शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

विकास यंत्रणेचे अधिकारीही आयोगाच्या कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 1:12 AM

नाशिक : राज्यातील लोकसभा निवडणूक निष्पक्षपणे पार पाडण्याचा विडा उचललेल्या निवडणूक आयोगाने गेल्या तीन वर्षांपासून ज्यांच्याकडून निवडणुकीशी संबंधित महत्त्वाची कामे करवून घेतली, अशा महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या धोरणाआड कुचंबणा चालविली असताना त्यात आता ग्रामीण विकास यंत्रणा म्हणजेच जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांनाही आयोगाने आपल्या कचाट्यात ओढले आहे.

ठळक मुद्देआव्हान देण्याची तयारी : निवडणुकीशी संबंध नसताना बदल्या; आयोगाच्या धोरणाबाबत प्रश्नचिन्ह

श्याम बागुल ।नाशिक : राज्यातील लोकसभा निवडणूक निष्पक्षपणे पार पाडण्याचा विडा उचललेल्या निवडणूक आयोगाने गेल्या तीन वर्षांपासून ज्यांच्याकडून निवडणुकीशी संबंधित महत्त्वाची कामे करवून घेतली, अशा महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या धोरणाआड कुचंबणा चालविली असताना त्यात आता ग्रामीण विकास यंत्रणा म्हणजेच जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांनाही आयोगाने आपल्या कचाट्यात ओढले आहे.विशेष म्हणजे ग्राम विकास विभागाचा कोणत्याही निवडणुकीशी थेट अथवा अप्रत्यक्ष कोणताही संबंध नसताना त्याचबरोबर गेल्या लोकसभा निवडणुकीत अशा कोणत्याही प्रकारच्या बदल्या करण्यात आलेल्या नसताना यंदाच आयोगाने अशा प्रकारच्या बदल्या करण्याचे धोरण स्वीकारून नेमके काय साधले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.महसूल विभागाच्या बदल्याआड जोरदार देव-घेव सुरू झाल्याची चर्चा राज्यभर शासकीय अधिकाºयांमध्ये चर्चिली जात असताना त्यात आता ग्राम विकासच्या अधिकाºयांची भर पडणार आहे. ते टाळण्यासाठी राज्य विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने अगोदर शासनाला पत्र देऊन मुख्य बाबींकडे लक्ष वेधले असून, त्यानंतर थेट बदल्यांना न्यायालयात आव्हान देण्याची तयारी चालविली आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार मुळात निवडणूक आयोगाने निवडणुकीशी संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक अधिकारी, सहायक अधिकारी अशा निवडणुकीशी संबंधित असलेल्यांचे तसेच तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकाºयांचा स्वजिल्हा असेल व ते सलग तीन वर्षे एकाच जिल्ह्णात कार्यरत नसतील तर त्यांच्या बदल्या केल्या जाव्यात, असे धोरण ठरविले आहे; मात्र निवडणुकीशी थेट संबंध असणाºयांच्या बदल्या करू नये असेही आयोगाने नमूद केलेले आहे. त्यामुळे निवडणुकीशी संबंधित पदांमध्ये गटविकास अधिकारी म्हणजेच बीडीओ हे पद निवडणुकीशी थेट संबंधित नाही.त्यामुळे ज्यांचा निवडणूक प्रक्रियेशी काही संबंधच नाही त्यांच्या बदल्या करण्यामागच्या कारणांचा उलगडा अधिकाºयांना होत नाही. आयोगाने दिलेल्या पत्रानुसार जर गटविकास अधिकाºयाच्या बदल्या केल्या तर प्रत्येक जिल्ह्यात सरासरी ७ ते ८ अधिकाºयांच्या बदल्या होतील म्हणजे राज्यातील २५० ते ३०० बदल्या होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास विकास यंत्रणेचे व्यवस्थापन कोलमडून पडणार असून, राज्यात दुष्काळी परिस्थिती व पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई एकीकडे निर्माण झालेली असताना अशा परिस्थितीत गटविकास अधिकाºयांच्या बदल्यांचा या साºया उपाययोजनांवर परिणाम होणार असल्याची बाब संघटनेने शासनाच्या निदर्शनास आणून दिली असून, त्यासाठी राज्यभरातील गटविकास अधिकाºयांच्या स्वाक्षरीचे निवेदनही सादर करण्यात आलेले आहे. अधिकारीवर्ग हवालदिलमहाराष्टÑ विकास सेवा गटचे अधिकाºयांनी यापूर्वी जिल्हा निवडणूक अधिकाºयांनी वेळोवेळी सोपविलेल्या निवडणुकीसंबंधित जबाबदाºया पूर्ण क्षमतेने पार पाडल्या असून, यापूर्वीही अनेक निवडणुकांमध्ये इतर विभागातील अधिकाºयांप्रमाणे क्षेत्रीय अधिकारी पदाची जबाबदारी गटविकास अधिकाºयांनी पार पाडली आहे. परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाने बदल्यांचे धोरण ठरविताना सेक्टर अधिकारी व झोनल अधिकाºयांचा निवडणूक कामांशी थेट संबंध जोडू नये असे म्हटलेले असतानाही ग्रामविकास विभागाने २४ जानेवारी रोजी या संदर्भातील पत्र काढून बदल्या करण्याचे ठरविल्याने विकास यंत्रणेचे अधिकारीही हवालदिल झाले आहेत.