शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो हेक्टरवरील कांदा करपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 01:42 IST

पाटोदा : येवला तालुक्याला यावर्षी भयाण दुष्काळाचे चटके बसत आहेत. दुष्काळी स्थितीचा सर्वात जास्त फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

ठळक मुद्देदुष्काळाचा फटका : एकरी साठ हजार रु पये खर्च वाया; शेतकरी आर्थिक संकटात

गोरख घुसळे।पाटोदा : येवला तालुक्याला यावर्षी भयाण दुष्काळाचे चटके बसत आहेत. दुष्काळी स्थितीचा सर्वात जास्त फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.कांदा हे नगदी पीक असल्याने कांदा लागवडीकडे तालुक्यातील शेतकºयांचा कल दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यावर्षी पावसाळ्याच्या चारही महिन्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने शेतकºयांनी पावसाच्या भरवश्यावर लागवड केलेला हजारो हेक्टरवरील कांदा पाण्याअभावी जळून खाक झाला आहे. कांदा लागवडीसाठी एकरी सुमारे साठ हजार रुपये खर्च केलेला पूर्णपणे वाया गेल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. ज्या शेतकºयांकडे थोडेफार पाणी उपलब्ध आहे अशा शेतकºयांनी कांदा पीक जागविण्यासाठी जिवाचा आटापिटा सुरू केला आहे. मात्र वीजपुरवठा हा कमी-अधिक प्रमाणात होत असल्याने उर्वरित पीकही पाण्याअभावी संकटात सापडले असून, शेतकरी चिंतित आहे.कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या येवला तालुक्याला दरवर्षीच दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी कमी कमी होत असलेल्या पर्जन्यामुळे शेतीव्यवसाय धोक्यात आला आहे. असे असले तरी शेतकरी नगदी पीक म्हणून कांदा लागवड मोठ्या प्रमाणात करीत आहेत.कांदा लागवडीसाठी एकरी साठ ते सत्तर हजार रुपये खर्च येतो. पावसाच्या दगाफटक्याने सर्वच जलस्र्रोत कोरडेठाक पडले आहेत. विहिरींना तसेच विंधनविहिरींनादेखील पाणी उतरले नाही. शेतकºयांनी रिमझिम पावसावर कांदा पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. आज ना उद्या पाऊस पडेल व विहिरींना पाणी येईल, अशी शेतकरीवर्गाला आशा होती; मात्र पावसाळ्याच्या पूर्ण हंगामात समाधानकारक पाऊस झाल्याने लागवड केलेला कांदा शेतात पूर्णपणे करपून गेला आहे. कमी पर्जन्यामुळे भूजलपातळी कमालीची खाली गेली आहे. शेकडो फूट खोल विंधनविहिरी घेऊनही पाणी उपलब्ध न झाल्याने कांदा पिकाची वाताहत झाली आहे.कांद्याचे ९५ टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रयेवला तालुक्यात शेतकरीवर्गाने हजारो हेक्टर क्षेत्रावर कांदा पिकाची लागवड केली. मात्र ९५ टक्क्यांपेक्षा जास्त कांदाक्षेत्र पाण्याअभावी करपून गेले आहे. कांदा लागवडीसाठी शेतकºयांनी एकरी सरासरी साठ हजारांपेक्षा जास्त खर्च केला आहे. मात्र लागवड केलेला कांदा करपून गेल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. तेलही गेले अन् तूपही गेले अशी शेतकºयांची अवस्था झाली आहे.तालुक्यातील शेतकºयांनी पोटच्या मुलाबाळाप्रमाणे कांदा पीक जगविण्यासाठी धावपळ केली मात्र त्यांना यश आले नाही. पावसाळ्यातही पिके जगतील अशा स्वरूपाचा पाऊस न झाल्याने संपूर्ण कांदा पीक उद्ध्वस्त झाले. शासनाने जनरेट्यामुळे उशिरा का होईना येवला तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकºयांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत. शासनाने कांदा पिकाचे पंचनामे करून शेतकºयांना भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.