शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

ओखीचा तडाखा : नागली, तूर, स्ट्रॉबेरी, टमाटा, कारली भुईसपाट भाताचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 22:13 IST

सुरगाणा : ओखी वादळामुळे आलेल्या पावसाने तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले असून, भात धानासह नागली, तूर, टमाटा, स्ट्रॉबेरी तर पळसन परिसरातील कारल्याची संपूर्ण वेल भुईसपाट झाली आहे.गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी (दि. ५) सकाळी ६ वाजेपासून पावसाला सुरुवात झाली ती ११ वाजेपर्यंत रिमझिम सुरूच होती. ...

ठळक मुद्देभाताचे नुकसानओखीचा तडाखा नागली, तूर, स्ट्रॉबेरी, टमाटा, कारली भुईसपाट

सुरगाणा : ओखी वादळामुळे आलेल्या पावसाने तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले असून, भात धानासह नागली, तूर, टमाटा, स्ट्रॉबेरी तर पळसन परिसरातील कारल्याची संपूर्ण वेल भुईसपाट झाली आहे.गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी (दि. ५) सकाळी ६ वाजेपासून पावसाला सुरुवात झाली ती ११ वाजेपर्यंत रिमझिम सुरूच होती. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. थंडीमुळे रस्त्यावरील वर्दळही कमी झाली होती. दिवसभरात तालुक्यात २६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे खळ्यात रचून ठेवलेल्या भाताची सुडी प्लॅस्टिकने झाकण्यासाठी एकच धावपळ सुरू झाली होती. पळसन येथे मांडव कोसळून कारल्याची संपूर्ण वेल जमीनदोस्त झाली आहे. खळ्यात मळणीकरिता रचून ठेवलेला भात, खुरसणी, उडीद, कुळीथ, वरई, तूर, नागली तसेच बोरगाव परिसरातील टमाटे, स्ट्रॉबेरी, देवलदरी, करंजूल, गांडोळमाळ या भागात कारल्याच्या बागांचे मांडव वादळी वाºयामुळे जमीनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी हा कोरडवाहू शेतकरी आहे म्हणून पावसाच्या भरोशावर जेमतेम पिकलेली शेती या पावसाने भिजली आहे.पावसात ओला झाल्याने तांदूळ काळा पडत असून, धानाला भाव मिळत नाही त्यामुळे भात उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. घाटमाथ्यावरील बोरगाव, घोडांबे, घागबारी, वडबारी, उंबरपाडा, सराड, साजोळे, हिरीडपाडा या भागातील स्ट्रॉबेरी या पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. घाटमाथ्यावरील शेतकरी दरवर्षी स्ट्रॉबेरी पिकाचे ७० ते ८० हजार रुपये उत्पन्न मिळत होते. पावसामुळे खूपच नुकसान झाले आहे. अर्ध्या एकरावर स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. रोपे महाबळेश्वर येथून आणली आहेत. प्रतिरोप जागेवर पंचेचाळीस रुपये नगाने खरेदी करून वाहतूक खर्च, लागवड, खते, औषधे फवारणी आदींसह पन्नास ते साठ हजार रुपये खर्च झाला आहे. मात्र वादळ व पावसाने नुकसान झाले आहे. या पावसामुळे काळा तांबेरा या रोगाला बळी पडून सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र यामुळे अपेक्षा धुळीस मिळाली आहे. कृषी विभागाने पंचनामे करून शेतकºयांना दिलासा द्यावा.- किसन भोये, स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी, सराड