शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

होळकर पुलाखालील मॅकेनिकल गेटला आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:14 IST

स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने सध्या होळकर पुलाखाली मॅकेनिकल गेट बसवतानाच, प्रोजेक्ट गोदाअंतर्गत रामवाडी ते होळकर पुलाच्या दरम्यान कामे सुरू ...

स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने सध्या होळकर पुलाखाली मॅकेनिकल गेट बसवतानाच, प्रोजेक्ट गोदाअंतर्गत रामवाडी ते होळकर पुलाच्या दरम्यान कामे सुरू आहेत. या ठिकाणी नदीपात्रात सिमेंट काँक्रीटची भिंत बांधली जात असल्याने, त्यास गोदावरी प्रेमींनी आक्षेप घेतला होता. विशेषत: राजेश पंडित आणि निशीकांत पगारे यांनी कंपनीकडे आक्षेप घेतला होता, तसेच गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी गठीत विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या बैठकीत देखील या संदर्भात आक्षेप घेण्यात आला होता. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या आदेशानुसार, समितीतील तज्ज्ञ सदस्या प्राचार्या प्राजक्ता बस्ते यांनी प्रत्यक्ष गोदाकाठच्या कामांची पाहणी केली. त्यांच्याबरोबरच प्राचार्य पंडित, पगारे, तसेच निरीच्या सदस्या कोमल यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. त्याचा अहवाल बस्ते यांनी सादर केला आहे.

होळकर पुलाखालील गेट अनावश्यक असून, हे काम स्थगित करावे, अशी शिफारस बस्ते यांनी केली आहे. या गेटसंदर्भात कंपनीचे अधिकारी समर्पक उत्तरे देऊ शकले नाहीत, असे त्यांनी नमूद केले आहे. त्याचबरोबर गोदापात्रात सिमेंटची भिंत असू नये, यात त्यांनी समर्थन दिले. गोदापात्रात तळ काँक्रिटीकरणाच्या खाली पुरातन कुंडांचा शोध घेण्यासाठी दहा ते पंधरा फूट खोल चाचणी कूपनलिका खोदण्यास उच्चाधिकार समितीने मान्यता दिली होती. मात्र, शंभर ते सव्वाशे फूट खोल बोअर करून शेकडो वर्षांपासून खडकात साचलेले पाणी काढून रामकुंड भरणे योग्य नसल्याचे बस्ते यांनी नमूद केले आहे, तसेच गाळ काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्यासाठी खोदलेले बोअर बंद करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. घाटावरील फरशा काढून त्या योग्य कशा असाव्यात, याबाबत बस्ते यांनी सूचना केली असून, स्मार्ट सिटी कंपनीनेही ती मान्य केली आहे.

इन्फो....

वाळु उत्खननास पंडित यांचा आक्षेप

गोदापात्रातून गाळ काढण्याच्या नावाखाली वाळू उपसा सुरू असून, तो नदीच्या पुनरुज्जीवनाच्या दृष्टिकोनातून अयोग्य असल्याचा आक्षेप राजेश पंडित यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे घेतला आहे. मुळात गोदावरी नदीच्या परीसरात काहीही काम करायचे असल्याचे उच्चाधिकार समितीची परवानगी आवश्यक आहे. मात्र, गाळ काढण्यासाठी परवानगी घेण्यात आलेली नाही, तसेच राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या नियमांसंदर्भात २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, कोणत्याही रेल्वे व रस्ते पुलाच्या बाजूने दोनशे फूट अंतराच्या क्षेत्रात वाळू उत्खनन करता येणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही वाळू उपसा केला जात असल्याकडे पंडित यांनी लक्ष वेधले आहे.