शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसामुळे कांद्याचे शेड जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 01:38 IST

शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने सोमवारी जोरदार हजेरी लावली. दुपारी झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे कळवण खुर्द शिवारातील कांदा व्यापारी योगेश शिंदे यांचे कांद्याचे २ शेड जमीनदोस्त झाल्याने शेडमधील कांद्याचे व शेडचे असे एकूण १५ लाख रु पयांचे नुकसान झाले.

कळवण : शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने सोमवारी जोरदार हजेरी लावली. दुपारी झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे कळवण खुर्द शिवारातील कांदा व्यापारी योगेश शिंदे यांचे कांद्याचे २ शेड जमीनदोस्त झाल्याने शेडमधील कांद्याचे व शेडचे असे एकूण १५ लाख रु पयांचे नुकसान झाले. तसेच भेंडी येथील मराठी शाळेचे पत्रे उडून गेल्याने शाळेचे नुकसान झाले आहे.  सोमवारी दुपारी कळवण शहरासह तालुक्यातील विविध भागात वादळी वाºयासह पावसाने जोरदार हजेरी लावली. कळवण खुर्द येथील कांदा व्यापारी योगेश शिंदे यांचे कांदा साठवणीचे दोन शेड जमीनदोस्त झाले. दोन्ही शेडमध्ये साठवून ठेवलेला १६०० क्विंटल कांदा पावसात भिजून जवळपास १५ लाख रु पयांचे नुकसान झाले. गेल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे बोरदैवत परिसरातील शेकडो घरांची पडझड होऊन घरांवरील पत्रे उडाले होते. तर काही घरांच्या भिंती पडल्यामुळे नुकसान झाले होते. शिवाय घरातील अन्नधान्याचे नुकसान झाले होते. सोमवारी झालेल्या वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे महसूल प्रशासनाने पंचनामे करून शासनस्तरावरून तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी तहसीलदार कैलास चावडे यांच्याकडे केली आहे. तहसीलदार चावडे यांनी मंडल अधिकारी व तलाठी यांना नुकसानीबाबत पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.जुनी बेज परिसरात पाऊसपिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोससह जुनी बेज, नवी बेज, भादवण, विसापूर, गांगवण आदी परिसरात सोमवारी (दि. १८) सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाºयासह पाऊस झाला. यात जुनी बेज येथील शेतकरी बाजीराव एकनाथ धनवटे यांच्या गांगवण शिवारातील कांदाचाळीचे पत्रे उडून गेल्याने साठवून ठेवलेला २० ट्रॉली कांदा पावसात पूर्णत: भिजल्याने धनवटे यांचे मोठे नुकसान झाले आहे.  परिसरात पहिल्याच पावसाने दाणादाण उडवली आहे. अर्धा तास झालेल्या या पावसात पाऊस कमी आणि वारा अधिक असल्याने कांदा चाळीचे पत्रे उडाले, तर काही ठिकाणची झाडे उन्मळून पडली आहेत. वादळी वाºयासह होणाºया पावसामुळे दरवर्षी शेतकºयांचे मोठे नुकसान होत असते. मात्र शासनाकडून पंचनामे होऊनही भरपाई मिळत नसल्याची तक्रार नंदकिशोर बच्छाव, सचिन पाटील, शीतलकुमार अहेर, संदीप पाटील, विवेक बच्छाव, दौलत बच्छाव, चिंतामन बच्छाव यांसह परिसरातील कांदा उत्पादक शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस