शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

कांद्यानेही नाही दिली साथ; बळीराजाचा डोक्याला हात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 00:08 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील बळीराजांच्या समोरील समस्या कायम असून शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा पिकास हमीभाव मिळत नसल्याने व उत्पादन खर्चही सुटत नसल्याने कांदा उत्पादकांसमोर उदरनिर्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील बळीराजांच्या समोरील समस्या कायम असून शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा पिकास हमीभाव मिळत नसल्याने व उत्पादन खर्चही सुटत नसल्याने कांदा उत्पादकांसमोर उदरनिर्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे शासनाने तत्काळ उपाययोजना करुन शेतकरी वर्गाला दिलासा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.कोरोनाच्या साथीच्या सर्वत्र थैमान घातल्याने शेतकर्यांनाही त्याचा फटका बसत आहे. द्राक्षे, टमाटा, कोथिंबीर तसेच अन्य फळे व भाजीपाल्यास भाव मिळत नसल्याने काय पिकवावे असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. त्यातच मोठ्या कष्टाने कांदा पिकविला. कर्ज घेऊन कांदा पीक घेतले. कांदा पिकाला आता चांगला भाव मिळेल व कोरोनामध्ये आपला वाया गेलेला खर्च भरून निघले या आशेवर बळीराजा होता.परंतु जेव्हा शेतकरी वर्गाने आपला कांदा बाजारपेठेत आणला तेव्हा मात्र एक हजारांच्या आतच भाव मिळाल्याने अपेक्षांवर पाणी फेरले गेले. शेतकरी आपल्या शेतात जो शेती माल पिकवितो तो काही तरी आशा घेऊनच. पंरतु काही निवडक काळ जर सोडला तर बळीराजांची एकही मनात निर्माण केलेली आशा पूर्ण झालेली नाही. प्रत्येक पिकविलेल्या पिकांला योग्य भाव न मिळाल्याने व कांदा पिकांला भाव न मिळाल्याने शेतकरी हतबल होऊन खरीप हंगाम तोंडावर आल्याने भांडवल कसे उभे करायचे या चिंतेत सापडला आहे. मदतीला कोण देवदूत धावून येणार याकडे शेतकरी वर्गाच्या नजरा लागून राहिल्या आहेत.------------------दिवसेंदिवस त्यांचे व्याज वाढतचं आहे. आता हे घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवेचनेत बळीराजा सापडला आहे. दिवसेंदिवस शेतकरी वर्ग समास्याच्या विळख्यात सापडला जात असून आता आपला संसार कसा चालवावा व पोट कसे भरायचे असा सवाल निर्माण झाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक