शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

कांदा भाववाढीचा केंद्राने मागविला अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:18 IST

गेल्या महिन्यापासून कांद्याचे चढे दर पाहता नजीकच्या काळात त्यात वाढ होण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकार धास्तावले असून, खुल्या बाजारात ४० रुपयांपर्यंत दर पोहोचल्यामुळे या दरवाढीचे कारण शोधण्यास सरकारने सुरुवात केली आहे. शेतकरी वा व्यापाºयांकडून कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण करून भाववाढ केली जात असल्याचा दाट संशय सरकारला वाटू लागल्याने त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी जिल्हाधिकाºयांकडून अहवाल मागविण्यात आला आहे.

नाशिक : गेल्या महिन्यापासून कांद्याचे चढे दर पाहता नजीकच्या काळात त्यात वाढ होण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकार धास्तावले असून, खुल्या बाजारात ४० रुपयांपर्यंत दर पोहोचल्यामुळे या दरवाढीचे कारण शोधण्यास सरकारने सुरुवात केली आहे. शेतकरी वा व्यापाºयांकडून कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण करून भाववाढ केली जात असल्याचा दाट संशय सरकारला वाटू लागल्याने त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी जिल्हाधिकाºयांकडून अहवाल मागविण्यात आला आहे.गेल्या महिन्यातच केंद्रीय खाद्य मंत्रालयाच्या उपसचिवांच्या पथकाने नाशिकला भेट देऊन कांद्याच्या बाजारपेठेची माहिती करून घेतली. बाजार समित्यांमध्ये दररोज होणारी कांद्याची आवक, लिलावाचे ठरणारे दर व व्यापाºयांकडून विक्रीसाठी पाठविल्या जाणाºया कांद्याचे प्रमाण याची माहितीही या पथकाने घेतली तसेच लिलावाची रक्कम शेतकºयांना मिळते की, व्यापारी कृत्रिमरीत्या दर वाढवतात, याचीही खात्री या पथकाने केली त्यासाठी थेट शेतकºयांशी संवाद साधला होता. या समितीने केंद्र सरकारला अहवाल सादर केला असला तरी, सरकारचे बहुधा त्यातून समाधान झालेले नाही. दुसरीकडे उन्हाळ कांद्याचे लिलाव अद्यापही तेजीतच आहेत. साधारणत: २२०० ते २५०० रुपये क्विंटल कांद्याचे दर असून, पावसाळी कांद्याची मोठी आवक झाल्याशिवाय कांदा तेजीतच राहणार आहे. अशी परिस्थिती असताना केंद्र सरकार मात्र ते मान्य करायला तयार नाही. कांद्याचा लिलाव २५०० रुपयांपर्यंत पोहोचला असला तरी, खुल्या बाजारात तो ४० रुपयांपर्यंत विकला जात आहे व आणखी काही दिवस हीच परिस्थिती कायम राहणार असल्याने केंद्र सरकार धास्तावले आहे. त्यासाठी कृषी खात्याने पुन्हा कांद्याचा अभ्यास सुरू केला आहे. गुरुवारी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सहसचिवांनी जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधून कांद्याची सद्यस्थिती जाणून घेतली. गेल्या महिन्यात जिल्ह्णातील बाजार समित्यांमध्ये किती कांद्याची आवक झाली व त्यापैकी किती कांदा देशांतर्गत पाठविला गेला याची माहिती देण्याची, तसेच कांद्याला मिळणाºया दरामागची कारणमीमांसा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारच्या मते शेतकºयांकडून कांद्याची खरेदी करून व्यापारी साठेबाजी करीत असल्यामुळेच कांद्याचे दर वाढल्याचा अंदाज आहे म्हणूनच व्यापाºयांकडे असलेल्या साठ्याचीही माहिती मागविण्यात आली आहे.