शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

होळकर पुलाखालील मॅकेनिकल गेटला आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:14 IST

स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने सध्या होळकर पुलाखाली मॅकेनिकल गेट बसवतानाच, प्रोजेक्ट गोदाअंतर्गत रामवाडी ते होळकर पुलाच्या दरम्यान कामे सुरू ...

स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने सध्या होळकर पुलाखाली मॅकेनिकल गेट बसवतानाच, प्रोजेक्ट गोदाअंतर्गत रामवाडी ते होळकर पुलाच्या दरम्यान कामे सुरू आहेत. या ठिकाणी नदीपात्रात सिमेंट काँक्रीटची भिंत बांधली जात असल्याने, त्यास गोदावरी प्रेमींनी आक्षेप घेतला होता. विशेषत: राजेश पंडित आणि निशीकांत पगारे यांनी कंपनीकडे आक्षेप घेतला होता, तसेच गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी गठीत विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या बैठकीत देखील या संदर्भात आक्षेप घेण्यात आला होता. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या आदेशानुसार, समितीतील तज्ज्ञ सदस्या प्राचार्या प्राजक्ता बस्ते यांनी प्रत्यक्ष गोदाकाठच्या कामांची पाहणी केली. त्यांच्याबरोबरच प्राचार्य पंडित, पगारे, तसेच निरीच्या सदस्या कोमल यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. त्याचा अहवाल बस्ते यांनी सादर केला आहे.

होळकर पुलाखालील गेट अनावश्यक असून, हे काम स्थगित करावे, अशी शिफारस बस्ते यांनी केली आहे. या गेटसंदर्भात कंपनीचे अधिकारी समर्पक उत्तरे देऊ शकले नाहीत, असे त्यांनी नमूद केले आहे. त्याचबरोबर गोदापात्रात सिमेंटची भिंत असू नये, यात त्यांनी समर्थन दिले. गोदापात्रात तळ काँक्रिटीकरणाच्या खाली पुरातन कुंडांचा शोध घेण्यासाठी दहा ते पंधरा फूट खोल चाचणी कूपनलिका खोदण्यास उच्चाधिकार समितीने मान्यता दिली होती. मात्र, शंभर ते सव्वाशे फूट खोल बोअर करून शेकडो वर्षांपासून खडकात साचलेले पाणी काढून रामकुंड भरणे योग्य नसल्याचे बस्ते यांनी नमूद केले आहे, तसेच गाळ काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्यासाठी खोदलेले बोअर बंद करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. घाटावरील फरशा काढून त्या योग्य कशा असाव्यात, याबाबत बस्ते यांनी सूचना केली असून, स्मार्ट सिटी कंपनीनेही ती मान्य केली आहे.

इन्फो....

वाळु उत्खननास पंडित यांचा आक्षेप

गोदापात्रातून गाळ काढण्याच्या नावाखाली वाळू उपसा सुरू असून, तो नदीच्या पुनरुज्जीवनाच्या दृष्टिकोनातून अयोग्य असल्याचा आक्षेप राजेश पंडित यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे घेतला आहे. मुळात गोदावरी नदीच्या परीसरात काहीही काम करायचे असल्याचे उच्चाधिकार समितीची परवानगी आवश्यक आहे. मात्र, गाळ काढण्यासाठी परवानगी घेण्यात आलेली नाही, तसेच राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या नियमांसंदर्भात २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, कोणत्याही रेल्वे व रस्ते पुलाच्या बाजूने दोनशे फूट अंतराच्या क्षेत्रात वाळू उत्खनन करता येणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही वाळू उपसा केला जात असल्याकडे पंडित यांनी लक्ष वेधले आहे.