शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पदभार सांभाळण्यास अधिकाऱ्यांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:46 IST

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारीपदी येण्यास अधिकारी नाखूष असून, गेल्या पाच वर्षांत २५ अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली, मात्र अवघ्या महिना, दोन महिन्यांतच त्यांनी बदली करून घेतली आहे. अधिकाºयांच्या या अनुत्सुकतेमुळे विभागाचे कामकाज रखडले असून, त्याच्या नाराजीचा सामना विद्यमान प्रभारी अधिकाºयांना करावा लागत असल्याने त्यांनीदेखील समाजकल्याण खात्याचा अतिरिक्त पदभार नको, असे म्हणत मुख्य कार्यकारी अधिकारी व समाजकल्याण सभापतींना पत्र देऊन साकडे घातले आहे.

ठळक मुद्देसमाजकल्याण विभाग : पाच वर्षांत २५ अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारीपदी येण्यास अधिकारी नाखूष असून, गेल्या पाच वर्षांत २५ अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली, मात्र अवघ्या महिना, दोन महिन्यांतच त्यांनी बदली करून घेतली आहे. अधिकाºयांच्या या अनुत्सुकतेमुळे विभागाचे कामकाज रखडले असून, त्याच्या नाराजीचा सामना विद्यमान प्रभारी अधिकाºयांना करावा लागत असल्याने त्यांनीदेखील समाजकल्याण खात्याचा अतिरिक्त पदभार नको, असे म्हणत मुख्य कार्यकारी अधिकारी व समाजकल्याण सभापतींना पत्र देऊन साकडे घातले आहे.जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागासाठी राज्य सरकारकडून गेल्या पाच वर्षांत सात अधिकाºयांची नियमित म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यातील सतीश वळवी या अधिकाºयाचीच सहा वेळा अवघ्या दीड ते दोन महिन्यांत बदली करून पुन्हा नियुक्ती करण्याचा प्रकार घडला आहे. नियमित अधिकारी शासनाकडून मिळत नसल्याने जिल्हा परिषदेच्या अन्य अधिकाºयांकडे अतिरिक्त पदभार देऊन समाजकल्याणचा गाडा चालविला जात असला तरी, संबंधित अधिकाºयांना त्यांच्या खात्याचा दैनंदिन कारभार पाहूनच समाजकल्याणच्या कामावर लक्ष द्यावे लागते.अतिरिक्त पदभार असलेल्या अधिकाºयाला महत्त्वाचे वा धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसल्यामुळे त्यांच्याकडून अत्यावश्यक बाबींमध्येच हस्तक्षेप होतो. त्यामुळे या खात्याचे रखडलेले काम पाहता, जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्याकडे जानेवारी महिन्यात समाजकल्याण विभागाचा अतिरिक्तपदभार देण्यात आला, मात्र त्यांच्याकडे अगोदरच रोजगार हमी योजना, ग्रामपंचायत विभागासारखे महत्त्वाच्या खात्याचा कारभार असून, त्या विभागाच्या कामांचा व्याप मोठा आहे. अशा परिस्थितीत समाजकल्याण विभागाच्या कामकाजाचीही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याने कामाचा बोझा वाढला आहे. स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत समाजकल्याण विभागाच्या प्रश्नांवरून परदेशी यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांनी आपल्याकडे अतिरिक्तपदभार नको असे म्हणत समाजकल्याण सभापती व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पत्र देऊन पदभार सोडण्याची विनंती केली आहे.परिणामी खात्याचे दैनंदिन कामकाज बाजूला पडते. त्यामुळे राज्याच्या समाजकल्याण विभागाच्या काही अधिकाºयांकडे यापूर्वी अतिरिक्तपदभार देण्याचा प्रयोग करून पाहण्यात आला, परंतु कामकाजाचा व्याप पाहता, त्या अधिकाºयांनीही स्वत:हून पदभार सोडून आपल्या मूळ जागेवरच राहणे पसंत केले आहे. अशा प्रकारे आजवर २५ अधिकाºयांनी या खात्याच्या कारभाराचा अनुभव घेतला. नाशिक जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचे एकूण बजेट व आठ तालुके आदिवासी असल्याचे पाहून कामाचा मोठा व्याप असून, त्यातच गेल्या तीन वर्षांपासून या खात्यासाठी मोठी तरतूद करण्यात येऊनही वेळेत निधी खर्च करण्यात खात्याला अपयश आले आहे.

टॅग्स :Governmentसरकारzpजिल्हा परिषद