शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

तेल्या रोगामुळे सात एकर डाळिंब बाग तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 00:54 IST

मर व तेल्या रोगामुळे कंटाळून येथील डाळिंब उत्पादक शेतकरी अशोक काशीनाथ शिरोडे यांनी त्यांचे सात एकर क्षेत्रातील २५०० डाळिंबाचे झाडे मुळासकट काढून टाकली. दर वर्षभर डाळिंब बाग जिवंत ठेवण्यासाठी अनेक महागडी औषधे फवारणी करूनही रोग या परिसरात आटोक्यात येत नसल्याने परिसरातील डाळिंब बागा संपुष्टात येण्याच्या स्थितीत आहेत.

ठळक मुद्दे२५०० झाडे नष्ट : औषध फवारणीचा खर्च वाया, शेतकरी हवालदिल

ब्राह्मणगाव : मर व तेल्या रोगामुळे कंटाळून येथील डाळिंब उत्पादक शेतकरी अशोक काशीनाथ शिरोडे यांनी त्यांचे सात एकर क्षेत्रातील २५०० डाळिंबाचे झाडे मुळासकट काढून टाकली. दर वर्षभर डाळिंब बाग जिवंत ठेवण्यासाठी अनेक महागडी औषधे फवारणी करूनही रोग या परिसरात आटोक्यात येत नसल्याने परिसरातील डाळिंब बागा संपुष्टात येण्याच्या स्थितीत आहेत.

गेल्या तीन चार महिन्यांपूर्वीच डाळिंब बागेवर तेल्या, मर रोगाने आघात केल्याने तसेच गेल्या चार-पाच वर्षांपासून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, व अन्य नैसर्गिक संकटांना शेतकरी वर्ग कंटाळला आहे. सततच्या या आपत्तींना कंटाळून येथील डाळिंब उत्पादक व तंटा मुक्ती समिती अध्यक्ष ज्ञानदेव दोधू अहिरे यांनी डाळिंबाची बाग, तर मविप्र शिक्षण संस्थेचे उपसभापती राघो अहिरे यांची शेतातील डाळिंब बाग जेसीबीच्या साहाय्याने बुडा सकट काढून टाकली. नैसर्गिक आपत्तीबरोबर सततच्या अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे डाळिंब फळ पिकावर मोठी अवकळा आली असून, त्यामुळे बऱ्याच द्राक्ष व डाळिंब बाग कुऱ्हाडीने बुडा सकट तोडून टाकल्या जात आहेत. यामुळे परिसरातील डाळिंब, द्राक्षबागांची संख्या मोठ्या प्रमाणात घटू लागल्या असून, शेतकरी निसर्गापुढे हतबल झाला आहे. खरे पाहता फळबागांविनाच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली होती.

------------------------

शेतकऱ्यांना आर्थिक फटका

गेल्या चार-पाच वर्षांपासून शेती व्यवसायावर नैसर्गिक संकटांना शेतकऱ्यांना सारखे तोंड द्यावे लागत आहे. तरीही शेतकरी मोठी आर्थिक झळ सोसत शेती व्यवसाय करत आहे. मात्र सध्या अचानक येणारे ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, अती ऊन, त्यातच पिकांवरील महागडी औषधे, वाढती शेतमजुरी, पिकांना उत्पन्नापेक्षा मिळणारा भाव, यात होणारे सर्व नुकसान याला कंटाळून या आधी ये थिल डाळिंब उत्पादक रमेश अहिरे, चंद्रकांत अहिरे, योगेश अहिरे यांनीही डाळिंब बाग व द्राक्षबाग जेसीबीच्या साहाय्याने बुडा सकट तोडून टाकल्या आहेत. त्यातच पुन्हा डाळिंब उत्पादक शेतकरी अशोक काशीनाथ शिरोडे यांनी त्यांची सात एकर क्षेत्रातील डाळिंब बाग तोडली असल्याने गावातील डाळिंब बागांचे क्षेत्र संपुष्टात येण्याचे स्थितीत आहे.

-----------------------

 

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती