शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
2
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
3
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
4
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
5
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
6
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
7
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
8
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
9
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
10
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
11
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
12
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
13
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
14
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
15
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
16
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना
17
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
18
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
19
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
20
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?

धुक्यामुळे कांदा उत्पादक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 01:09 IST

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव वाढत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी, परतीच्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या वेळेस दाट धुके व दवबिंदू पडत असून, वातावरणातही बदल झालाआहे. यामुळे कांदा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाला असून, शेतकरी औषध फवारणी करून पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांकडून फवारणी : मर रोगाचा प्रादुर्भाव

पाटोदा : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव वाढत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी, परतीच्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या वेळेस दाट धुके व दवबिंदू पडत असून, वातावरणातही बदल झालाआहे. यामुळे कांदा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाला असून, शेतकरी औषध फवारणी करून पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.मागील महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतात असलेले कांदा पीक पूर्णत: सडून गेल्याने तसेच मागील वर्षाचा कांदाही संपल्यामुळे कांद्यास सध्या पाच ते सहा हजार रु पयांचा बाजारभाव मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या धुक्यामुळे व दवबिंदूमुळे कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाला असून, पिकाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे.येवला तालुक्यात नगदी पिक म्हणून कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. साधारणता पोळ्यापासून या भागात कांदा लागवडीस प्रारंभ केला जातो.हा लागवड केलेला कांदा आॅक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने पूर्णपणे सडून गेला आहे. कांदा लागवडीसाठी शेतकºयांनी एकरी पन्नास ते साठ हजार रु पये खर्च केला, पण परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते केल्याने शेतकºयांना लाखो रु पयांचा फटका बसला आहे. उंच व मुरमाड जमिनीत असलेला थोडाफार कांदा वाचला. तसेच सध्या कांद्यास मिळत असलेल्या बाजारभावामुळे व पुढील काही दिवस असाच भाव मिळणार असल्याचा कयास बांधला जात असल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.शेतकरी मिळेल तेथून कांदा रोपे आणून लागवड करताना दिसत आहे. मात्र सध्या पडत असलेल्या धुके व दवबिंदूमुळे कांदा पिकाची वाढ पूर्णपणे खुंटली आहे. कांदापात पिवळी पडत असल्याने शेतकरीवर्ग हैराण झाला आहे. रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागत असल्यामुळे शेतकºयांचा खर्च वाढू लागला आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीagricultureशेती