शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

कांदा भाववाढीचा केंद्राने मागविला अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:18 IST

गेल्या महिन्यापासून कांद्याचे चढे दर पाहता नजीकच्या काळात त्यात वाढ होण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकार धास्तावले असून, खुल्या बाजारात ४० रुपयांपर्यंत दर पोहोचल्यामुळे या दरवाढीचे कारण शोधण्यास सरकारने सुरुवात केली आहे. शेतकरी वा व्यापाºयांकडून कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण करून भाववाढ केली जात असल्याचा दाट संशय सरकारला वाटू लागल्याने त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी जिल्हाधिकाºयांकडून अहवाल मागविण्यात आला आहे.

नाशिक : गेल्या महिन्यापासून कांद्याचे चढे दर पाहता नजीकच्या काळात त्यात वाढ होण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकार धास्तावले असून, खुल्या बाजारात ४० रुपयांपर्यंत दर पोहोचल्यामुळे या दरवाढीचे कारण शोधण्यास सरकारने सुरुवात केली आहे. शेतकरी वा व्यापाºयांकडून कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण करून भाववाढ केली जात असल्याचा दाट संशय सरकारला वाटू लागल्याने त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी जिल्हाधिकाºयांकडून अहवाल मागविण्यात आला आहे.गेल्या महिन्यातच केंद्रीय खाद्य मंत्रालयाच्या उपसचिवांच्या पथकाने नाशिकला भेट देऊन कांद्याच्या बाजारपेठेची माहिती करून घेतली. बाजार समित्यांमध्ये दररोज होणारी कांद्याची आवक, लिलावाचे ठरणारे दर व व्यापाºयांकडून विक्रीसाठी पाठविल्या जाणाºया कांद्याचे प्रमाण याची माहितीही या पथकाने घेतली तसेच लिलावाची रक्कम शेतकºयांना मिळते की, व्यापारी कृत्रिमरीत्या दर वाढवतात, याचीही खात्री या पथकाने केली त्यासाठी थेट शेतकºयांशी संवाद साधला होता. या समितीने केंद्र सरकारला अहवाल सादर केला असला तरी, सरकारचे बहुधा त्यातून समाधान झालेले नाही. दुसरीकडे उन्हाळ कांद्याचे लिलाव अद्यापही तेजीतच आहेत. साधारणत: २२०० ते २५०० रुपये क्विंटल कांद्याचे दर असून, पावसाळी कांद्याची मोठी आवक झाल्याशिवाय कांदा तेजीतच राहणार आहे. अशी परिस्थिती असताना केंद्र सरकार मात्र ते मान्य करायला तयार नाही. कांद्याचा लिलाव २५०० रुपयांपर्यंत पोहोचला असला तरी, खुल्या बाजारात तो ४० रुपयांपर्यंत विकला जात आहे व आणखी काही दिवस हीच परिस्थिती कायम राहणार असल्याने केंद्र सरकार धास्तावले आहे. त्यासाठी कृषी खात्याने पुन्हा कांद्याचा अभ्यास सुरू केला आहे. गुरुवारी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सहसचिवांनी जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधून कांद्याची सद्यस्थिती जाणून घेतली. गेल्या महिन्यात जिल्ह्णातील बाजार समित्यांमध्ये किती कांद्याची आवक झाली व त्यापैकी किती कांदा देशांतर्गत पाठविला गेला याची माहिती देण्याची, तसेच कांद्याला मिळणाºया दरामागची कारणमीमांसा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारच्या मते शेतकºयांकडून कांद्याची खरेदी करून व्यापारी साठेबाजी करीत असल्यामुळेच कांद्याचे दर वाढल्याचा अंदाज आहे म्हणूनच व्यापाºयांकडे असलेल्या साठ्याचीही माहिती मागविण्यात आली आहे.