शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
2
"त्या बाजूला फार बघू नका..., धोका आहे...!", भरसंसदेत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना नेमकं काय म्हणाले खर्गे?
3
सामन्यानंतर विराटला एक प्रश्न विचराला गेला, त्यानं बोलता बोलता BCCI अन् गौतम गंभीरवरच निशाणा साधला, स्पष्टच बोलला
4
१००% पर्यंत माफीची संधी! सीटबेल्ट, सिग्नल तोडणे यांसारख्या ट्रॅफिक चलनांवर मिळणार सूट! कसा करायचा अर्ज?
5
छोटा शेअर, मोठा धमाका, ज्यानं ₹१ लाख गुंतवले, त्याचं मूल्य आज झालं ₹८१ लाख; तुमच्याकडे आहे का?
6
SMAT 2025 : दोन टी-२० सामन्यात नाबाद २१४ धावा! १८ वर्षीय मुंबईकराचा शतकी धडाका
7
परदेशी झगमगाट हवा होता, अन् झाली जैश-ए-मोहम्मदची कमांडर! डॉक्टर शाहीनची ३ निकाहानंतरही एक इच्छा अपूर्ण
8
500 km रेंज, टॉप क्लास फीचर्स; लॉन्चला एक दिवस बाकी; कशी आहे मारुतीची पहिली EV कार?
9
पत्नीने PUBG खेळू दिले नाही, पतीने बायकोची हत्या केली; सहा महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न
10
मार्गशीर्ष भौम प्रदोष २०२५: मंगलदोष मुक्त, हनुमंत प्रसन्न; ‘असे करा’ शिवव्रत, शुभ-लाभ होतील!
11
५० वर्षांनी चतुर्ग्रही योग: ९ राशींना कल्पनेपलीकडे चौफेर लाभ; चौपट नफा-फायदा, मनासारखा काळ!
12
पराभवाच्या चर्चेने विरोधक संतप्त, नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेची आठवण करून दिली
13
उघडताच पूर्ण भरला 'हा' IPO; ग्रे मार्केट प्रीमिअमवरुन बंपर लिस्टिंगची शक्यता, पाहा डिटेल्स
14
Renuka Chaudhary: चक्क श्वानाला घेऊन काँग्रेस खासदार संसदेत पोहचल्या; सत्ताधारी भाजपानं घातला गोंधळ, काय घडलं?
15
मोठा निष्काळजीपणा! मध्य प्रदेशात ५० वर्षे जुना पूल कोसळला; १० जण जखमी
16
अर्थव्यवस्थेसाठी 'चिंताजनक' बातमी! रुपया डॉलरपुढे गडगडला, सर्वसामान्यांच्या खिशावर थेट होणार परिणाम!
17
अमेरिकेत भारतीय IT कर्मचाऱ्यांसाठी 'टेन्शन'! H-1B व्हिसा मिळणं ७०% नी घटलं; TCS चाही रिजेक्शन रेट वाढला!
18
अफगाणिस्तानने उघडला नवा मार्ग, पाकिस्तानमध्ये हाहाकार; सीमेवरील व्यापार बंदीचा उलटाच झाला परिणाम
19
Holiday: डिसेंबरमध्ये शेअर बाजारात ९ दिवस कामकाज बंद! तुमचं ट्रेडिंग प्लॅनिंग आजच करा! ही घ्या सुट्टीची संपूर्ण यादी
20
यशस्वीची 'तेरे नाम' हेअर स्टाइल पाहून विराटमध्ये अवतरला सलमान; "लगन लगी.." स्टेप्सचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तेल्या रोगामुळे सात एकर डाळिंब बाग तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 00:54 IST

मर व तेल्या रोगामुळे कंटाळून येथील डाळिंब उत्पादक शेतकरी अशोक काशीनाथ शिरोडे यांनी त्यांचे सात एकर क्षेत्रातील २५०० डाळिंबाचे झाडे मुळासकट काढून टाकली. दर वर्षभर डाळिंब बाग जिवंत ठेवण्यासाठी अनेक महागडी औषधे फवारणी करूनही रोग या परिसरात आटोक्यात येत नसल्याने परिसरातील डाळिंब बागा संपुष्टात येण्याच्या स्थितीत आहेत.

ठळक मुद्दे२५०० झाडे नष्ट : औषध फवारणीचा खर्च वाया, शेतकरी हवालदिल

ब्राह्मणगाव : मर व तेल्या रोगामुळे कंटाळून येथील डाळिंब उत्पादक शेतकरी अशोक काशीनाथ शिरोडे यांनी त्यांचे सात एकर क्षेत्रातील २५०० डाळिंबाचे झाडे मुळासकट काढून टाकली. दर वर्षभर डाळिंब बाग जिवंत ठेवण्यासाठी अनेक महागडी औषधे फवारणी करूनही रोग या परिसरात आटोक्यात येत नसल्याने परिसरातील डाळिंब बागा संपुष्टात येण्याच्या स्थितीत आहेत.

गेल्या तीन चार महिन्यांपूर्वीच डाळिंब बागेवर तेल्या, मर रोगाने आघात केल्याने तसेच गेल्या चार-पाच वर्षांपासून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, व अन्य नैसर्गिक संकटांना शेतकरी वर्ग कंटाळला आहे. सततच्या या आपत्तींना कंटाळून येथील डाळिंब उत्पादक व तंटा मुक्ती समिती अध्यक्ष ज्ञानदेव दोधू अहिरे यांनी डाळिंबाची बाग, तर मविप्र शिक्षण संस्थेचे उपसभापती राघो अहिरे यांची शेतातील डाळिंब बाग जेसीबीच्या साहाय्याने बुडा सकट काढून टाकली. नैसर्गिक आपत्तीबरोबर सततच्या अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे डाळिंब फळ पिकावर मोठी अवकळा आली असून, त्यामुळे बऱ्याच द्राक्ष व डाळिंब बाग कुऱ्हाडीने बुडा सकट तोडून टाकल्या जात आहेत. यामुळे परिसरातील डाळिंब, द्राक्षबागांची संख्या मोठ्या प्रमाणात घटू लागल्या असून, शेतकरी निसर्गापुढे हतबल झाला आहे. खरे पाहता फळबागांविनाच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली होती.

------------------------

शेतकऱ्यांना आर्थिक फटका

गेल्या चार-पाच वर्षांपासून शेती व्यवसायावर नैसर्गिक संकटांना शेतकऱ्यांना सारखे तोंड द्यावे लागत आहे. तरीही शेतकरी मोठी आर्थिक झळ सोसत शेती व्यवसाय करत आहे. मात्र सध्या अचानक येणारे ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, अती ऊन, त्यातच पिकांवरील महागडी औषधे, वाढती शेतमजुरी, पिकांना उत्पन्नापेक्षा मिळणारा भाव, यात होणारे सर्व नुकसान याला कंटाळून या आधी ये थिल डाळिंब उत्पादक रमेश अहिरे, चंद्रकांत अहिरे, योगेश अहिरे यांनीही डाळिंब बाग व द्राक्षबाग जेसीबीच्या साहाय्याने बुडा सकट तोडून टाकल्या आहेत. त्यातच पुन्हा डाळिंब उत्पादक शेतकरी अशोक काशीनाथ शिरोडे यांनी त्यांची सात एकर क्षेत्रातील डाळिंब बाग तोडली असल्याने गावातील डाळिंब बागांचे क्षेत्र संपुष्टात येण्याचे स्थितीत आहे.

-----------------------

 

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती