शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वाहनांच्या बाजारालाही मंदीच्या झळा

By नामदेव भोर | Updated: January 12, 2020 15:55 IST

वाहनविक्रीचा व्यवसाय मंदीच्या मार्गावर रडतखडत धावत असतानाच नाशकातील जुन्या वाहनांच्या  बाजारातही खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना उतरती कळा लागली आहे. एकेकाळी जुनी वाहने आणि गाड्यांच्या सुट्या भागांसाठी प्रसिद्ध असलेला नाशिक शहरातील मुंबईनाका, सारडा सर्कल परिसरही  सध्या मंदीचे चटके सोसत आहे.  गेल्या दोन दशकांपासून या भागात वाढलेल्या जुन्या वाहानांच्या सुट्टे भागांच्या बाजारात आता शुकशुकाट दिसून येत आहे.

ठळक मुद्देशहरात वाढतोय जुन्या वाहनांचा खच सेकण्ड हॅण्ड वाहन बाजाराला मंदीच्या झळा ग्राहकांमधली क्रयशक्ती अभावी मागणी घटली

नाशिक : एकीकडे वाहनविक्रीचा व्यवसाय मंदीच्या मार्गावर रडतखडत धावत असतानाच नाशकातील जुन्या वाहनांच्या  बाजारातही खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना उतरती कळा लागली आहे. एकेकाळी जुनी वाहने आणि गाड्यांच्या सुट्या भागांसाठी प्रसिद्ध असलेला नाशिक शहरातील मुंबईनाका, सारडा सर्कल परिसरही  सध्या मंदीचे चटके सोसत आहे.  गेल्या दोन दशकांपासून या भागात वाढलेल्या जुन्या वाहानांच्या सुट्टे भागांच्या बाजारात आता शुकशुकाट दिसून येत आहे. गेल्या तीन ते चार वर्षापासून असलेल्या मंदीच्या प्रभावामुळे  कष्टकरी व कामगार वर्गाच्या क्रयशक्तीत अपेक्षेप्रमाणे वाढ  होऊ न शकल्याने त्याचा परिणाम शहराती जुन्या वाहनांच्या बाजारपेठेवरही होताना दिसून येत असून शहरातील विविध भागातील वापरलेल्या वाहनांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांकडे जुन्या वाहनांचे खच पडल्याचे चित्र दिसून येत आहे. नाशिकमध्ये मुंबई नाका, सारडा सर्कल परिसरात विविध प्रकारच्या जून्या वाहनांचे सर्व सुटे भाग ग्राहकांना मिळतात. या ठिकाणी अनेक वाहनांचे भाग सुटे करण्यासोबतच त्यांची वर्गवारी करून ते व्यापारी वा गॅरेजचालकांना विकले जायचे. अशा सुट्या भागांना बाजारात भरपूर मागणी असते. तेस्वस्तात उपलब्ध होतात. सुट्या भागांच्या खरेदीसाठी वाहनमालक बऱ्याचदा स्वत: येऊन  या बाजारातून सुटे भाग खरेदी करीत. परंतु सध्या या बाजारालाही मंदीच्या झळा बसू लागल्या आहेत. एकीकडे मध्यम वर्गातील ग्राहकांच्या क्रयशक्तीत वाढ होत नसल्याने वाहनांच्या मागणीत झालेली घट आणि आर्थिक दुर्बल वर्गातून मध्यम वर्गात प्रवेश करण्यास उत्सूक वर्गाची असलेल्या घटकाची क्रयशक्तीच निर्माण होत नसल्याने जुन्या वाहन बाजारावरही मंदीचा प्रभाव दिसून येत आहे. त्यामुळे जुन्या आणि वापरलेल्या वाहनांच्या बाजारातही शुकशुक ाट असल्याने अनेक व्यावसायिकांनी नफा कमाविण्याच्या उद्देशाने खरेदी केलेली वाहने, त्यासोबतच विक्रीतून कमीशन मिळविण्यासाठी विक्रीसाठी ठेवलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांचा शहरातील वेहवेगळ््या भागात खच पडल्याचे दिसून येत आहे. किमान व मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांचे आपले स्तःचे घर आणि चारचाकी वाहन असावे असे स्वप्न असते.परंतु उत्पन्न मर्यादा आणि वाहनांच्या वाढणाऱ्या किंमतील यामुळे अनेकां नवीन वाहन खरेदी करणे शक्य होत नाही. अशा ग्राहकांकडून काही दिवस वापरलेल्या जून्या वाहनांना पसंती मिळते. त्यामुळे गेल्या दीड ते दोन दशकांमध्ये वापरलेल्या वाहनांचा बाजार तेजीत होता. परंतु, गेल्या तीन ते चार वर्षात मंदीच्या झळा बसल्याने अनेक उद्योग बंद झाले. तर अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्यामुळे वापरलेल्या वाहनांच्या बाजारावरही त्याचा परिणाम झाला असून वापरलेल्या वाहनाच्या खरेदी विक्रीचे व्यावहारही ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रणाण शासनाच्या परिवहन  विभागाच्या दिवसेंदिवस बदलणाऱ्या नियमांचाही वापरलेल्या वाहनांच्या बाजारावर प्रभाव पडत असल्याचे काही व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.