शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

कांदे लागवड मातीत, कपाशीची बोंडं घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 16:14 IST

बळीराजा हवालदिल : खरीपाचे उत्पादन केवळ २५ टक्केच हाती

ठळक मुद्दे गेल्या वर्षी कटू अनुभव आल्याने कपाशीला थांबवत मक्याचे क्षेत्र या भागात वाढले

येवला : कपाशीच्या झाडाला चाळीसच्या ठिकाणी चारच बोंडं, मक्याला एक-दोन बीट लागले पण त्यात दाणेच नाहीत. मूग,सोयाबीन,भुईमुगाचा केव्हाच पालापाचोळा झालायं तर कांद्याची मोठ्या आशेने लागवड केली पण पाण्याअभावी लागवड झालेली रोपे करपून गेली. त्यामुळे येवला परिसरातील शेतकऱ्यांना यंदा खरीपातून केवळ २५ टक्केच उत्पादन हाती लागले आहे. परिसरातील नदी-नाले,बंधारे कोरडेठाक पडले आहेत.मुळातच दुष्काळी असलेल्या तालुक्याला आणखी मातीत लोटले आहे. पाऊस नसल्याने पालखेड कालव्याच्या लाभक्षेत्रातील पन्नासवर गावात खरिपाचे पीक बरे आहे, पण तेथेही पन्नास टक्क्यांपर्यंत हानी आहेच. अवर्षणप्रवण उत्तरपूर्व भागातील सत्तरवर गावातील चित्र भयानक आहे. गेल्या वर्षी कटू अनुभव आल्याने कपाशीला थांबवत मक्याचे क्षेत्र या भागात वाढले. पण मका आता केवळ जनावरांच्या चा-यासाठीच शेतात उभी आहे. कारण मक्याला बिटाचे तुरे दिसले पण त्यात दाण्यांचा पत्ताच नाही. सर्वात मोठा फटका कपाशीला जेथे पस्तीस ते चाळीस बोंड असतात त्याच शेतात यंदा चार ते पाच बोंडं लागलेले आहेत.कांदा लागवड पाण्यातसोयाबीनसह इतर सर्वच पिकांचा महिनाभरात कडक उन्हाने बळी घेतला आहे. पोळ्याला पाऊस भोळा होतो आणि गणपतीत तर मुसळधार कोसळतो. यामुळे शेतकºयांनी जुगार खेळत लाल कांदयाची लागवड केली पण २५ टक्के क्षेत्र वगळता उर्वरित कांदा लागवड रोपे करपल्याने वाया गेली आहे. तर रब्बीच्या पिकांची शक्यता संपली आहे. पालखेडच्या लाभ क्षेत्रात थोडेफार पिके येतील पण ती सुद्धा हरभरा ज्वारीची व थोडेफार कांद्याचीच!

टॅग्स :Nashikनाशिकcottonकापूस