शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

येवला बाजार समितीत कांदा @ ३६१० रूपये क्विंटल : बळीराजा समाधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 15:48 IST

येवला : येवला व अंदरसूल मार्केटच्या साठ वर्षाच्या इतिहासात प्रथमच यंदा आॅगस्ट ते डिसेंबर या सलग पाच महिन्यात कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होवून देखील भावात सततची तेजी राहिल्याने बळीराजा समाधानी असल्याचे चित्र गेल्या पाच महिन्यापासून दिसत आहे.

येवला : येवला व अंदरसूल मार्केटच्या साठ वर्षाच्या इतिहासात प्रथमच यंदा आॅगस्ट ते डिसेंबर या सलग पाच महिन्यात कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होवून देखील भावात सततची तेजी राहिल्याने बळीराजा समाधानी असल्याचे चित्र गेल्या पाच महिन्यापासून दिसत आहे. महाराष्ट्रालगतच्या पाच राज्यात अतिपावसाने थैमान घातल्याने कांदा पिक पुरते संपल्याने, देशाअंतर्गत कांद्याची गरज भागविण्याची जबाबदारी निसर्गानेच महाराष्ट्रावर टाकली. कांद्याचे भाव रोखण्याचे भरपूर प्रयत्न झाले. परंतु देशातील मागणी आणि पुरवठा यांचे समीकरण जुळल्याने शेतकºयाच्या कांद्याला यंदा सलग पाच महिने चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजा हसला आहे. बळीराजाला समाधानी ठेवण्याची किमया अखेर निर्सार्गानेच केली.येवला बाजार आवारात शुक्र वारी (५ जानेवारीला) १४ हजार क्विंटल आवक झाली, त्यात ३६१० रु पये प्रती क्विंटल भाव मिळाल्याने बळीराजा समाधानी आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समिती व अंदरसूल उपबाजारात स्थापने पासूनच्या साठ वर्षाच्या इतिहासात आॅगस्ट २०१७ ते डिसेंबर २०१७ या पाच महिन्यात तब्बल एक कोटी दोन लाख ९६ हजार ७७८ क्विंटल कांद्याची आवक झाली.या सलग पाच महिन्यात कांद्याला सरासरी २८०० ते ३००० रु पये प्रतीक्विंटलभाव मिळाला. कांदा आणि भाजीपाला कवडीमोलभावाने भावाने विकला जातो व शेतकºयांच्या पदरी कायम निराशा पडते.परंतु गेल्या पाच महिन्यापासून समाधानाचे दिवस कांदा उत्पादक शेतकर्यांना निसर्गाने दिले आहेत.गेल्या वर्षीच्या तुलनेत एिप्रल मध्ये कांद्याची आवक तीनपट वाढली होती. एप्रिल महिन्यात २ लाख ३० हजार क्विंटल आवक झाली.निरंतर आवकेत वाढच होत आहे. एिप्रलमध्ये सरासरी केवळ ३६० रूपये प्रती क्विंटल भाव तर मे मध्ये कांद्याचे ची बाजारभाव केवळ ३२५ रु पये प्रतीक्विंटल झाले.तुलनेत निम्म्याने घसरल्याने शेतकरी हवालिदल झाला होता. शेतकºयांना बुरे दिन पहावयास मिळाले होते आणि शेतकरी आगीतून उठून फुफाट्यात पडला होता.परंतु आॅगस्ट २०१७ पासून कांद्याला चांगले दिवस आले.नासिक, पुणे, नगर, सोलापूर या चार जिल्ह्यातील कांदा या चार जिल्ह्यातील कांदा संपूर्ण देशात कांद्याची गरज भागवण्यासाठी वापरला जात आहे.त्यामुळे कांद्याला आणखी काही महिने चांगला भाव मिळण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Nashikनाशिक