शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

कांदा लिलाव बंद पाडला

By admin | Updated: February 9, 2016 22:31 IST

शेतकऱ्यांमध्ये संताप : ४०० रुपयांनी घसरण

पिंपळगाव बसवंत : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात ४०० रुपयांनी झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला.पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये मंगळवारी कांद्याला ३०० पासून ७०० पर्यंत प्रतिक्व्ािंटल भाव पुकारला गेला. मागील आठवड्यात कांद्याला सरासरी ८०० ते १२०० रुपयांपर्यंत कांद्याला भाव मिळत होता. तीन दिवसातच कांद्याच्या भावात निम्म्याने घसरण झाल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाल्याने अखेर शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या गेटवर दोन तास ठिय्या आंदोलन करत केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. कांद्याच्या उत्पादन शुल्कानुसार कांद्याला हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असून, मागील आठवड्यात कांद्याला १४०१ ते सरासरी ९०० पर्यंत बाजारभाव होता. आज रोजी कांद्याला ११०० ते सरासरी ७०० पर्यंत बाजारभाव निघाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून कांद्याला ट्रॅक्टर अथवा जीपगाडी यांचा लिलाव झाल्यानंतर घेईल त्याची आडत पद्धत चालू केली आहे. तीन वर्षे आधी शेतकरी हा आडतमध्ये ट्रॅक्टर अथवा जीपची नोंद करीत असे. मात्र सध्या चालू असलेली घेईल त्याची आडत पद्धत बंद करून पूर्वीचीच पद्धत चालू करण्याची मागणी अशोक कुशारे (नांदूर), राहुल अहेर (वडाळी), संपत जाधव (बोलू), सोमनाथ नागरे (डोंगरगाव), आशुतोष अहेर (कळवण), धनंजय खंगाळ (वावी) आदि शेतकऱ्यांनी केली असून, जवळपास तीन तासानंतर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सोनशेठ भंडारी, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सचिव संजय पाटील यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर लिलाव पुन्हा सुरू केला. मात्र बाजारभावात कुठलीही सुधारणा झाली नाही. (वार्ताहर)