शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
6
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
7
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
8
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
9
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
10
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
11
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
12
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
13
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
14
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
15
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
16
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
17
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
18
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
19
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
20
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट

पाणीपुरवठा योजनांसाठी दीड हजार कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:11 IST

नाशिक जिल्ह्यातील १,९२२ गावांचा जलजीवन मिशन अंतर्गत साधारण १,५०० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांचा कृती आराखड्यास जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील ...

नाशिक जिल्ह्यातील १,९२२ गावांचा जलजीवन मिशन अंतर्गत साधारण १,५०० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांचा कृती आराखड्यास जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता देऊन सदर प्रस्ताव महाराष्ट्र शासनास सादर करण्यात आला आहे. प्रस्तुत पाणीपुरवठा योजनांची ‘अ’, ‘ब’ व नवीन पाणीपुरवठा योजना याप्रमाणे विगतवारी करण्यात आली असून, ‘अ’ प्रस्तावात जिल्ह्यातील ४२८ गावांच्या रुपये ९४.२० कोटी रकमेच्या योजनांचा समावेश असून, यामध्ये कार्यरत पाणीपुरवठा योजनांच्या नळजोडणी किंवा तत्सम कामे हाती घेण्यात येणार आहे. जलजीवन मिशन अंतर्गत ‘ब’ प्रस्तावात नाशिक जिल्ह्यातील ५९७ गावांचा समावेश असून, त्यांचा अंदाजे रुपये २६१.२२ कोटी रकमेची अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे हाती घेण्याबाबत प्रस्तावित आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यापासून वंचित असलेल्या ५७२ गावांना रुपये ३४९.०२ कोटी रकमेच्या नव्याने पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याबाबत प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे.

सदर प्रस्तावातील जलजीवन मिशन अंतर्गत १,५९७ गावांच्या पाणीपुरवठा योजनांची रुपये ७०४.४५ कोटी रकमेची कामे ही नाशिक जिल्हा परिषद अधिनस्त ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेमार्फत करण्यात येणार असून, उर्वरित ३२५ गावांची रुपये ७४०.०० कोटी रकमेची कामे ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या यंत्रणेमार्फत राबविली जाणार आहेत, त्यामुळे या योजनेच्या पूर्ततेसाठी शासनाने तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केली आहे.