शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

कांद्यानेही नाही दिली साथ; बळीराजाचा डोक्याला हात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 00:08 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील बळीराजांच्या समोरील समस्या कायम असून शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा पिकास हमीभाव मिळत नसल्याने व उत्पादन खर्चही सुटत नसल्याने कांदा उत्पादकांसमोर उदरनिर्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील बळीराजांच्या समोरील समस्या कायम असून शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा पिकास हमीभाव मिळत नसल्याने व उत्पादन खर्चही सुटत नसल्याने कांदा उत्पादकांसमोर उदरनिर्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे शासनाने तत्काळ उपाययोजना करुन शेतकरी वर्गाला दिलासा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.कोरोनाच्या साथीच्या सर्वत्र थैमान घातल्याने शेतकर्यांनाही त्याचा फटका बसत आहे. द्राक्षे, टमाटा, कोथिंबीर तसेच अन्य फळे व भाजीपाल्यास भाव मिळत नसल्याने काय पिकवावे असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. त्यातच मोठ्या कष्टाने कांदा पिकविला. कर्ज घेऊन कांदा पीक घेतले. कांदा पिकाला आता चांगला भाव मिळेल व कोरोनामध्ये आपला वाया गेलेला खर्च भरून निघले या आशेवर बळीराजा होता.परंतु जेव्हा शेतकरी वर्गाने आपला कांदा बाजारपेठेत आणला तेव्हा मात्र एक हजारांच्या आतच भाव मिळाल्याने अपेक्षांवर पाणी फेरले गेले. शेतकरी आपल्या शेतात जो शेती माल पिकवितो तो काही तरी आशा घेऊनच. पंरतु काही निवडक काळ जर सोडला तर बळीराजांची एकही मनात निर्माण केलेली आशा पूर्ण झालेली नाही. प्रत्येक पिकविलेल्या पिकांला योग्य भाव न मिळाल्याने व कांदा पिकांला भाव न मिळाल्याने शेतकरी हतबल होऊन खरीप हंगाम तोंडावर आल्याने भांडवल कसे उभे करायचे या चिंतेत सापडला आहे. मदतीला कोण देवदूत धावून येणार याकडे शेतकरी वर्गाच्या नजरा लागून राहिल्या आहेत.------------------दिवसेंदिवस त्यांचे व्याज वाढतचं आहे. आता हे घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवेचनेत बळीराजा सापडला आहे. दिवसेंदिवस शेतकरी वर्ग समास्याच्या विळख्यात सापडला जात असून आता आपला संसार कसा चालवावा व पोट कसे भरायचे असा सवाल निर्माण झाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक