शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

एकीकडे रहिवासी बेघर, दुसरीकडे रिकामे घर

By sanjay.pathak | Updated: June 12, 2018 00:57 IST

महापालिकेने झोपडपट्टीवासीयांसाठी घरकुल योजना राबविताना एकीकडे त्यांना विस्थापित केले आणि घरेच दिली नाही, तर दुसरीकडे वडाळा शिवारात तीन इमारती रहिवाशांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे महापालिकेची घरकुल योजना यशस्वी झाली हे कसे समजणार, असा प्रश्न केला जात आहे.

नाशिक : महापालिकेने झोपडपट्टीवासीयांसाठी घरकुल योजना राबविताना एकीकडे त्यांना विस्थापित केले आणि घरेच दिली नाही, तर दुसरीकडे वडाळा शिवारात तीन इमारती रहिवाशांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे महापालिकेची घरकुल योजना यशस्वी झाली हे कसे समजणार, असा प्रश्न केला जात आहे.  महापालिकेच्या वतीने शहरातील झोपडपट्टीवासीयांसाठी नेहरू नागरी अभियानांतर्गत घरकुल योजना राबविण्यात आली. सदरची योजना राबविताना महापालिकेने अधिकाधिक लाभार्थींना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केल्याचे दावे केले होते. त्यानुसार घरकुल योजनेची अधिकाधिक व्याप्ती वाढविली होती. आनंदवल्ली येथे झोपडपट्टीच्या जागेवरच घरकुल योजना राबविण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्यानंतर शिवनगर येथील रहिवाशांना राजी केले आणि त्यानंतर ८० कुटुंबाना घरकुले देऊन १२० कुटुंबांना मात्र वाऱ्यावर सोडले आहे. त्यासाठी महापालिकेने निधी संपल्याचे निमित्त केले होते. असाच काहीसा प्रकार गंजमाळ येथील घरकुल योजनेच्या बाबतीत घडला आहे.  गंजमाळ बसस्थानकाच्या परिसरातील झोपडपट्ट्या हटवून भीमवाडीतील रहिवाशांना घरे बांधून देण्यासाठी राजी करण्यात आले. स्थानिक नागरिकही तयार झाले. त्यानंतर महापालिकेने घरकुल योेजना राबविण्यासाठी त्यांच्या झोपड्या हटवून त्यांना बसस्थानकाच्या परिसरात पत्र्याचे शेड देण्यात आले. मात्र, नंतर संबंधित रहिवाशांपैकी काहींनाच घरे मिळाली. आजही अनेक लाभार्थींना घरे मिळालेली नाहीत. दुसरीकडे मात्र वडाळा शिवारातील घरकुलांच्या तीन इमारती बांधकाम करून अक्षरश: पडून आहेत. याठिकाणी काही इमारतींमध्ये लाभार्थींना घरे मिळाली. मात्र, ते घर सोडून मूळ जागेवर राहण्यास गेल्याचे महापालिकेच्या तपासणीत आढळले होते. म्हणजे एकीकडे घरे मिळत नाही म्हणून लाभपात्र व्यक्ती यादीत नाव असूनही घराच्या प्रतीक्षेत आहेत, दुसरीकडे घरकुलांच्या इमारती लाभार्थींच्या प्रतीक्षेत आहेत आणि तिसरीकडे मात्र ज्यांना घरे मिळाली ती पोटभाडेकरूंना देऊन मूळ जागेत राहण्यास जात आहेत. भीमवाडीत यथावकाश घरे बांधण्यात आली असली तरी अद्याप ती लाभार्थींना मिळालीच नसल्याने गोंधळाचे वातावरण आहे. गोरगरिबांच्या नावाखाली महापालिकेने ही घरकुल योजना राबविली असली तरी आता मात्र त्याच्या यशापयशाचा विचार करता त्याच्यादेखील मूल्यमापनाची गरज निर्माण झाली आहे.चुंचाळे येथील घरकुलांना लाभार्थींची प्रतीक्षामहापालिकेने तेथे जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत शहरातील सर्वात मोठी म्हणजे तीन हजार ७६० घरकुलांची योजना साकारली. आतापर्यंत ३१०० लाभार्थींना येथील घरकुलांचा लाभ देण्यात आला आहे, तर सुमारे ६०० घरकुलांना लाभार्थींची प्रतीक्षा आहे. काही घरकुलांची सोडतही झालेली आहे. परंतु लाभार्थी त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरायला विलंब लावत असल्याने ताबा देण्याची प्रक्रिया थांबली आहे.४अनेक जण आहे त्याच जागेवर घरकुल बांधून मागत आहेत, तर चुंचाळे शहराबाहेर असल्याने तेथे जाण्यास बव्हंशी लाभार्थी इच्छुक नाहीत. त्यामुळे भिजत घोंगडे पडले आहे. याशिवाय, संजयनगरातील १४, वडाळा शिवारातील ३००, गांधीधाममधील ४, शिवाजीवाडीतील २३, भीमवाडीतील ६०, गीताईनगरातील १८ घरकुलांचा ताबा अद्याप देणे बाकी असल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका