शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

नाशिक जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी दीड लाख लोकांचा संघर्ष; ६३ टँकरची धावाधाव

By अझहर शेख | Updated: June 22, 2023 18:43 IST

पाऊस लांबल्यामुळे वेगाने टंचाईग्रस्त गावे, वाड्यांची आकडे वाढू लागले आहेत.

नाशिक : पाऊस लांबल्यामुळे वेगाने टंचाईग्रस्त गावे, वाड्यांची आकडे वाढू लागले आहेत. आठवडाभरात तहानलेल्या गावांचा आकडा ७१वरून ८२वर पोहचला आहे. जिल्ह्यात १ लाख ३३ हजार ८२ लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मान्सूनने लवकर सलामी न दिल्यास हा आकडा अधिक गंभीर रूप धारण करण्याची श्यक्यता आहे. यामुळे आता जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेची चिंता अधिक वाढली आहे.

जून महिन्याचा अखेरचा आठवडा सुरू झाला असला तरी अद्याप पावसाने जोरदार हजेरी लावलेली नाही. यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईची धग आता वेगाने वाढू लागली आहे. वरुणराजाची कृपादृष्टी होत नसल्यामुळे जिल्ह्यातील ८२ गावांची तहान टँकरद्वारे भागविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा आकडा वाढण्याची श्यक्यता लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यायी वाढीव जलस्त्रोतांचा शोध घेण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहे.

तहानलेली गावे, वाडीवस्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वेगाने वाढणारे टंचाईग्रस्त गावे, वाडीवस्ती यामुळे आता प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

६३ टँकर १७३ फेऱ्या

नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये एकुण ६३ टँकर रस्त्यावर धावत आहेत. या टँकरच्या एकुण १७३ फेऱ्या सध्या सुरू असून टंचाईग्रस्त गावे, वाड्यांवरील लोकांची तहान भागविली जात आहे. वेगाने टँकरची संख्या व फेऱ्या वाढविण्याची गरज भासू लागली आहे. बुधवारी टँकरच्या फेऱ्या १६५ होत्या; मात्र गुरूवारी (दि.२२) हा आकडा १७३वर पोहचला. सर्वाधिक २२ टँकर येवला तालुक्यात सुरू आहे.