शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
5
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
7
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
8
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
9
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
10
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
11
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
12
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
13
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
14
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
15
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
16
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
17
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
18
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
19
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
20
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

धुक्यामुळे कांदा उत्पादक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 01:09 IST

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव वाढत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी, परतीच्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या वेळेस दाट धुके व दवबिंदू पडत असून, वातावरणातही बदल झालाआहे. यामुळे कांदा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाला असून, शेतकरी औषध फवारणी करून पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांकडून फवारणी : मर रोगाचा प्रादुर्भाव

पाटोदा : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव वाढत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी, परतीच्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या वेळेस दाट धुके व दवबिंदू पडत असून, वातावरणातही बदल झालाआहे. यामुळे कांदा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाला असून, शेतकरी औषध फवारणी करून पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.मागील महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतात असलेले कांदा पीक पूर्णत: सडून गेल्याने तसेच मागील वर्षाचा कांदाही संपल्यामुळे कांद्यास सध्या पाच ते सहा हजार रु पयांचा बाजारभाव मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या धुक्यामुळे व दवबिंदूमुळे कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाला असून, पिकाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे.येवला तालुक्यात नगदी पिक म्हणून कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. साधारणता पोळ्यापासून या भागात कांदा लागवडीस प्रारंभ केला जातो.हा लागवड केलेला कांदा आॅक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने पूर्णपणे सडून गेला आहे. कांदा लागवडीसाठी शेतकºयांनी एकरी पन्नास ते साठ हजार रु पये खर्च केला, पण परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते केल्याने शेतकºयांना लाखो रु पयांचा फटका बसला आहे. उंच व मुरमाड जमिनीत असलेला थोडाफार कांदा वाचला. तसेच सध्या कांद्यास मिळत असलेल्या बाजारभावामुळे व पुढील काही दिवस असाच भाव मिळणार असल्याचा कयास बांधला जात असल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.शेतकरी मिळेल तेथून कांदा रोपे आणून लागवड करताना दिसत आहे. मात्र सध्या पडत असलेल्या धुके व दवबिंदूमुळे कांदा पिकाची वाढ पूर्णपणे खुंटली आहे. कांदापात पिवळी पडत असल्याने शेतकरीवर्ग हैराण झाला आहे. रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागत असल्यामुळे शेतकºयांचा खर्च वाढू लागला आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीagricultureशेती