शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

नाशिक जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी दीड लाख लोकांचा संघर्ष; ६३ टँकरची धावाधाव

By अझहर शेख | Updated: June 22, 2023 18:43 IST

पाऊस लांबल्यामुळे वेगाने टंचाईग्रस्त गावे, वाड्यांची आकडे वाढू लागले आहेत.

नाशिक : पाऊस लांबल्यामुळे वेगाने टंचाईग्रस्त गावे, वाड्यांची आकडे वाढू लागले आहेत. आठवडाभरात तहानलेल्या गावांचा आकडा ७१वरून ८२वर पोहचला आहे. जिल्ह्यात १ लाख ३३ हजार ८२ लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मान्सूनने लवकर सलामी न दिल्यास हा आकडा अधिक गंभीर रूप धारण करण्याची श्यक्यता आहे. यामुळे आता जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेची चिंता अधिक वाढली आहे.

जून महिन्याचा अखेरचा आठवडा सुरू झाला असला तरी अद्याप पावसाने जोरदार हजेरी लावलेली नाही. यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईची धग आता वेगाने वाढू लागली आहे. वरुणराजाची कृपादृष्टी होत नसल्यामुळे जिल्ह्यातील ८२ गावांची तहान टँकरद्वारे भागविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा आकडा वाढण्याची श्यक्यता लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यायी वाढीव जलस्त्रोतांचा शोध घेण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहे.

तहानलेली गावे, वाडीवस्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वेगाने वाढणारे टंचाईग्रस्त गावे, वाडीवस्ती यामुळे आता प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

६३ टँकर १७३ फेऱ्या

नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये एकुण ६३ टँकर रस्त्यावर धावत आहेत. या टँकरच्या एकुण १७३ फेऱ्या सध्या सुरू असून टंचाईग्रस्त गावे, वाड्यांवरील लोकांची तहान भागविली जात आहे. वेगाने टँकरची संख्या व फेऱ्या वाढविण्याची गरज भासू लागली आहे. बुधवारी टँकरच्या फेऱ्या १६५ होत्या; मात्र गुरूवारी (दि.२२) हा आकडा १७३वर पोहचला. सर्वाधिक २२ टँकर येवला तालुक्यात सुरू आहे.