शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधींना कोर्टाने काढले समन्स

By अझहर शेख | Updated: October 1, 2024 14:36 IST

देशभक्त व्यक्तीवरोधात आक्षेपार्ह वक्तव्य हे मानहानीकारक असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, असे समन्सच्या आदेशात म्हटले आहे.

अझहर शेख, नाशिक : विरोधी पक्षनेते तथा खासदार राहुल गांधी यांनी जाहिर सभेत केलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविरोधी वक्तव्याबाबत निर्भय फाउण्डेशनचे अध्यक्ष देवेंद्र भुतडा यांनी २०२२साली न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन जिल्हा न्यायालयानेराहुल गांधी यांना अतिरिक्त मुख्य सत्र न्यायाधीश दिपाली कडुसकर यांच्या न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले आहे.

२०२२साली हिंगोलीमध्ये झालेल्या जाहिर सभेत राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविरूद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर आक्षेप घेत निर्भया फाउण्डेशनने न्यायालयात दाद मागितली होती. यावेळी त्यांच्याकडून न्यायालयात सावरकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील संबंधांविषयीचे दाखले सादर करण्यात आले. ज्याप्रकारे आक्षेपार्ह वक्तव्य गांधी यांनी केले होते, त्या वक्तव्यामध्ये बीजेपी पक्षाचा उल्लेख होता. सावरकर असताना हा पक्षदेखील नव्हता, असेही न्यायालयात सांगण्यात आल्याची माहिती निर्भय फाउण्डेशनकडून बाजू मांडणारे ॲड.मनोज पिंगळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

सादर करण्यात आलेली माहिती, पुराव्यांअधारे न्यायाधीश कडुसकर यांनी सीआरपीसी कलम २०४ व भादंवि कलम ४९९ व ५०४ नुसार समन्स बजावले आहे. देशभक्त व्यक्तीवरोधात आक्षेपार्ह वक्तव्य हे मानहानीकारक असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, असे न्यायालयाने समन्सच्या आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :Courtन्यायालयVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरRahul Gandhiराहुल गांधी