शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो हेक्टरवरील कांदा करपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 01:42 IST

पाटोदा : येवला तालुक्याला यावर्षी भयाण दुष्काळाचे चटके बसत आहेत. दुष्काळी स्थितीचा सर्वात जास्त फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

ठळक मुद्देदुष्काळाचा फटका : एकरी साठ हजार रु पये खर्च वाया; शेतकरी आर्थिक संकटात

गोरख घुसळे।पाटोदा : येवला तालुक्याला यावर्षी भयाण दुष्काळाचे चटके बसत आहेत. दुष्काळी स्थितीचा सर्वात जास्त फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.कांदा हे नगदी पीक असल्याने कांदा लागवडीकडे तालुक्यातील शेतकºयांचा कल दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यावर्षी पावसाळ्याच्या चारही महिन्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने शेतकºयांनी पावसाच्या भरवश्यावर लागवड केलेला हजारो हेक्टरवरील कांदा पाण्याअभावी जळून खाक झाला आहे. कांदा लागवडीसाठी एकरी सुमारे साठ हजार रुपये खर्च केलेला पूर्णपणे वाया गेल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. ज्या शेतकºयांकडे थोडेफार पाणी उपलब्ध आहे अशा शेतकºयांनी कांदा पीक जागविण्यासाठी जिवाचा आटापिटा सुरू केला आहे. मात्र वीजपुरवठा हा कमी-अधिक प्रमाणात होत असल्याने उर्वरित पीकही पाण्याअभावी संकटात सापडले असून, शेतकरी चिंतित आहे.कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या येवला तालुक्याला दरवर्षीच दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी कमी कमी होत असलेल्या पर्जन्यामुळे शेतीव्यवसाय धोक्यात आला आहे. असे असले तरी शेतकरी नगदी पीक म्हणून कांदा लागवड मोठ्या प्रमाणात करीत आहेत.कांदा लागवडीसाठी एकरी साठ ते सत्तर हजार रुपये खर्च येतो. पावसाच्या दगाफटक्याने सर्वच जलस्र्रोत कोरडेठाक पडले आहेत. विहिरींना तसेच विंधनविहिरींनादेखील पाणी उतरले नाही. शेतकºयांनी रिमझिम पावसावर कांदा पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. आज ना उद्या पाऊस पडेल व विहिरींना पाणी येईल, अशी शेतकरीवर्गाला आशा होती; मात्र पावसाळ्याच्या पूर्ण हंगामात समाधानकारक पाऊस झाल्याने लागवड केलेला कांदा शेतात पूर्णपणे करपून गेला आहे. कमी पर्जन्यामुळे भूजलपातळी कमालीची खाली गेली आहे. शेकडो फूट खोल विंधनविहिरी घेऊनही पाणी उपलब्ध न झाल्याने कांदा पिकाची वाताहत झाली आहे.कांद्याचे ९५ टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रयेवला तालुक्यात शेतकरीवर्गाने हजारो हेक्टर क्षेत्रावर कांदा पिकाची लागवड केली. मात्र ९५ टक्क्यांपेक्षा जास्त कांदाक्षेत्र पाण्याअभावी करपून गेले आहे. कांदा लागवडीसाठी शेतकºयांनी एकरी सरासरी साठ हजारांपेक्षा जास्त खर्च केला आहे. मात्र लागवड केलेला कांदा करपून गेल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. तेलही गेले अन् तूपही गेले अशी शेतकºयांची अवस्था झाली आहे.तालुक्यातील शेतकºयांनी पोटच्या मुलाबाळाप्रमाणे कांदा पीक जगविण्यासाठी धावपळ केली मात्र त्यांना यश आले नाही. पावसाळ्यातही पिके जगतील अशा स्वरूपाचा पाऊस न झाल्याने संपूर्ण कांदा पीक उद्ध्वस्त झाले. शासनाने जनरेट्यामुळे उशिरा का होईना येवला तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकºयांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत. शासनाने कांदा पिकाचे पंचनामे करून शेतकºयांना भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.