शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

पदभार सांभाळण्यास अधिकाऱ्यांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:46 IST

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारीपदी येण्यास अधिकारी नाखूष असून, गेल्या पाच वर्षांत २५ अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली, मात्र अवघ्या महिना, दोन महिन्यांतच त्यांनी बदली करून घेतली आहे. अधिकाºयांच्या या अनुत्सुकतेमुळे विभागाचे कामकाज रखडले असून, त्याच्या नाराजीचा सामना विद्यमान प्रभारी अधिकाºयांना करावा लागत असल्याने त्यांनीदेखील समाजकल्याण खात्याचा अतिरिक्त पदभार नको, असे म्हणत मुख्य कार्यकारी अधिकारी व समाजकल्याण सभापतींना पत्र देऊन साकडे घातले आहे.

ठळक मुद्देसमाजकल्याण विभाग : पाच वर्षांत २५ अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारीपदी येण्यास अधिकारी नाखूष असून, गेल्या पाच वर्षांत २५ अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली, मात्र अवघ्या महिना, दोन महिन्यांतच त्यांनी बदली करून घेतली आहे. अधिकाºयांच्या या अनुत्सुकतेमुळे विभागाचे कामकाज रखडले असून, त्याच्या नाराजीचा सामना विद्यमान प्रभारी अधिकाºयांना करावा लागत असल्याने त्यांनीदेखील समाजकल्याण खात्याचा अतिरिक्त पदभार नको, असे म्हणत मुख्य कार्यकारी अधिकारी व समाजकल्याण सभापतींना पत्र देऊन साकडे घातले आहे.जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागासाठी राज्य सरकारकडून गेल्या पाच वर्षांत सात अधिकाºयांची नियमित म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यातील सतीश वळवी या अधिकाºयाचीच सहा वेळा अवघ्या दीड ते दोन महिन्यांत बदली करून पुन्हा नियुक्ती करण्याचा प्रकार घडला आहे. नियमित अधिकारी शासनाकडून मिळत नसल्याने जिल्हा परिषदेच्या अन्य अधिकाºयांकडे अतिरिक्त पदभार देऊन समाजकल्याणचा गाडा चालविला जात असला तरी, संबंधित अधिकाºयांना त्यांच्या खात्याचा दैनंदिन कारभार पाहूनच समाजकल्याणच्या कामावर लक्ष द्यावे लागते.अतिरिक्त पदभार असलेल्या अधिकाºयाला महत्त्वाचे वा धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसल्यामुळे त्यांच्याकडून अत्यावश्यक बाबींमध्येच हस्तक्षेप होतो. त्यामुळे या खात्याचे रखडलेले काम पाहता, जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्याकडे जानेवारी महिन्यात समाजकल्याण विभागाचा अतिरिक्तपदभार देण्यात आला, मात्र त्यांच्याकडे अगोदरच रोजगार हमी योजना, ग्रामपंचायत विभागासारखे महत्त्वाच्या खात्याचा कारभार असून, त्या विभागाच्या कामांचा व्याप मोठा आहे. अशा परिस्थितीत समाजकल्याण विभागाच्या कामकाजाचीही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याने कामाचा बोझा वाढला आहे. स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत समाजकल्याण विभागाच्या प्रश्नांवरून परदेशी यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांनी आपल्याकडे अतिरिक्तपदभार नको असे म्हणत समाजकल्याण सभापती व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पत्र देऊन पदभार सोडण्याची विनंती केली आहे.परिणामी खात्याचे दैनंदिन कामकाज बाजूला पडते. त्यामुळे राज्याच्या समाजकल्याण विभागाच्या काही अधिकाºयांकडे यापूर्वी अतिरिक्तपदभार देण्याचा प्रयोग करून पाहण्यात आला, परंतु कामकाजाचा व्याप पाहता, त्या अधिकाºयांनीही स्वत:हून पदभार सोडून आपल्या मूळ जागेवरच राहणे पसंत केले आहे. अशा प्रकारे आजवर २५ अधिकाºयांनी या खात्याच्या कारभाराचा अनुभव घेतला. नाशिक जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचे एकूण बजेट व आठ तालुके आदिवासी असल्याचे पाहून कामाचा मोठा व्याप असून, त्यातच गेल्या तीन वर्षांपासून या खात्यासाठी मोठी तरतूद करण्यात येऊनही वेळेत निधी खर्च करण्यात खात्याला अपयश आले आहे.

टॅग्स :Governmentसरकारzpजिल्हा परिषद