शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

पाणीपुरवठा योजनांसाठी दीड हजार कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:11 IST

नाशिक जिल्ह्यातील १,९२२ गावांचा जलजीवन मिशन अंतर्गत साधारण १,५०० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांचा कृती आराखड्यास जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील ...

नाशिक जिल्ह्यातील १,९२२ गावांचा जलजीवन मिशन अंतर्गत साधारण १,५०० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांचा कृती आराखड्यास जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता देऊन सदर प्रस्ताव महाराष्ट्र शासनास सादर करण्यात आला आहे. प्रस्तुत पाणीपुरवठा योजनांची ‘अ’, ‘ब’ व नवीन पाणीपुरवठा योजना याप्रमाणे विगतवारी करण्यात आली असून, ‘अ’ प्रस्तावात जिल्ह्यातील ४२८ गावांच्या रुपये ९४.२० कोटी रकमेच्या योजनांचा समावेश असून, यामध्ये कार्यरत पाणीपुरवठा योजनांच्या नळजोडणी किंवा तत्सम कामे हाती घेण्यात येणार आहे. जलजीवन मिशन अंतर्गत ‘ब’ प्रस्तावात नाशिक जिल्ह्यातील ५९७ गावांचा समावेश असून, त्यांचा अंदाजे रुपये २६१.२२ कोटी रकमेची अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे हाती घेण्याबाबत प्रस्तावित आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यापासून वंचित असलेल्या ५७२ गावांना रुपये ३४९.०२ कोटी रकमेच्या नव्याने पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याबाबत प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे.

सदर प्रस्तावातील जलजीवन मिशन अंतर्गत १,५९७ गावांच्या पाणीपुरवठा योजनांची रुपये ७०४.४५ कोटी रकमेची कामे ही नाशिक जिल्हा परिषद अधिनस्त ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेमार्फत करण्यात येणार असून, उर्वरित ३२५ गावांची रुपये ७४०.०० कोटी रकमेची कामे ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या यंत्रणेमार्फत राबविली जाणार आहेत, त्यामुळे या योजनेच्या पूर्ततेसाठी शासनाने तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केली आहे.