शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कांदाप्रश्नी पंतप्रधानांना लिहिणार १ लाख पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 23:54 IST

नाशिक : राज्यात कधी नव्हे इतका कांद्याच्या बाजारभावाचा पेच निर्माण झाला आहे. आज कांद्याचे सरासरी दर अगदी ४ रुपये किलो इतक्या खाली आल्याने कांदा उत्पादकांना नफा तर दूरच उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्कील झाले आहे.

नाशिक : राज्यात कधी नव्हे इतका कांद्याच्या बाजारभावाचा पेच निर्माण झाला आहे. आज कांद्याचे सरासरी दर अगदी ४ रुपये किलो इतक्या खाली आल्याने कांदा उत्पादकांना नफा तर दूरच उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्कील झाले आहे.कांदा उत्पादकांचे आर्थिक नुकसान होत असताना सरकार मात्र काहीच हालचाल करताना दिसत नाही. कांदा बाजारभावाची झालेली घसरण थांबविण्यासाठी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी पत्र पाठवणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली. राज्यभरातून सुमारे एक लाख लेखी पत्र या मोहिमेतून पाठविण्यात येतील.शुक्रवारपासून (दि.२२) या मोहिमेला सुरुवात होणार आहे. राज्यातील एक लाख शेतकरी स्वत: हे पत्र लिहून त्या त्या गावातील टपाल कार्यालयात पोहच करतील. २२ ते २८ मे या ८ दिवसात ही एक लाख पत्रं पाठवली जाणार आहेत.केंद्र सरकारने कांद्याला नुकतेच जीवनावश्यक वस्तूंच्या सूचीतून बाहेर काढण्याची घोषणा केली आहे. परंतु कांदा भावातील घसरण थांबण्यास तयार नाही.आधी अतिवृष्टी नंतर निर्यातबंदी व आता कोरोना महामारीमुळे एकामागून एका लॉकडाउनमुळे कांद्याचे भाव सतत कमी होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.----------------------------------------कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत असतानाही सरकार मात्र कांदा प्रश्नावर काहीही उपाययोजना करताना दिसत नाही.केंद्र सरकारने २० रुपये प्रतिकिलो या भावाने थेट शेतकऱ्यांच्या कांद्याची खरेदी करावी ही मागणी प्रामुख्याने यावेळी या लेखी पत्रातून करण्यात येणार आहे.पावसाळा सुरू होण्यास आता फक्त दोनच आठवडे शिल्लक असल्याने शेतात काढून पडलेला लाखो टन कांदा सडण्यापूर्वी केंद्र सरकारने तात्काळ शेतकºयांच्या कांद्याची खरेदी करावी व कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत देशातील शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केलेली आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकºयांना न्याय द्यावा यासाठी नाशिक, अहमदनगर, सोलापूर, पुणे, सातारा, उस्मानाबाद, बीड, परभणी, अकोला, वाशिम, बुलढाणा, जळगाव, धुळे, औरंगाबादसह राज्यभरातील कांदा उत्पादक या पत्र मोहिमेत सहभाग घेतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक