शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

विकास यंत्रणेचे अधिकारीही आयोगाच्या कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 01:12 IST

नाशिक : राज्यातील लोकसभा निवडणूक निष्पक्षपणे पार पाडण्याचा विडा उचललेल्या निवडणूक आयोगाने गेल्या तीन वर्षांपासून ज्यांच्याकडून निवडणुकीशी संबंधित महत्त्वाची कामे करवून घेतली, अशा महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या धोरणाआड कुचंबणा चालविली असताना त्यात आता ग्रामीण विकास यंत्रणा म्हणजेच जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांनाही आयोगाने आपल्या कचाट्यात ओढले आहे.

ठळक मुद्देआव्हान देण्याची तयारी : निवडणुकीशी संबंध नसताना बदल्या; आयोगाच्या धोरणाबाबत प्रश्नचिन्ह

श्याम बागुल ।नाशिक : राज्यातील लोकसभा निवडणूक निष्पक्षपणे पार पाडण्याचा विडा उचललेल्या निवडणूक आयोगाने गेल्या तीन वर्षांपासून ज्यांच्याकडून निवडणुकीशी संबंधित महत्त्वाची कामे करवून घेतली, अशा महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या धोरणाआड कुचंबणा चालविली असताना त्यात आता ग्रामीण विकास यंत्रणा म्हणजेच जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांनाही आयोगाने आपल्या कचाट्यात ओढले आहे.विशेष म्हणजे ग्राम विकास विभागाचा कोणत्याही निवडणुकीशी थेट अथवा अप्रत्यक्ष कोणताही संबंध नसताना त्याचबरोबर गेल्या लोकसभा निवडणुकीत अशा कोणत्याही प्रकारच्या बदल्या करण्यात आलेल्या नसताना यंदाच आयोगाने अशा प्रकारच्या बदल्या करण्याचे धोरण स्वीकारून नेमके काय साधले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.महसूल विभागाच्या बदल्याआड जोरदार देव-घेव सुरू झाल्याची चर्चा राज्यभर शासकीय अधिकाºयांमध्ये चर्चिली जात असताना त्यात आता ग्राम विकासच्या अधिकाºयांची भर पडणार आहे. ते टाळण्यासाठी राज्य विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने अगोदर शासनाला पत्र देऊन मुख्य बाबींकडे लक्ष वेधले असून, त्यानंतर थेट बदल्यांना न्यायालयात आव्हान देण्याची तयारी चालविली आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार मुळात निवडणूक आयोगाने निवडणुकीशी संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक अधिकारी, सहायक अधिकारी अशा निवडणुकीशी संबंधित असलेल्यांचे तसेच तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकाºयांचा स्वजिल्हा असेल व ते सलग तीन वर्षे एकाच जिल्ह्णात कार्यरत नसतील तर त्यांच्या बदल्या केल्या जाव्यात, असे धोरण ठरविले आहे; मात्र निवडणुकीशी थेट संबंध असणाºयांच्या बदल्या करू नये असेही आयोगाने नमूद केलेले आहे. त्यामुळे निवडणुकीशी संबंधित पदांमध्ये गटविकास अधिकारी म्हणजेच बीडीओ हे पद निवडणुकीशी थेट संबंधित नाही.त्यामुळे ज्यांचा निवडणूक प्रक्रियेशी काही संबंधच नाही त्यांच्या बदल्या करण्यामागच्या कारणांचा उलगडा अधिकाºयांना होत नाही. आयोगाने दिलेल्या पत्रानुसार जर गटविकास अधिकाºयाच्या बदल्या केल्या तर प्रत्येक जिल्ह्यात सरासरी ७ ते ८ अधिकाºयांच्या बदल्या होतील म्हणजे राज्यातील २५० ते ३०० बदल्या होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास विकास यंत्रणेचे व्यवस्थापन कोलमडून पडणार असून, राज्यात दुष्काळी परिस्थिती व पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई एकीकडे निर्माण झालेली असताना अशा परिस्थितीत गटविकास अधिकाºयांच्या बदल्यांचा या साºया उपाययोजनांवर परिणाम होणार असल्याची बाब संघटनेने शासनाच्या निदर्शनास आणून दिली असून, त्यासाठी राज्यभरातील गटविकास अधिकाºयांच्या स्वाक्षरीचे निवेदनही सादर करण्यात आलेले आहे. अधिकारीवर्ग हवालदिलमहाराष्टÑ विकास सेवा गटचे अधिकाºयांनी यापूर्वी जिल्हा निवडणूक अधिकाºयांनी वेळोवेळी सोपविलेल्या निवडणुकीसंबंधित जबाबदाºया पूर्ण क्षमतेने पार पाडल्या असून, यापूर्वीही अनेक निवडणुकांमध्ये इतर विभागातील अधिकाºयांप्रमाणे क्षेत्रीय अधिकारी पदाची जबाबदारी गटविकास अधिकाºयांनी पार पाडली आहे. परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाने बदल्यांचे धोरण ठरविताना सेक्टर अधिकारी व झोनल अधिकाºयांचा निवडणूक कामांशी थेट संबंध जोडू नये असे म्हटलेले असतानाही ग्रामविकास विभागाने २४ जानेवारी रोजी या संदर्भातील पत्र काढून बदल्या करण्याचे ठरविल्याने विकास यंत्रणेचे अधिकारीही हवालदिल झाले आहेत.