शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

कांदा भाववाढीचा केंद्राने मागविला अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:18 IST

गेल्या महिन्यापासून कांद्याचे चढे दर पाहता नजीकच्या काळात त्यात वाढ होण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकार धास्तावले असून, खुल्या बाजारात ४० रुपयांपर्यंत दर पोहोचल्यामुळे या दरवाढीचे कारण शोधण्यास सरकारने सुरुवात केली आहे. शेतकरी वा व्यापाºयांकडून कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण करून भाववाढ केली जात असल्याचा दाट संशय सरकारला वाटू लागल्याने त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी जिल्हाधिकाºयांकडून अहवाल मागविण्यात आला आहे.

नाशिक : गेल्या महिन्यापासून कांद्याचे चढे दर पाहता नजीकच्या काळात त्यात वाढ होण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकार धास्तावले असून, खुल्या बाजारात ४० रुपयांपर्यंत दर पोहोचल्यामुळे या दरवाढीचे कारण शोधण्यास सरकारने सुरुवात केली आहे. शेतकरी वा व्यापाºयांकडून कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण करून भाववाढ केली जात असल्याचा दाट संशय सरकारला वाटू लागल्याने त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी जिल्हाधिकाºयांकडून अहवाल मागविण्यात आला आहे.गेल्या महिन्यातच केंद्रीय खाद्य मंत्रालयाच्या उपसचिवांच्या पथकाने नाशिकला भेट देऊन कांद्याच्या बाजारपेठेची माहिती करून घेतली. बाजार समित्यांमध्ये दररोज होणारी कांद्याची आवक, लिलावाचे ठरणारे दर व व्यापाºयांकडून विक्रीसाठी पाठविल्या जाणाºया कांद्याचे प्रमाण याची माहितीही या पथकाने घेतली तसेच लिलावाची रक्कम शेतकºयांना मिळते की, व्यापारी कृत्रिमरीत्या दर वाढवतात, याचीही खात्री या पथकाने केली त्यासाठी थेट शेतकºयांशी संवाद साधला होता. या समितीने केंद्र सरकारला अहवाल सादर केला असला तरी, सरकारचे बहुधा त्यातून समाधान झालेले नाही. दुसरीकडे उन्हाळ कांद्याचे लिलाव अद्यापही तेजीतच आहेत. साधारणत: २२०० ते २५०० रुपये क्विंटल कांद्याचे दर असून, पावसाळी कांद्याची मोठी आवक झाल्याशिवाय कांदा तेजीतच राहणार आहे. अशी परिस्थिती असताना केंद्र सरकार मात्र ते मान्य करायला तयार नाही. कांद्याचा लिलाव २५०० रुपयांपर्यंत पोहोचला असला तरी, खुल्या बाजारात तो ४० रुपयांपर्यंत विकला जात आहे व आणखी काही दिवस हीच परिस्थिती कायम राहणार असल्याने केंद्र सरकार धास्तावले आहे. त्यासाठी कृषी खात्याने पुन्हा कांद्याचा अभ्यास सुरू केला आहे. गुरुवारी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सहसचिवांनी जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधून कांद्याची सद्यस्थिती जाणून घेतली. गेल्या महिन्यात जिल्ह्णातील बाजार समित्यांमध्ये किती कांद्याची आवक झाली व त्यापैकी किती कांदा देशांतर्गत पाठविला गेला याची माहिती देण्याची, तसेच कांद्याला मिळणाºया दरामागची कारणमीमांसा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारच्या मते शेतकºयांकडून कांद्याची खरेदी करून व्यापारी साठेबाजी करीत असल्यामुळेच कांद्याचे दर वाढल्याचा अंदाज आहे म्हणूनच व्यापाºयांकडे असलेल्या साठ्याचीही माहिती मागविण्यात आली आहे.