शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

लॉकडाऊनच्या नावे अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 01:31 IST

नाशिक : लॉकडाऊन शिथिल करून अनलॉकची घोषणा केल्यानंतर जिल्हांतर्गत प्रवास करण्यासाठी नागरिकांना मुभा देण्यात आली आहे; मात्र तरीदेखील शहराच्या वेशीवर शहर वाहतूक पोलिसांकडून वाहने रोखली जात असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहेत. यामुळे पोलिसांच्या कारवाईविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नाशिक : लॉकडाऊन शिथिल करून अनलॉकची घोषणा केल्यानंतर जिल्हांतर्गत प्रवास करण्यासाठी नागरिकांना मुभा देण्यात आली आहे; मात्र तरीदेखील शहराच्या वेशीवर शहर वाहतूक पोलिसांकडून वाहने रोखली जात असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहेत. यामुळे पोलिसांच्या कारवाईविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून मुंबई-आग्रा, नाशिक-पुणे महामार्गावरून शहरात येणाऱ्या नागरिकांना शहराच्या वेशीवर रोखले जात आहे. प्रवास करण्यासंदर्भात पोलिसांची पूर्वपरवानगी घेतली आहे का? असा प्रश्न विचारत शहर पोलिसांच्या पथकांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. यामुळे नागरिक संभ्रमात पडले आहे. जिल्ह्यांतर्गत प्रवास करण्यावरील निर्बंध जर हटविले गेले असतील तर मग पोलिसांकडून कारवाईचा ससेमिरा कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकूणच पोलिसांची शहराच्या वेशीवर सुरू असलेली कारवाई यामुळे संशयाच्या भोवºयात सापडली आहे.शासनस्तरावरून जिल्हांतर्गत प्रवास हा अधिकाधिक मोकळा करण्यासंदर्भात सूचना आलेल्या असताना दुसरीकडे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करताच नाकाबंदी पॉइंटवर वाहनांची अडवणूक करून पूर्वपरवानगीचा पास काढला आहे का? याबाबत विचारणा केली जात आहे. एका जिल्ह्यातून दुसºया जिल्ह्यात प्रवास करावयाचा असल्यास तसेच जिल्हांतर्गतदेखील प्रवास करावयाचा असेल तर त्यासाठी शहरी भागातील नागरिकांना पोलीस आयुक्तालयाच्या कोरोना सेलमधून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी दिली.---------------------------यंत्रणेतच गोंधळपास नसल्यास संबंधितांकडून दंड आकारला जात आहे. नागरिकांमध्ये एकूणच शासकीय यंत्रणेच्या असमन्वयामुळे गोंधळ निर्माण होत आहे. जिल्ह्यातील तालुक्यांच्या ठिकाणी जर प्रवास करायचा असेल तर त्यास मोकळीक द्यावी, असे शासनाचे निर्देश आहे; मात्र जिल्ह्यात प्रवासाबाबतसुद्धा आता पोलिसांकडून निर्बंध आणले जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.------------------जिल्हांतर्गत प्रवासावर कुठलेही निर्बंध नसून तालुक्याच्या ठिकाणी जाण्याचा मार्ग शासनाच्या आदेशानुसार मोकळा करण्यात आला आहे. एका जिल्ह्यातून दुसºया जिल्ह्यात जाण्यासाठी अथवा जिल्हांतर्गत कन्टेंन्मेंट झोनमध्ये प्रवास करण्याकरिता परवानगीची गरज भासते.- नीलेश श्रींगी, उपजिल्हाधिकारी

टॅग्स :Nashikनाशिक