शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

हरिश्चंद्रगडाच्या वाटेवर चमकणारा बाळू रेंगडे नावाचा ‘तारा’ निखळला

By अझहर शेख | Updated: March 6, 2024 16:42 IST

सह्याद्रीवर जीवापाड प्रेम करणारा अन् गिरीभ्रमंतीसाठी त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येक ट्रेकर्सला अतिथी देवो भव: या उक्तीप्रमाणे नि:स्वार्थपणे सेवा देणारा उत्तम माहितगार संकटमोचक गाइड बाळू रेंगडे याला काळाने हिरावून नेले.

नाशिक : सह्याद्रीवर जीवापाड प्रेम करणारा अन् गिरीभ्रमंतीसाठी त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येक ट्रेकर्सला अतिथी देवो भव: या उक्तीप्रमाणे नि:स्वार्थपणे सेवा देणारा उत्तम माहितगार संकटमोचक गाइड बाळू रेंगडे याला काळाने हिरावून नेले. खिरेश्वरचा बाळू हा हरिश्चंद्रगडाच्या वाटेवर चमकणारा तारा होता, अशी भावना नाशिक, पुण्यातील ट्रेकर्स मंडळीसह वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

अहमदनगर, पुणे, ठाणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर उभा असलेल्या हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी विविध वाटा आहेत; मात्र खिरेश्वर मार्ग आणि कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील पाचनई गावातून जाणारा मार्ग ट्रेकर्सच्या पसंतीचा आहे. बाळू हा खिरेश्वरमार्गे पर्यटकांना गडभ्रमंती घडवून आणायचा. त्याच्याकडे असलेल्या इत्यंभूत माहितीचा खजिनाही तो रिता करत गडासह परिसरातील अन्य डोंगर, गड, धबधबे, जंगल, देवराया, जैवविविधतेबाबत इत्यंभूत माहिती दंतकथा तो सांगत असे. निर्व्यसनी बाळूला दुर्धर आजाराने वर्षभरापूर्वी ग्रासले. यामुळे त्याचा मंगळवारी (दि.५) अकाली मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी, वृद्ध आई, वडील, भाऊ, भावजयी असा परिवार आहे.

त्या पाच मित्रांसाठी बाळू ठरला होता ‘देवदूत’ 

मागीलवर्षी ऑगस्टमध्ये पावसाळ्यात गडावर पुण्याच्या हौशी ट्रेकर्सच्या सहाजणांचा एक ग्रुप वाट चुकला होता. दाट धुके, धो-धो कोसळणारा पाऊस अन् झालेल्या अंधारामुळे त्यांना गडावरून खाली उतरता आले नव्हते अन् ते भरकटले होते. थंडी आणि उपासमारीमुळे एकाचा मृत्यूही झाला होता. बाळू रेंगडे याला दुसऱ्या दिवशी जेव्हा माहिती मिळाली, तेव्हा बाळूने कसलीही तमा न बाळगता त्या भरकटलेल्या लोकांच्या शोधासाठी गड चढायला सुरुवात केली. एका मृतदेहाजवळ पाच लोक बसलेले त्याला दिसले. त्यांच्यात एक शाळकरी मुलगाही होता. गावकरी, वन्यजीव विभागाला त्याने माहिती दिली. आपत्कालीन मदत मागविली. भरपावसात जुन्नर रेस्क्यू टीम, वन्यजीव विभाग, पोलिस, स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने बाळूने सलग दोन दिवस रेस्क्यू ऑपरेशन राबवून पाचजणांचे प्राण वाचविले होते. त्यांच्यासाठी तो संकटमोचक ठरला. होता. वन्यजीव विभागाचे तत्कालीन सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, राजूर वनक्षेत्रपाल दत्तात्रय पडवळे यांनी बाळूच्या धाडसाचे कौतुक करत त्याला रोख रक्कम, प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले होते.

बाळूची उणीव नेहमीच भासणार आहे. त्याच्या अकाली निधनाने वन-वन्यजीव विभागाने मोठा दुवा गमावला आहे. कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य राजूर वनपरिक्षेत्र व नाशिक वन्यजीव विभाग त्याच्या कुटुंबीयांच्या नेहमीच पाठीशी आहे.दत्तात्रय पडवळे,प्रभारी सहायक वनसंरक्षकहरिश्चंद्रगडासह सर्वच आजूबाजूच्या गडांची इत्यंभूत माहिती ठेवणारा उत्तम संवादकौशल्य अवगत असलेला तो गाइड होता. वन्यजीव विभागाला बाळूची नेहमीच साथ लाभली. तो वन्यजीव विभागासह पर्यटकांचा विश्वासाचा हक्काचा माणूस होता.गणेश रणदिवे,विभागीय वनाधिकारी, नाशिकबाळू रेंगडे हा उत्तम अभ्यासू गाइड तर होताच मात्र माझ्या लहान भावासारखा होता. त्याच्यामुळेच मला सह्याद्रीला जवळून ओळखता आले. प्रचंड स्वाभिमानी, निस्वार्थी बाळू आयुष्यभर सह्याद्री आणि तेथे येणाऱ्या पर्यटकांवर जीवापाड प्रेम करत राहिला. अखेरचा श्वास घेतानाही त्याने ते प्रेम ‘मला कोकणकड्याला डोळे मिटण्याअगोदर घट्ट मिठी मारायची आहे,’ अशा शब्दांतून व्यक्त केले.ओंकार ओक,ट्रेकर्स, रेस्क्यू समन्वयक, पुणेबाळू हा हरहुन्नरी वाटाड्या. कधीही आणि कुठेही सहज उपलब्ध होणारा. येणाऱ्या कोणत्याही ट्रेकर्सशी मैत्री करणारा होता. हरिश्चंद्रगड हा त्याचा ‘वीक पॉइंट’ होता. या परिसरात कुठेही दुर्घटना घडली तर बाळू असेल तेथून धावत यायचा. कुठलीही अपेक्षा न ठेवता. तो पहिला मदतीचा हात पुढे करायचा. त्याच्या निधनाने सह्याद्रीची मोठी हानी झाली आहे.संजय अमृतकर,गिर्यारोहक, नाशिक

टॅग्स :Nashikनाशिक