शहरं
Join us  
Trending Stories
1
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
2
सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश
3
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
4
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
5
Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट
6
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
7
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
8
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
9
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
10
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
11
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
12
SIR च्या कामाचा भार असह्य; वरिष्ठाच्या धमक्यांना कंटाळून शिक्षकाची रेल्वेखाली उडी, एकाच दिवशी दोन कर्मचाऱ्यांचे टोकाचे पाऊल
13
Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?
14
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
15
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
16
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
17
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
18
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
19
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
20
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
Daily Top 2Weekly Top 5

तेल गेले...तूपही गेले... दोन रुपये किलो : शेतकरी हवालदिल टमाटा भावात जिल्ह्यात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:39 IST

सायखेडा/वणी : खरीप हंगामातील महत्त्वाच्या असलेल्या टमाट्याचे बाजारभाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

ठळक मुद्देटमाट्याला ४० ते सरासरी ८० रुपये भाव वाहतूक खर्चदेखील वसूल नाही

सायखेडा/वणी : खरीप हंगामातील महत्त्वाच्या असलेल्या टमाट्याचे बाजारभाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. वणीसह पिंपळगाव बाजार समितीत २० किलो कॅरेटसाठी टमाट्याला ४० ते सरासरी ८० रुपये भाव मिळाला. काल ४७५१ इतके कमी कॅरेट आवक असूनही बाजारभाव अत्यंत कमी मिळाल्याने उत्पादकांमध्ये नाराजी पसरली आहे. हिवाळी टमाटे पिकातून चांगले आर्थिक उत्पन्न होईल या आशेने अनेक शेतकºयांनी शेतात खरीप हंगामातील पीक म्हणून टमाटे पिकाची लागवड केली होती. यंदा पावसाळ्यात चांगला भाव मिळाला असल्याने शेतकºयांनी पुन्हा त्या आशेवर टमाट्याची लागवड केली. पीक चांगले व्हावे म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून ड्रिप, मल्चिंग पेपर, रोपवाटिकेतील रोपे, जैविक खते, रासायनिक खते, महागडी कीटकनाशके, औषधे, वापरून पीक जोमात तयार केले; मात्र बाजारभाव कमी झाल्यामुळे खर्चसुद्धा भरून निघणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. २ रुपये किलो दराने विक्री होत असलेले टमाटे शेतातून तोडणी करून बाजार समितीपर्यंत येणारा वाहतूक खर्चदेखील वसूल होत नाही. अनेक शेतकºयांनी शेतातून तोडणी करण्याचे बंद केले आहे, तर काहींंनी नाईलाजाने उभ्या पिकात जनावरे चरण्यासाठी सोडून दिली आहेत.द्राक्ष हंगाम सुरू झाल्याने अनेक व्यापारी टमाट्याची खरेदी बंद करून द्राक्ष खरेदीकडे वळत आहे शिवाय द्राक्षाचे बाजारभावसुद्धाकमी असल्याने छोट्या व्यापाºयांचा खरेदीचा कल वाढला आहे, त्यामुळे टमाटे खरेदी करण्यासाठी व्यापाºयांचे प्रमाण कमी झाल्याने बाजार समितीत चढाओढ कमी झाल्याने आणि भरपूर प्रमाणात आवक येत असल्याने भाव कमी झाल्याचे बोलले जात आहे.कांद्याप्रमाणे टमाटे पीक मोठ्या प्रमाणात निर्यात व्हावे, निर्यातीच्या अटी आणि शर्ती शिथिल कराव्या म्हणजे टमाटे पिकाला चांगला बाजारभाव मिळेल. नगदी पीक म्हणून टमाटे शेतकºयांना चार पैसे मिळवून देतील अशी मागणी अनेक शेतकरी करीत आहे.यंदा कांद्याची रोपे कमी वाढत्या थंडीमुळे आणि बेमोसमी पावसामुळे खराब झाली होती. त्यामुळे कांदा कमी लागला, कांदा कमी असल्यामुळे नगदी पीक म्हणून अनेक शेतकºयांनी टमाटे पिकाची लागवड केली आहे. त्यात भाव गडगडल्यामुळे काही शेतकरी पाण्यापासून व टमाटे या दोन्ही पिकांपासून हुकले असल्याने कर्जबाजारी झाले आहेत. तेल गेले, तूपही गेले हाती धुपाटणे आले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.द्राक्ष उत्पादक चिंतेतद्राक्ष बागायतदार शेतकरी हवामानातील बदलामुळे चिंताग्रस्तझाले आहेत. निफाडसह जिल्ह्याच्या काही भागात द्राक्ष बागांवर डावण्या आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. उत्तर भारतात अतिप्रमाणात असलेल्या थंडीमुळे द्राक्षाला मागणी नसल्याने भाव पडल्याचे व्यापाºयांकडून सांगितले जात असले तरी हंगामात बाजारभाव कमी असल्याने द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत.