शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

निर्यात मूल्य वाढताच कांदा भाव घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 15:48 IST

वणी : दर नियंत्रण करण्यासाठी कांद्यावर निर्यात मुल्य व लेटर आॅफ क्र ेडीट अशा बाबी सरकारने नियमानूकुल केल्याने चोवीस तासातच कांदा दर घसरल्याने उत्पादक अस्वस्थ झाले आहेत तर व्यापारी वर्गानेही वेट अँड वॉचची भुमिका घेतल्याने खरेदी विक्र ी व्यवहार प्रणालीवर परिणाम झाला आहे.

वणी : दर नियंत्रण करण्यासाठी कांद्यावर निर्यात मुल्य व लेटर आॅफ क्र ेडीट अशा बाबी सरकारने नियमानूकुल केल्याने चोवीस तासातच कांदा दर घसरल्याने उत्पादक अस्वस्थ झाले आहेत तर व्यापारी वर्गानेही वेट अँड वॉचची भुमिका घेतल्याने खरेदी विक्र ी व्यवहार प्रणालीवर परिणाम झाला आहे. वणी उपबाजारात शुक्र वारीसहा हजार क्विंटल कांद्याची २१४ वाहनातुन आवक झाली ३१५० रु पये कमाल २७५० रु पये किमान तर २९२१ रु पये सरासरी प्रति क्विंटलला दर मिळाला.शनिवारी उपबाजारात २५०० क्विंटल कांद्याची आवक झाली. ३१०२ रु पये कमाल २५०० रु पये किमान व २८७० रु पये सरासरी असा दर प्रतिक्विंटलचा कांद्याला मिळाला.या दोन दिवसातील व्यवहाराचा फरक बघितला तर दर घसरल्याचे दिसुन येते. कांद्याचे दर वाढल्याची ओरड सुरु झाली की दर नियंत्रणासाठी नियमानुकुल धोरण राबविण्यात येतात. निर्यातीसाठी ८५० हॉलर प्रति मेट्रीक टन व लेटर आॅफ क्र ेडिट अशा अटी लागु केल्याची माहीती निर्यातदार मनिष बोरा यांनी दिली. लेटर आॅफ क्र ेडिट या नियमानुसार परदेशात पाठविण्यात येणाऱ्या कांद्याची रक्कम खरेदीदाराच्या बँकेतुन रक्कम देण्याबाबतचे त्या देशातील बँकेचे पत्र प्राप्त झाल्यानंतर कांदा निर्यातीसाठी बंदरावर पाठविण्यात येतो. खरेदी-विक्र ी व्यवहार प्रणालीचे नियम पुर्तीनंतर हा कांदा परदेशात पाठविण्यात येतो अशी माहीती बोरा यांनी दिली. या अटींची पुर्तता करणे व्यापारी वर्गाच्या आवाक्याबाहेर असल्याने खरेदी विक्र ी व्यवहाराची गती मंदावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान कांदा आयात करण्याच्या कार्य प्रणालीला सध्या अग्रक्र म दिला जातो आहे. सप्टेंबर महिन्याच्या अंतिम सत्रापर्यंत आयात निविदा खुल्या असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान पाकिस्तान व इजिप्त या परदेशातुन कांदा आयात करण्यासाठी सुरु आसलेली प्रणाली दर नियंत्रणासाठी असल्याची भावना उत्पादकांची आहे. तसेच या दोन नमुद देशांमधुन कांदा खरेदी करण्यासाठी इतर देशही स्वारस्य दाखवतील. कारण निर्यात मुल्यामुळे भारताच्या कांद्यापेक्षा या दोन देशातील कांदा स्वस्त पडेल असे व्यावसायिक गणित असल्याचा आडाखा व्यापारी वर्गाचा असल्याने वेट अँड वॉचची भुमिका त्यांनी घेतली आहे. देशांतर्गत गुजरात, राजस्थान व दाक्षिण्यात्य राज्यांमाधे कांद्याला मागणी वाढलेली आहे. भारतीय कांदा त्यातल्या त्यात नाशिक जिल्ह्याच्या कांद्याचा नावलौकीक जागतिक पातळीवर टिकुन आहे. सध्या दररोज पावसाची हजेरी सुरु आहे, त्यात अशा पावसाळी वातावरणात कांदा चाळीतुन कांदा टॅक्टरमध्ये भरून बाजार समित्यांमधे तसेच उपबाजारात आणणे हे आव्हानात्मक असताना उत्पादकांना चार पैसे मिळण्याची अनुकुल स्थिती असताना धोरणात्मक निर्णयातील बदल ही बाब व्यवहार प्रणालीच्या गतिमानतेवर परिणाम करणार असल्याची भावना उत्पादकांची झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक