शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

येवला बाजार समितीत कांदा @ ३६१० रूपये क्विंटल : बळीराजा समाधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 15:48 IST

येवला : येवला व अंदरसूल मार्केटच्या साठ वर्षाच्या इतिहासात प्रथमच यंदा आॅगस्ट ते डिसेंबर या सलग पाच महिन्यात कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होवून देखील भावात सततची तेजी राहिल्याने बळीराजा समाधानी असल्याचे चित्र गेल्या पाच महिन्यापासून दिसत आहे.

येवला : येवला व अंदरसूल मार्केटच्या साठ वर्षाच्या इतिहासात प्रथमच यंदा आॅगस्ट ते डिसेंबर या सलग पाच महिन्यात कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होवून देखील भावात सततची तेजी राहिल्याने बळीराजा समाधानी असल्याचे चित्र गेल्या पाच महिन्यापासून दिसत आहे. महाराष्ट्रालगतच्या पाच राज्यात अतिपावसाने थैमान घातल्याने कांदा पिक पुरते संपल्याने, देशाअंतर्गत कांद्याची गरज भागविण्याची जबाबदारी निसर्गानेच महाराष्ट्रावर टाकली. कांद्याचे भाव रोखण्याचे भरपूर प्रयत्न झाले. परंतु देशातील मागणी आणि पुरवठा यांचे समीकरण जुळल्याने शेतकºयाच्या कांद्याला यंदा सलग पाच महिने चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजा हसला आहे. बळीराजाला समाधानी ठेवण्याची किमया अखेर निर्सार्गानेच केली.येवला बाजार आवारात शुक्र वारी (५ जानेवारीला) १४ हजार क्विंटल आवक झाली, त्यात ३६१० रु पये प्रती क्विंटल भाव मिळाल्याने बळीराजा समाधानी आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समिती व अंदरसूल उपबाजारात स्थापने पासूनच्या साठ वर्षाच्या इतिहासात आॅगस्ट २०१७ ते डिसेंबर २०१७ या पाच महिन्यात तब्बल एक कोटी दोन लाख ९६ हजार ७७८ क्विंटल कांद्याची आवक झाली.या सलग पाच महिन्यात कांद्याला सरासरी २८०० ते ३००० रु पये प्रतीक्विंटलभाव मिळाला. कांदा आणि भाजीपाला कवडीमोलभावाने भावाने विकला जातो व शेतकºयांच्या पदरी कायम निराशा पडते.परंतु गेल्या पाच महिन्यापासून समाधानाचे दिवस कांदा उत्पादक शेतकर्यांना निसर्गाने दिले आहेत.गेल्या वर्षीच्या तुलनेत एिप्रल मध्ये कांद्याची आवक तीनपट वाढली होती. एप्रिल महिन्यात २ लाख ३० हजार क्विंटल आवक झाली.निरंतर आवकेत वाढच होत आहे. एिप्रलमध्ये सरासरी केवळ ३६० रूपये प्रती क्विंटल भाव तर मे मध्ये कांद्याचे ची बाजारभाव केवळ ३२५ रु पये प्रतीक्विंटल झाले.तुलनेत निम्म्याने घसरल्याने शेतकरी हवालिदल झाला होता. शेतकºयांना बुरे दिन पहावयास मिळाले होते आणि शेतकरी आगीतून उठून फुफाट्यात पडला होता.परंतु आॅगस्ट २०१७ पासून कांद्याला चांगले दिवस आले.नासिक, पुणे, नगर, सोलापूर या चार जिल्ह्यातील कांदा या चार जिल्ह्यातील कांदा संपूर्ण देशात कांद्याची गरज भागवण्यासाठी वापरला जात आहे.त्यामुळे कांद्याला आणखी काही महिने चांगला भाव मिळण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Nashikनाशिक