शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
5
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
6
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
7
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
8
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
9
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
10
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
11
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
12
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
13
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
14
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
15
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
16
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
17
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
18
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
19
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
20
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा

प्लॅस्टिकबंदीबाबत  अधिकाºयांनी व्यापक जनजागृती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:53 IST

संपूर्ण राज्यात गुढीपाडव्यापासून प्लॅस्टिकबंदी केली जाणार आहे. केवळ वापरावरच नव्हे तर निर्मिती आणि खरेदी-विक्रीही कायद्यानुसार बंद केली जाणार असल्याने या बंदीबाबत अधिकाºयांनी व्यापक जनजागृती मोहीम राबविली पाहिजे, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले.

नाशिक : संपूर्ण राज्यात गुढीपाडव्यापासून प्लॅस्टिकबंदी केली जाणार आहे. केवळ वापरावरच नव्हे तर निर्मिती आणि खरेदी-विक्रीही कायद्यानुसार बंद केली जाणार असल्याने या बंदीबाबत अधिकाºयांनी व्यापक जनजागृती मोहीम राबविली पाहिजे, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले.  नाशिकरोड येथील जलविज्ञान संशोधन प्रबोधिनी येथे पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि पर्यावरण विभागाचे सचिव सतीश गवई तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अलबन्नग, विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन आदी उपस्थित होते. प्लॅस्टिकबंदी धोरण राबविण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कदम म्हणाले, केवळ शासनाने निर्णय घेऊन चालणार नाही, त्यात लोकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. प्लॅस्टिकमुक्त समाज निर्माण करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रत्येक विभागाने प्लॅस्टिकमुक्तीच्या योजना, उपक्रम राबविले पाहिजे. काही अभिनव कल्पना असतील तर त्यांचा अवलंब केला पाहिजे. विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला पाहिजे. प्लॅस्टिकचे काय दुष्परिणाम होतात याबाबत समाजातील प्रत्येक घटकाला  जाऊन सांगितले पाहिजे. त्यांनाही प्लॅस्टिकबंदी मोहिमेची माहिती करून दिली पाहिजे, असेही कदम म्हणाले.  प्लॅस्टिकबंदी करताना सर्व अधिकाºयांच्या सूचना आणि दृष्टिकोन जाणून घेतला जात आहे. राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच कायदा आहे की जो विधिमंडळात संमत होण्यापूर्वी नागरिकांकडून त्याबाबतची मते जाणून घेतली जात आहेत. सर्वसाधारणपणे कायदा झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी व्हावी असे अपेक्षित असते; परंतु बंदी कशी असावी आणि उपायोजना काय हव्यात या सूचना अधिकारी, सर्वसामान्यांकडून घेण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. त्यामुळे आपण या कायद्याचा भाग आहोत याची जाणीव सर्वसामान्यांना होऊन त्याच्या अंमलबजावणीसाठी ते प्रोत्साहित होतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.  निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकानेच प्लॅस्टिकबंदीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. बंदी लागू करताना कोणताही राजकीय पक्ष, व्यक्ती आडवी येत असेल तर नियमानुसार शासकीय कामात अडथळा आणला म्हणून त्याच्यावर कारवाई करण्याचा सल्लाही त्यांनी अधिकाºयांना दिला. काचेचे ग्लास, फुलांचा गुच्छ प्लॅस्टिकबंदी धोरण ठरविण्यासंदर्भात आयोजित बैठकीत मंत्रिमहोदय, प्रशासकीय अधिकारी यांच्यासह कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्यांच्या टेबलवर काचेचे ग्लास आणि जग ठेवण्यात आले होते. फुलांचे गुच्छ देताना त्यावर प्लॅस्टिकचे पारदर्शक कव्हर जाणीवपूर्वक टाळण्यात आले होेते. निसर्गाची अवकृपा राज्यातील शेतकरी ज्या कारणांनी आत्महत्या करतो त्यातील एक कारण म्हणजे निसर्गाची अवकृपा हेही लक्षात घेतले पाहिजे, असे कदम म्हणाले. आपण निसर्गाचा समतोल राखत नसल्याने निसर्गसाखळी बदलली आणि त्याचा परिणाम शेती आणि शेतकºयांवर झाला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण संवर्धन झाले पाहिजे, असेही कदम म्हणाले. एक दिवस पर्यावरणासाठी प्लॅस्टिकबंदी तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येणाºया विविध उपाययोजना आणि घेण्यात आलेले निर्णय यांची अंमलबजावणी होते की नाही याचा आढावा घेण्यासाठी अधिकाºयांनी आठवड्यातील एक दिवस केवळ पर्यावरणासाठी राखून ठेवला पाहिजे, अशी सूचना रामदास कदम यांनी केली. यादिवशी केवळ पर्यावरणीय कामाचा आढावा घेतला पाहिजे, असेही सुचविले. तसेच प्लॅस्टिकमुक्त शाळांचा गौरव करण्याचीही सूचना त्यांनी मांडली.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीRamdas Kadamरामदास कदम