शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

कांदे लागवड मातीत, कपाशीची बोंडं घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 16:14 IST

बळीराजा हवालदिल : खरीपाचे उत्पादन केवळ २५ टक्केच हाती

ठळक मुद्दे गेल्या वर्षी कटू अनुभव आल्याने कपाशीला थांबवत मक्याचे क्षेत्र या भागात वाढले

येवला : कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंडं, मक्याला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाहीत. मूग,सोयाबीन,भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालायं तर कांद्याची मोठ्या आशेने लागवड केली पण पाण्याअभावी लागवड झालेली रोपे करपून गेली. त्यामुळे येवला परिसरातील शेतकऱ्यांना यंदा खरीपातून केवळ २५ टक्केच उत्पादन हाती लागले आहे. परिसरातील नदी-नाले,बंधारे कोरडेठाक पडले आहेत.मुळातच दुष्काळी असलेल्या तालुक्याला आणखी मातीत लोटले आहे. पाऊस नसल्याने पालखेड कालव्याच्या लाभक्षेत्रातील पन्नासवर गावात खरिपाचे पीक बरे आहे, पण तेथेही पन्नास टक्क्यांपर्यंत हानी आहेच. अवर्षणप्रवण उत्तरपूर्व भागातील सत्तरवर गावातील चित्र भयानक आहे. गेल्या वर्षी कटू अनुभव आल्याने कपाशीला थांबवत मक्याचे क्षेत्र या भागात वाढले. पण मका आता केवळ जनावरांच्या चा-यासाठीच शेतात उभी आहे. कारण मक्याला बिटाचे तुरे दिसले पण त्यात दाण्यांचा पत्ताच नाही. सर्वात मोठा फटका कपाशीला जेथे पस्तीस ते चाळीस बोंड असतात त्याच शेतात यंदा चार ते पाच बोंडं लागलेले आहेत.कांदा लागवड पाण्यातसोयाबीनसह इतर सर्वच पिकांचा महिनाभरात कडक उन्हाने बळी घेतला आहे. पोळ्याला पाऊस भोळा होतो आणि गणपतीत तर मुसळधार कोसळतो. यामुळे शेतकºयांनी जुगार खेळत लाल कांदयाची लागवड केली पण २५ टक्के क्षेत्र वगळता उर्वरित कांदा लागवड रोपे करपल्याने वाया गेली आहे. तर रब्बीच्या पिकांची शक्यता संपली आहे. पालखेडच्या लाभ क्षेत्रात थोडेफार पिके येतील पण ती सुद्धा हरभरा ज्वारीची व थोडेफार कांद्याचीच!

टॅग्स :Nashikनाशिकcottonकापूस