शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हरिश्चंद्रगडाच्या वाटेवर चमकणारा बाळू रेंगडे नावाचा ‘तारा’ निखळला

By अझहर शेख | Updated: March 6, 2024 16:42 IST

सह्याद्रीवर जीवापाड प्रेम करणारा अन् गिरीभ्रमंतीसाठी त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येक ट्रेकर्सला अतिथी देवो भव: या उक्तीप्रमाणे नि:स्वार्थपणे सेवा देणारा उत्तम माहितगार संकटमोचक गाइड बाळू रेंगडे याला काळाने हिरावून नेले.

नाशिक : सह्याद्रीवर जीवापाड प्रेम करणारा अन् गिरीभ्रमंतीसाठी त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येक ट्रेकर्सला अतिथी देवो भव: या उक्तीप्रमाणे नि:स्वार्थपणे सेवा देणारा उत्तम माहितगार संकटमोचक गाइड बाळू रेंगडे याला काळाने हिरावून नेले. खिरेश्वरचा बाळू हा हरिश्चंद्रगडाच्या वाटेवर चमकणारा तारा होता, अशी भावना नाशिक, पुण्यातील ट्रेकर्स मंडळीसह वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

अहमदनगर, पुणे, ठाणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर उभा असलेल्या हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी विविध वाटा आहेत; मात्र खिरेश्वर मार्ग आणि कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील पाचनई गावातून जाणारा मार्ग ट्रेकर्सच्या पसंतीचा आहे. बाळू हा खिरेश्वरमार्गे पर्यटकांना गडभ्रमंती घडवून आणायचा. त्याच्याकडे असलेल्या इत्यंभूत माहितीचा खजिनाही तो रिता करत गडासह परिसरातील अन्य डोंगर, गड, धबधबे, जंगल, देवराया, जैवविविधतेबाबत इत्यंभूत माहिती दंतकथा तो सांगत असे. निर्व्यसनी बाळूला दुर्धर आजाराने वर्षभरापूर्वी ग्रासले. यामुळे त्याचा मंगळवारी (दि.५) अकाली मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी, वृद्ध आई, वडील, भाऊ, भावजयी असा परिवार आहे.

त्या पाच मित्रांसाठी बाळू ठरला होता ‘देवदूत’ 

मागीलवर्षी ऑगस्टमध्ये पावसाळ्यात गडावर पुण्याच्या हौशी ट्रेकर्सच्या सहाजणांचा एक ग्रुप वाट चुकला होता. दाट धुके, धो-धो कोसळणारा पाऊस अन् झालेल्या अंधारामुळे त्यांना गडावरून खाली उतरता आले नव्हते अन् ते भरकटले होते. थंडी आणि उपासमारीमुळे एकाचा मृत्यूही झाला होता. बाळू रेंगडे याला दुसऱ्या दिवशी जेव्हा माहिती मिळाली, तेव्हा बाळूने कसलीही तमा न बाळगता त्या भरकटलेल्या लोकांच्या शोधासाठी गड चढायला सुरुवात केली. एका मृतदेहाजवळ पाच लोक बसलेले त्याला दिसले. त्यांच्यात एक शाळकरी मुलगाही होता. गावकरी, वन्यजीव विभागाला त्याने माहिती दिली. आपत्कालीन मदत मागविली. भरपावसात जुन्नर रेस्क्यू टीम, वन्यजीव विभाग, पोलिस, स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने बाळूने सलग दोन दिवस रेस्क्यू ऑपरेशन राबवून पाचजणांचे प्राण वाचविले होते. त्यांच्यासाठी तो संकटमोचक ठरला. होता. वन्यजीव विभागाचे तत्कालीन सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, राजूर वनक्षेत्रपाल दत्तात्रय पडवळे यांनी बाळूच्या धाडसाचे कौतुक करत त्याला रोख रक्कम, प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले होते.

बाळूची उणीव नेहमीच भासणार आहे. त्याच्या अकाली निधनाने वन-वन्यजीव विभागाने मोठा दुवा गमावला आहे. कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य राजूर वनपरिक्षेत्र व नाशिक वन्यजीव विभाग त्याच्या कुटुंबीयांच्या नेहमीच पाठीशी आहे.दत्तात्रय पडवळे,प्रभारी सहायक वनसंरक्षकहरिश्चंद्रगडासह सर्वच आजूबाजूच्या गडांची इत्यंभूत माहिती ठेवणारा उत्तम संवादकौशल्य अवगत असलेला तो गाइड होता. वन्यजीव विभागाला बाळूची नेहमीच साथ लाभली. तो वन्यजीव विभागासह पर्यटकांचा विश्वासाचा हक्काचा माणूस होता.गणेश रणदिवे,विभागीय वनाधिकारी, नाशिकबाळू रेंगडे हा उत्तम अभ्यासू गाइड तर होताच मात्र माझ्या लहान भावासारखा होता. त्याच्यामुळेच मला सह्याद्रीला जवळून ओळखता आले. प्रचंड स्वाभिमानी, निस्वार्थी बाळू आयुष्यभर सह्याद्री आणि तेथे येणाऱ्या पर्यटकांवर जीवापाड प्रेम करत राहिला. अखेरचा श्वास घेतानाही त्याने ते प्रेम ‘मला कोकणकड्याला डोळे मिटण्याअगोदर घट्ट मिठी मारायची आहे,’ अशा शब्दांतून व्यक्त केले.ओंकार ओक,ट्रेकर्स, रेस्क्यू समन्वयक, पुणेबाळू हा हरहुन्नरी वाटाड्या. कधीही आणि कुठेही सहज उपलब्ध होणारा. येणाऱ्या कोणत्याही ट्रेकर्सशी मैत्री करणारा होता. हरिश्चंद्रगड हा त्याचा ‘वीक पॉइंट’ होता. या परिसरात कुठेही दुर्घटना घडली तर बाळू असेल तेथून धावत यायचा. कुठलीही अपेक्षा न ठेवता. तो पहिला मदतीचा हात पुढे करायचा. त्याच्या निधनाने सह्याद्रीची मोठी हानी झाली आहे.संजय अमृतकर,गिर्यारोहक, नाशिक

टॅग्स :Nashikनाशिक