शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

एकीकडे रहिवासी बेघर, दुसरीकडे रिकामे घर

By sanjay.pathak | Updated: June 12, 2018 00:57 IST

महापालिकेने झोपडपट्टीवासीयांसाठी घरकुल योजना राबविताना एकीकडे त्यांना विस्थापित केले आणि घरेच दिली नाही, तर दुसरीकडे वडाळा शिवारात तीन इमारती रहिवाशांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे महापालिकेची घरकुल योजना यशस्वी झाली हे कसे समजणार, असा प्रश्न केला जात आहे.

नाशिक : महापालिकेने झोपडपट्टीवासीयांसाठी घरकुल योजना राबविताना एकीकडे त्यांना विस्थापित केले आणि घरेच दिली नाही, तर दुसरीकडे वडाळा शिवारात तीन इमारती रहिवाशांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे महापालिकेची घरकुल योजना यशस्वी झाली हे कसे समजणार, असा प्रश्न केला जात आहे.  महापालिकेच्या वतीने शहरातील झोपडपट्टीवासीयांसाठी नेहरू नागरी अभियानांतर्गत घरकुल योजना राबविण्यात आली. सदरची योजना राबविताना महापालिकेने अधिकाधिक लाभार्थींना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केल्याचे दावे केले होते. त्यानुसार घरकुल योजनेची अधिकाधिक व्याप्ती वाढविली होती. आनंदवल्ली येथे झोपडपट्टीच्या जागेवरच घरकुल योजना राबविण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्यानंतर शिवनगर येथील रहिवाशांना राजी केले आणि त्यानंतर ८० कुटुंबाना घरकुले देऊन १२० कुटुंबांना मात्र वाऱ्यावर सोडले आहे. त्यासाठी महापालिकेने निधी संपल्याचे निमित्त केले होते. असाच काहीसा प्रकार गंजमाळ येथील घरकुल योजनेच्या बाबतीत घडला आहे.  गंजमाळ बसस्थानकाच्या परिसरातील झोपडपट्ट्या हटवून भीमवाडीतील रहिवाशांना घरे बांधून देण्यासाठी राजी करण्यात आले. स्थानिक नागरिकही तयार झाले. त्यानंतर महापालिकेने घरकुल योेजना राबविण्यासाठी त्यांच्या झोपड्या हटवून त्यांना बसस्थानकाच्या परिसरात पत्र्याचे शेड देण्यात आले. मात्र, नंतर संबंधित रहिवाशांपैकी काहींनाच घरे मिळाली. आजही अनेक लाभार्थींना घरे मिळालेली नाहीत. दुसरीकडे मात्र वडाळा शिवारातील घरकुलांच्या तीन इमारती बांधकाम करून अक्षरश: पडून आहेत. याठिकाणी काही इमारतींमध्ये लाभार्थींना घरे मिळाली. मात्र, ते घर सोडून मूळ जागेवर राहण्यास गेल्याचे महापालिकेच्या तपासणीत आढळले होते. म्हणजे एकीकडे घरे मिळत नाही म्हणून लाभपात्र व्यक्ती यादीत नाव असूनही घराच्या प्रतीक्षेत आहेत, दुसरीकडे घरकुलांच्या इमारती लाभार्थींच्या प्रतीक्षेत आहेत आणि तिसरीकडे मात्र ज्यांना घरे मिळाली ती पोटभाडेकरूंना देऊन मूळ जागेत राहण्यास जात आहेत. भीमवाडीत यथावकाश घरे बांधण्यात आली असली तरी अद्याप ती लाभार्थींना मिळालीच नसल्याने गोंधळाचे वातावरण आहे. गोरगरिबांच्या नावाखाली महापालिकेने ही घरकुल योजना राबविली असली तरी आता मात्र त्याच्या यशापयशाचा विचार करता त्याच्यादेखील मूल्यमापनाची गरज निर्माण झाली आहे.चुंचाळे येथील घरकुलांना लाभार्थींची प्रतीक्षामहापालिकेने तेथे जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत शहरातील सर्वात मोठी म्हणजे तीन हजार ७६० घरकुलांची योजना साकारली. आतापर्यंत ३१०० लाभार्थींना येथील घरकुलांचा लाभ देण्यात आला आहे, तर सुमारे ६०० घरकुलांना लाभार्थींची प्रतीक्षा आहे. काही घरकुलांची सोडतही झालेली आहे. परंतु लाभार्थी त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरायला विलंब लावत असल्याने ताबा देण्याची प्रक्रिया थांबली आहे.४अनेक जण आहे त्याच जागेवर घरकुल बांधून मागत आहेत, तर चुंचाळे शहराबाहेर असल्याने तेथे जाण्यास बव्हंशी लाभार्थी इच्छुक नाहीत. त्यामुळे भिजत घोंगडे पडले आहे. याशिवाय, संजयनगरातील १४, वडाळा शिवारातील ३००, गांधीधाममधील ४, शिवाजीवाडीतील २३, भीमवाडीतील ६०, गीताईनगरातील १८ घरकुलांचा ताबा अद्याप देणे बाकी असल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका