शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात व्यापाऱ्यांकडून कांदा लिलाव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 01:54 IST

पिंपळगाव बसवंत : कांद्याने पाच हजार रु पयांचा टप्पा ओलांडताच पिंपळगाव व लासलगाव येथील कांदा व्यापाऱ्यांच्या कार्यालय तसेच गुदामांवर ...

ठळक मुद्देप्राप्तिकराच्या कारवाईचे पडसाद : ठिकठिकाणी कांदा दरात घसरण, शेतकरी संतप्त

पिंपळगाव बसवंत : कांद्याने पाच हजार रु पयांचा टप्पा ओलांडताच पिंपळगाव व लासलगाव येथील कांदा व्यापाऱ्यांच्या कार्यालय तसेच गुदामांवर प्राप्तिकर विभागाने बुधवारी (दि.१४) तपासणीसाठी धडक मारताच गुरूवारी विंचूर व लासलगावी व्यापाºयांकडून कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले. पिंपळगाव शहरातही एका बड्या व्यापाºयाची चौकशी करण्यात आली. मात्र, कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव सुरळीत चालू होते. दरम्यान, या साºया प्रकारामुळे काद्यांच्या दरात प्रतिक्विंटल ४८० रु पयांची घसरण झाल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली.प्राप्तिकर विभागाने बुधवारी निफाड व येवला तालुक्यातील बारा व्यापाºयांच्या कार्यालय आणि गुदामांवर धाड मारली. त्यामुळे लासलगाव व विंचूर येथे लिलाव बंद पहावयास मिळाला मात्र पिंपळगाव बाजार समितीत कांद्यांच्या भावात ४८० रूपयांची घसरण झाल्याची दिसून आली. प्राप्तिकर विभागाच्या कारवाईमुळे कांदा बाजारात खळबळ उडाली असून या व्यापाºयांचे धाबे दणाणले आहे.कांदा भाव वाढण्याची आशाउन्हाळ कांद्याची टंचाई जाणवू लागल्याने कांद्याने पाच हजारी पार केली. भविष्यात दर गगनाला भिडू नये यासाठी प्राप्तीकर विभागाने बुधवारी लासलगाव येथील १२ तर पिंपळगाव येथील एका कांदा व्यापाºयाच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी केली. मात्र, उन्हाळ कांदा बाजारात दाखल होण्यास अजून दोन महिने अवकाश असल्याने कांदा टंचाई निश्चित होणार असल्याने भविष्यात कांद्याचे दर वाढणार असा विश्वास शेतकºयांमधून व्यक्त केला जात आहे. गुरुवारी पिंपळगाव बाजार समितीत कांद्याचे कमीत कमी २४०१ तर जास्तीत जास्त ५५०१ रूपये आणि सरासरी ४६५१ रुपये दर राहिले.व्यापाºयांकडून कांद्यांचा साठा ?व्यापाºयांनी कांद्यांचा साठा केल्याचा संशय प्राप्तिकर विभागाला आहे. त्यामुळे पिंपळगाव, लासलगाव येथील कांदा व्यापाºयांवर प्राप्तिकर विभागाने बुधवारी कारवाई करीत घरे, कार्यालये आणि गुदामांची झडती घेतली होती. कांदा व्यापाºयांच्या महिनाभरातील खरेदी-विक्र ी व्यवहारांची आयकर विभाग चौकशी करणार असून व्यापाºयांच्या कार्यालयांतील महत्वाची कागदपत्रे अधिकाºयांनी ताब्यात घेतल्याचे समजते.कांदा टंचाई मुळे भाव वाढल्याने प्राप्तिकर विभाग व्यापाºयांच्या गुदाम व कार्यालयात तपासणी करत आहे. ते त्यांचे काम करत आहेत. दरात समतोल राखण्याचे काम कदाचित ते करत असावे. मात्र व्यापाºयांनी कांद्याची कोणतीही साठवणूक केली नाही त्यामुळे घाबरून जाण्यासारखे काही नाही.- अतुल शहा , कांदा व्यापारी, पिंपळगाव बसवंतकेंद्राचा जीडीपी आधीच खाली आला आहे. त्यात कोरोनाच्या पाशर््वभूमीवर फक्त शेतकरीच मेहनत करून जनतेला अन्न, धान्य पुरवित आहे. आता कांदा टंचाईच्या काळात शेतकºयांना चार पैसे मिळत असतील तर आडकाठी आणण्याची काही गरज आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत येईल, अशी भूमिका केंद्र आणि राज्य सरकारने घेऊ नये.- दिलीप बनकर, सभापती, पिंपळगाव बसवंत बाजार समितीकांदा दराने अजून उच्चांक गाठू नये यासाठी प्राप्तीकर विभागाने तपासणी सुरू केली आहे. व्यापाºयांना घाबरविण्याचा हा प्रकार आहे. या तपासणी सत्रामुळे व्यापारी नाराज होण्याचीच शक्यता अधिक आहे.- प्रकाश ठक्कर, कांदा व्यापारी, पिंपळगाव बसवंतशेतकरी आधीच अस्मानी संकटातून वाटचाल करीत आहे. कांदा विक्र ीतून शेतकºयांच्या हातात चार पैसे येण्याची वेळ आली असताना तपासणीसत्रामुळे कांदा दरात घसरण होवून शेतकºयांना नुकसान होणार आहे.- दिपक शिंदे, प्रगतशील शेतकरी, आहेरगावव्यापाºयांची तपासणी करत केंद्र सरकारने नव्या कृषी विधेयकांना स्वत:च हरताळ फासला आहे. निर्यात बंदी केली. कांद्याचे भाव कोसळले. परंतु देशांतर्गत मागणी मुळे पुन्हा कांद्याला थोडेसे भाव वाढू लागले. हे विस्कळीत करण्यासाठी व बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केंद्राचे हे उद्योग चालले आहेत. यात व्यापाºयांवर कारवाई करण्याचा आभास निर्माण केला असला तरी शेतकºयांचेच मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार हे निश्चित.- संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

 

 

टॅग्स :Marketबाजारonionकांदा