शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

लॉकडाऊनच्या नावे अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 01:31 IST

नाशिक : लॉकडाऊन शिथिल करून अनलॉकची घोषणा केल्यानंतर जिल्हांतर्गत प्रवास करण्यासाठी नागरिकांना मुभा देण्यात आली आहे; मात्र तरीदेखील शहराच्या वेशीवर शहर वाहतूक पोलिसांकडून वाहने रोखली जात असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहेत. यामुळे पोलिसांच्या कारवाईविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नाशिक : लॉकडाऊन शिथिल करून अनलॉकची घोषणा केल्यानंतर जिल्हांतर्गत प्रवास करण्यासाठी नागरिकांना मुभा देण्यात आली आहे; मात्र तरीदेखील शहराच्या वेशीवर शहर वाहतूक पोलिसांकडून वाहने रोखली जात असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहेत. यामुळे पोलिसांच्या कारवाईविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून मुंबई-आग्रा, नाशिक-पुणे महामार्गावरून शहरात येणाऱ्या नागरिकांना शहराच्या वेशीवर रोखले जात आहे. प्रवास करण्यासंदर्भात पोलिसांची पूर्वपरवानगी घेतली आहे का? असा प्रश्न विचारत शहर पोलिसांच्या पथकांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. यामुळे नागरिक संभ्रमात पडले आहे. जिल्ह्यांतर्गत प्रवास करण्यावरील निर्बंध जर हटविले गेले असतील तर मग पोलिसांकडून कारवाईचा ससेमिरा कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकूणच पोलिसांची शहराच्या वेशीवर सुरू असलेली कारवाई यामुळे संशयाच्या भोवºयात सापडली आहे.शासनस्तरावरून जिल्हांतर्गत प्रवास हा अधिकाधिक मोकळा करण्यासंदर्भात सूचना आलेल्या असताना दुसरीकडे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करताच नाकाबंदी पॉइंटवर वाहनांची अडवणूक करून पूर्वपरवानगीचा पास काढला आहे का? याबाबत विचारणा केली जात आहे. एका जिल्ह्यातून दुसºया जिल्ह्यात प्रवास करावयाचा असल्यास तसेच जिल्हांतर्गतदेखील प्रवास करावयाचा असेल तर त्यासाठी शहरी भागातील नागरिकांना पोलीस आयुक्तालयाच्या कोरोना सेलमधून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी दिली.---------------------------यंत्रणेतच गोंधळपास नसल्यास संबंधितांकडून दंड आकारला जात आहे. नागरिकांमध्ये एकूणच शासकीय यंत्रणेच्या असमन्वयामुळे गोंधळ निर्माण होत आहे. जिल्ह्यातील तालुक्यांच्या ठिकाणी जर प्रवास करायचा असेल तर त्यास मोकळीक द्यावी, असे शासनाचे निर्देश आहे; मात्र जिल्ह्यात प्रवासाबाबतसुद्धा आता पोलिसांकडून निर्बंध आणले जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.------------------जिल्हांतर्गत प्रवासावर कुठलेही निर्बंध नसून तालुक्याच्या ठिकाणी जाण्याचा मार्ग शासनाच्या आदेशानुसार मोकळा करण्यात आला आहे. एका जिल्ह्यातून दुसºया जिल्ह्यात जाण्यासाठी अथवा जिल्हांतर्गत कन्टेंन्मेंट झोनमध्ये प्रवास करण्याकरिता परवानगीची गरज भासते.- नीलेश श्रींगी, उपजिल्हाधिकारी

टॅग्स :Nashikनाशिक