाव, चिंतामन बच्छाव यांसह परिसरातील कांदा उत्पादक शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस