शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 13:01 IST

लासलगाव (नाशिक ): केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा या मागणीसाठी जिल्ह्यात लासलगाव, सटाणा, उमराणेसह ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुक काही काळ ठप्प झाली होती.

लासलगाव (नाशिक ): केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा या मागणीसाठी जिल्ह्यात लासलगाव, सटाणा, उमराणेसह ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुक काही काळ ठप्प झाली होती.सटाणा येथील कृषी उत्पन्न समिती गेटसमोर शंभर ते दीडशे शेतकºयांनी निर्यातबंदी तात्काळ उठवावी याबाबत घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर निवेदन देण्यात आले. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.सध्या कांद्याचे मार्केट सुरु झाले आहे.लासलगाव येथे मंगळवारी सकाळी संतप्त कांदा उत्पादकांनी निफाड पंचायत समितीचे सदस्य शिवा सुरासे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या प्रवेशद्वाराबाहेर सुमारे अर्धा तास रस्ता रोको आंदोलन केले. यानंतर बाजार समिती सचिव नरेंद्र वाढवणे यांनी विनंती केल्यावर बाजार समितीत विक्रीस आलेल्या कांदा वाहनातील लिलाव पुर्वव सुरू झाले.सुरवातीला पहिला कांदा लिलाव १९०० रूपये बाजार भावाने विक्री झाल्याने संतप्त कांदा उत्पादकांनी अवघ्या पाच मिनीटात तीन वाहनाची लिलाव प्रक्रिया सुरू असतानाच तीन हजार रूपये भावापेक्षा कमी भावाने कांदा विक्री करणार नाही तसेच कांदा निर्यातबंदी करणारे केंद्र सरकारचा धिक्कारच्या घोषणा देत लिलाव बंद पाडले.

टॅग्स :Nashikनाशिक