नाशिक : घाऊक बाजारात कांद्याच्या भावामध्ये घसरण झाल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी लासलगाव, पिंपळगाव आणि वणी येथे सोमवारी रास्ता रोको आंदोलन करून लिलाव बंद पाडले होते. रास्ता रोकोमुळे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्याने लिलाव पुन्हा सुरू झाले.लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारच्या तुलनेत सोमवारी क्विंटलमागे भावात ९०० रुपयांची घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर सकाळी दीड तास रास्तारोको केला. कांद्याचे किमान निर्यातमूल्य कमी न झाल्याने निर्यातदार व्यापारी लिलावात सहभागी झाले नव्हते. त्यामुळे शनिवारच्या तुलनेत सोमवारी भाव घसरले. शेतकऱ्यांनी सकाळी कोटमगाव रस्त्यावर बस अडविली. दुपारनंतर लिलाव पूर्ववत झाले.
कांदा पेटला!
By admin | Updated: December 7, 2015 22:48 IST