शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

जिल्ह्यात कांदा प्रश्न गंभीर; लिलाव प्रक्रिया बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 02:04 IST

कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात तसेच साठवणुकीवर मर्यादा आणल्याचा परिणाम जिल्ह्णातील कांदा लिलावावर झाला आहे. सोमवारी (दि.३०) बाजार समित्यांमध्ये लिलावप्रक्रिया न झाल्यामुळे व्यवहार ठप्प झाले, तर संतप्त शेतकरीही रस्त्यावर उतरल्याने कांद्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

नाशिक : कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात तसेच साठवणुकीवर मर्यादा आणल्याचा परिणाम जिल्ह्णातील कांदा लिलावावर झाला आहे. सोमवारी (दि.३०) बाजार समित्यांमध्ये लिलावप्रक्रिया न झाल्यामुळे व्यवहार ठप्प झाले, तर संतप्त शेतकरीही रस्त्यावर उतरल्याने कांद्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याप्रकरणावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सायंकाळी झालेल्या बैठकीनंतर व्यापाऱ्यांनी लिलावप्रक्रिया सुरू ठेवण्यास सहमती दर्शविल्याने मंगळवारपासून लिलावप्रक्रिया सुरळीत होण्याचीदेखील शक्यता आहे.देशात झालेल्या पावसामुळे कांदा उत्पादकांचे नुकसान झाल्याने कांदा आवक कमी होऊन कांद्याचे भाव गगनाला भिडले. (पान ६ वर)यावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी तसेच कांदा साठवणुकीवरदेखील नियंत्रण आणले आहे. मात्र व्यापाºयांनी केंद्राच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करीत कांदा साठवणुकीचा निर्णय अन्यायकारक असल्याची भूमिका घेत सोमवारी कांद्याचे लिलावच केले नाही. याचे पडसाद जिल्ह्णात अनेक ठिकाणी उमटले. दरम्यान, निर्यातबंदी उठविण्याची शेतकºयांची मागणी असल्याने सरकारच्या या निर्णयावर शेतकºयांनी लिलाव बंद पाडले यात व्यापाºयांचा हस्तक्षेप नव्हता असे व्यापाºयांनी स्पष्ट केले आहे.ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच जिल्ह्णात कांद्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे याचे पडसाद निवडणुकीत उमटण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकाºयांनी हस्तक्षेप करीत कांदा व्यापाºयांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी पाचारण करून याप्रकरणातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान,देशातील कांद्याच्या वाढत्या भावाचे कारणे जाणून घेण्यासाठी केंद्राचे पथक मागील आठवड्यात जिल्हा दौºयावर आले होते. या दौºयात त्यांना शेतकरी आणि व्यापाºयांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. कांद्याचे भाव पडल्यानंतर केंद्राची समिती जाते कुठे असा सवाल करून शेतकºयांनी समितीलाच धारेवर धरले होते.जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या दालनात सोमवारी (दि.३०) सायंकाळी व्यापारी सोहनलाल भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली कांदा व्यापाºयांनी आपले म्हणणे मांडले. केंद्राच्या निर्णयानुसार होलसेल व्यापारी ५०० क्ंिवटल, तर रिटेल व्यापाºयांनी १०० क्विंटलपेक्षा जास्त कांदा साठवणुकीवर निर्बंध असून, त्यापेक्षा अधिक कांदा आढळून आल्यास व्यापाºयांवर कारवाई होणार आहे. व्यापाºयांकडे चाळीमध्ये दीडशे ते दोनशे क्विंटल कांदा असल्याने नवीन लिलाव करून आणखीच अडचण येण्याची शक्यता असल्याची बाब व्यापाºयांनी जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली. व्यापाºयांकडे असलेला पूर्वीचा कांदा बाहेर काढण्यासाठी काही दिवसांचा अवधी मिळावा, लागलीच कारवाई करू नये, अशी मागणी व्यापाºयांनी बैठकीत केली आहे.व्यापाºयांनी लिलावप्रक्रिया सुरू करण्यास हरकत नसल्याचे सांगून यापूर्वी असलेला कांदा बाहेर काढण्यासाठी काही दिवसांचा अवधी मिळावा, अशी मागणी केलेली आहे. सरकारने कांद्या संदर्भात घेतलेल्या इतर निर्णयाबाबत व्यापाºयांचे काहीही म्हणणे नाहीत. त्यांचे लेखी म्हणणे आपण मागविले असून, त्यांच्या भावना शासनाला कळविल्या जातील. यातून तत्काळ मार्ग काढला जाईल.-सूरज मांढरे, जिल्हाधिकारीव्यापाºयांनी लिलावप्रक्रिया सुरू करण्यास हरकत नसल्याचे सांगून यापूर्वी असलेला कांदा बाहेर काढण्यासाठी काही दिवसांचा अवधी मिळावा, अशी मागणी केलेली आहे. सरकारने कांद्या संदर्भात घेतलेल्या इतर निर्णयाबाबत व्यापाºयांचे काहीही म्हणणे नाहीत. त्यांचे लेखी म्हणणे आपण मागविले असून, त्यांच्या भावना शासनाला कळविल्या जातील. यातून तत्काळ मार्ग काढला जाईल.-सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

टॅग्स :onionकांदाMarketबाजारcollectorजिल्हाधिकारी