शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

येवला बाजार समितीत कांदा @ ३६१० रूपये क्विंटल : बळीराजा समाधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 15:48 IST

येवला : येवला व अंदरसूल मार्केटच्या साठ वर्षाच्या इतिहासात प्रथमच यंदा आॅगस्ट ते डिसेंबर या सलग पाच महिन्यात कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होवून देखील भावात सततची तेजी राहिल्याने बळीराजा समाधानी असल्याचे चित्र गेल्या पाच महिन्यापासून दिसत आहे.

येवला : येवला व अंदरसूल मार्केटच्या साठ वर्षाच्या इतिहासात प्रथमच यंदा आॅगस्ट ते डिसेंबर या सलग पाच महिन्यात कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होवून देखील भावात सततची तेजी राहिल्याने बळीराजा समाधानी असल्याचे चित्र गेल्या पाच महिन्यापासून दिसत आहे. महाराष्ट्रालगतच्या पाच राज्यात अतिपावसाने थैमान घातल्याने कांदा पिक पुरते संपल्याने, देशाअंतर्गत कांद्याची गरज भागविण्याची जबाबदारी निसर्गानेच महाराष्ट्रावर टाकली. कांद्याचे भाव रोखण्याचे भरपूर प्रयत्न झाले. परंतु देशातील मागणी आणि पुरवठा यांचे समीकरण जुळल्याने शेतकºयाच्या कांद्याला यंदा सलग पाच महिने चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजा हसला आहे. बळीराजाला समाधानी ठेवण्याची किमया अखेर निर्सार्गानेच केली.येवला बाजार आवारात शुक्र वारी (५ जानेवारीला) १४ हजार क्विंटल आवक झाली, त्यात ३६१० रु पये प्रती क्विंटल भाव मिळाल्याने बळीराजा समाधानी आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समिती व अंदरसूल उपबाजारात स्थापने पासूनच्या साठ वर्षाच्या इतिहासात आॅगस्ट २०१७ ते डिसेंबर २०१७ या पाच महिन्यात तब्बल एक कोटी दोन लाख ९६ हजार ७७८ क्विंटल कांद्याची आवक झाली.या सलग पाच महिन्यात कांद्याला सरासरी २८०० ते ३००० रु पये प्रतीक्विंटलभाव मिळाला. कांदा आणि भाजीपाला कवडीमोलभावाने भावाने विकला जातो व शेतकºयांच्या पदरी कायम निराशा पडते.परंतु गेल्या पाच महिन्यापासून समाधानाचे दिवस कांदा उत्पादक शेतकर्यांना निसर्गाने दिले आहेत.गेल्या वर्षीच्या तुलनेत एिप्रल मध्ये कांद्याची आवक तीनपट वाढली होती. एप्रिल महिन्यात २ लाख ३० हजार क्विंटल आवक झाली.निरंतर आवकेत वाढच होत आहे. एिप्रलमध्ये सरासरी केवळ ३६० रूपये प्रती क्विंटल भाव तर मे मध्ये कांद्याचे ची बाजारभाव केवळ ३२५ रु पये प्रतीक्विंटल झाले.तुलनेत निम्म्याने घसरल्याने शेतकरी हवालिदल झाला होता. शेतकºयांना बुरे दिन पहावयास मिळाले होते आणि शेतकरी आगीतून उठून फुफाट्यात पडला होता.परंतु आॅगस्ट २०१७ पासून कांद्याला चांगले दिवस आले.नासिक, पुणे, नगर, सोलापूर या चार जिल्ह्यातील कांदा या चार जिल्ह्यातील कांदा संपूर्ण देशात कांद्याची गरज भागवण्यासाठी वापरला जात आहे.त्यामुळे कांद्याला आणखी काही महिने चांगला भाव मिळण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Nashikनाशिक