शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

एकीकडे बदल्यांची घाई, दुसरीकडे प्रशिक्षणाची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 12:25 AM

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून एकीकडे निवडणुकीची कामे पाहिलेल्या अधिकाºयांच्या निष्पक्षपणे निवडणूक प्रक्रिया पार पडावी म्हणून अन्यत्र बदल्या करण्यासाठी आग्रही आयोगाने नाशिक व औरंगाबाद विभागातील अधिकाºयांचे चार दिवस निवासी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन औरंगाबाद येथे सक्तीने केले आहे. विशेष म्हणजे या दिवसाचा राहण्या-खाण्याचा खर्च अधिकाºयांनी स्वत:च्या खर्चातून भागवावा लागणार असून, निवडणुकीचे कामच करावे लागणार नाही तर प्रशिक्षण तरी कशासाठी, असा सवाल अधिकारी स्वत:लाच विचारू लागले आहे.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाचा अजब फतवा : अधिकाऱ्यांपुढे स्वखर्चाचा पेच

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून एकीकडे निवडणुकीची कामे पाहिलेल्या अधिकाºयांच्या निष्पक्षपणे निवडणूक प्रक्रिया पार पडावी म्हणून अन्यत्र बदल्या करण्यासाठी आग्रही आयोगाने नाशिक व औरंगाबाद विभागातील अधिकाºयांचे चार दिवस निवासी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन औरंगाबाद येथे सक्तीने केले आहे. विशेष म्हणजे या दिवसाचा राहण्या-खाण्याचा खर्च अधिकाºयांनी स्वत:च्या खर्चातून भागवावा लागणार असून, निवडणुकीचे कामच करावे लागणार नाही तर प्रशिक्षण तरी कशासाठी, असा सवाल अधिकारी स्वत:लाच विचारू लागले आहे.दि. ७ फेब्रुवारीपर्यंत निवडणूक आयोगाच्या संमतीने सदरच्या बदल्या केल्या जाव्यात असे ठरलेले असताना त्यात प्रत्येक जिल्ह्णातील निवासी उपजिल्हाधिकारी व उप जिल्हा निवडणूक अधिकाºयांच्या बदल्या कराव्यात की नाही याचा गोंधळ सुरू असतानाच, ज्यांच्यावर शासकीय सेवेत दिवाणी वा फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले त्यांना निवडणुकीचे कामे द्यायची की नाहीत याबाबत संभ्रम आहे. अशी एकूण परिस्थिती असताना दुसरीकडे मंत्रालयात दिवसरात्र बदल्यांचे प्रस्तावावर काम सुरू असून, कोणत्याही क्षणी अधिकाºयांच्या बदल्या होतील, असे वातावरण संपूर्ण राज्यात निर्माण झाले आहे. असे असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणूक अधिकारी, सहायक निवडणूक अधिकाºयांचे विभाग निहाय चार, चार दिवसांचे प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.नाशिक व औरंगाबाद विभागातील अधिकाºयांचे प्रशिक्षण सोमवार ११ ते १४ फेब्रुवारी या चार दिवसाच्या काळात औरंगाबाद येथे होणार असून, इतक्या मोठ्या संख्येने प्रशिक्षणासाठी सहभागी होणाºया अधिकाºयांच्या राहण्या-खाण्याच्या सोयीपासून आयोगाने हात झटकले आहेत. प्रशिक्षणाला येणाºया अधिकाºयांनी स्वखर्चानेच आपले ‘चोचले’ भागवावे अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. सलग चार दिवस चालणाºया या प्रशिक्षण कालावधीत गैरहजर राहणाºयांवर कडक कारवाईचे संकेत देतानाच प्रत्येकाची हजेरीही घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.नेमणुकीच्या ठिकाणांचे प्रस्ताव ‘सोयी’नेनिवडणूक आयोगाने येत्या २८ फेब्रुवारीच्या आत निवडणुकीशी संबंधित कामे केलेल्या तसेच एकाच जिल्ह्णात तीन वर्षे सेवा बजावलेल्या व स्वजिल्हा असलेल्या अधिकाºयांच्या सरसकट बदल्या करण्याचे आदेश राज्यांना बजावले असून, राज्य सरकारने विभागीय आयुक्तांमार्फत बदलीपात्र अधिकाºयांची यादी व त्यांच्या नवीन नेमणुकीच्या ठिकाणांचे प्रस्ताव ‘सोयी’ने तयार करून ते सरकारला सादर केले आहेत.