शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

ओखीचा तडाखा : नागली, तूर, स्ट्रॉबेरी, टमाटा, कारली भुईसपाट भाताचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 22:13 IST

सुरगाणा : ओखी वादळामुळे आलेल्या पावसाने तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले असून, भात धानासह नागली, तूर, टमाटा, स्ट्रॉबेरी तर पळसन परिसरातील कारल्याची संपूर्ण वेल भुईसपाट झाली आहे.गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी (दि. ५) सकाळी ६ वाजेपासून पावसाला सुरुवात झाली ती ११ वाजेपर्यंत रिमझिम सुरूच होती. ...

ठळक मुद्देभाताचे नुकसानओखीचा तडाखा नागली, तूर, स्ट्रॉबेरी, टमाटा, कारली भुईसपाट

सुरगाणा : ओखी वादळामुळे आलेल्या पावसाने तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले असून, भात धानासह नागली, तूर, टमाटा, स्ट्रॉबेरी तर पळसन परिसरातील कारल्याची संपूर्ण वेल भुईसपाट झाली आहे.गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी (दि. ५) सकाळी ६ वाजेपासून पावसाला सुरुवात झाली ती ११ वाजेपर्यंत रिमझिम सुरूच होती. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. थंडीमुळे रस्त्यावरील वर्दळही कमी झाली होती. दिवसभरात तालुक्यात २६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे खळ्यात रचून ठेवलेल्या भाताची सुडी प्लॅस्टिकने झाकण्यासाठी एकच धावपळ सुरू झाली होती. पळसन येथे मांडव कोसळून कारल्याची संपूर्ण वेल जमीनदोस्त झाली आहे. खळ्यात मळणीकरिता रचून ठेवलेला भात, खुरसणी, उडीद, कुळीथ, वरई, तूर, नागली तसेच बोरगाव परिसरातील टमाटे, स्ट्रॉबेरी, देवलदरी, करंजूल, गांडोळमाळ या भागात कारल्याच्या बागांचे मांडव वादळी वाºयामुळे जमीनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी हा कोरडवाहू शेतकरी आहे म्हणून पावसाच्या भरोशावर जेमतेम पिकलेली शेती या पावसाने भिजली आहे.पावसात ओला झाल्याने तांदूळ काळा पडत असून, धानाला भाव मिळत नाही त्यामुळे भात उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. घाटमाथ्यावरील बोरगाव, घोडांबे, घागबारी, वडबारी, उंबरपाडा, सराड, साजोळे, हिरीडपाडा या भागातील स्ट्रॉबेरी या पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. घाटमाथ्यावरील शेतकरी दरवर्षी स्ट्रॉबेरी पिकाचे ७० ते ८० हजार रुपये उत्पन्न मिळत होते. पावसामुळे खूपच नुकसान झाले आहे. अर्ध्या एकरावर स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. रोपे महाबळेश्वर येथून आणली आहेत. प्रतिरोप जागेवर पंचेचाळीस रुपये नगाने खरेदी करून वाहतूक खर्च, लागवड, खते, औषधे फवारणी आदींसह पन्नास ते साठ हजार रुपये खर्च झाला आहे. मात्र वादळ व पावसाने नुकसान झाले आहे. या पावसामुळे काळा तांबेरा या रोगाला बळी पडून सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र यामुळे अपेक्षा धुळीस मिळाली आहे. कृषी विभागाने पंचनामे करून शेतकºयांना दिलासा द्यावा.- किसन भोये, स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी, सराड