शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

नाशिक जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी दीड लाख लोकांचा संघर्ष; ६३ टँकरची धावाधाव

By अझहर शेख | Updated: June 22, 2023 18:43 IST

पाऊस लांबल्यामुळे वेगाने टंचाईग्रस्त गावे, वाड्यांची आकडे वाढू लागले आहेत.

नाशिक : पाऊस लांबल्यामुळे वेगाने टंचाईग्रस्त गावे, वाड्यांची आकडे वाढू लागले आहेत. आठवडाभरात तहानलेल्या गावांचा आकडा ७१वरून ८२वर पोहचला आहे. जिल्ह्यात १ लाख ३३ हजार ८२ लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मान्सूनने लवकर सलामी न दिल्यास हा आकडा अधिक गंभीर रूप धारण करण्याची श्यक्यता आहे. यामुळे आता जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेची चिंता अधिक वाढली आहे.

जून महिन्याचा अखेरचा आठवडा सुरू झाला असला तरी अद्याप पावसाने जोरदार हजेरी लावलेली नाही. यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईची धग आता वेगाने वाढू लागली आहे. वरुणराजाची कृपादृष्टी होत नसल्यामुळे जिल्ह्यातील ८२ गावांची तहान टँकरद्वारे भागविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा आकडा वाढण्याची श्यक्यता लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यायी वाढीव जलस्त्रोतांचा शोध घेण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहे.

तहानलेली गावे, वाडीवस्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वेगाने वाढणारे टंचाईग्रस्त गावे, वाडीवस्ती यामुळे आता प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

६३ टँकर १७३ फेऱ्या

नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये एकुण ६३ टँकर रस्त्यावर धावत आहेत. या टँकरच्या एकुण १७३ फेऱ्या सध्या सुरू असून टंचाईग्रस्त गावे, वाड्यांवरील लोकांची तहान भागविली जात आहे. वेगाने टँकरची संख्या व फेऱ्या वाढविण्याची गरज भासू लागली आहे. बुधवारी टँकरच्या फेऱ्या १६५ होत्या; मात्र गुरूवारी (दि.२२) हा आकडा १७३वर पोहचला. सर्वाधिक २२ टँकर येवला तालुक्यात सुरू आहे.