शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिल्ह्यात ‘पोषण आहार’ सप्ताहाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 00:45 IST

नाशिक : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्ह्यात ८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत पोषण अभियान राबविण्यात येत असून, ग्रामस्तरावर गुरुवारपासून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स ठेवून व नियमांचे पालन करून छोट्या गटांमध्ये उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देगरोदर माता, बालकांचे सशक्तीकरण करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्ह्यात ८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत पोषण अभियान राबविण्यात येत असून, ग्रामस्तरावर गुरुवारपासून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स ठेवून व नियमांचे पालन करून छोट्या गटांमध्ये उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.माता व बालकांना सशक्त बनविण्यासाठी हे अभियान राबविण्यात येते. ३० सप्टेंबरपर्यंत चालणारे हे अभियान जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रात राबविण्यात येणार असून, मातेला पोषक आहार व चांगली आरोग्य सेवा मिळण्यासाठी व माता व बालकाचे पोषण योग्यरीत्या होण्याबरोबरच कुपोषण दूर होण्यास हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य जीवनन्नोती अभियांनातर्गत कार्यरत ग्रामसंघानाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश तालुका व ग्रामस्तरीय यंत्रणेला देण्यात आले असून, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती आणि आरोग्य सेविका यांच्या समन्वयातून ग्रामस्तरावर अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी दिली.पोषण अभियानात पोषण आहार व त्याचे महत्त्व, अनेमिया आजार, गरोदर व स्तनदा माता यांच्याकडे गृहभेटी करणे, ० ते ६ वर्ष वयोगटांतील बालकांचे वजन व उंचीचे मापन करणे, अंगणवाडी केंद्रांच्या आवारात परसबागांची निर्मिती करणे, छोट्या गटांमध्ये अल्प व मध्यम कुपोषित बालकांच्या पालकांची बैठक घेणे, लसीकरण करणे आदी विषयांवर अधिक लक्ष देण्यात येणार असून, गृहभेटीद्वारे पोषण आहार, चांगल्या आरोग्याच्या सवयी याचे महत्त्व पटवून देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अश्विनी आहेर यांनी दिली.एक मूठ पोषण उपक्रमएक मूठ पोषण उपक्रमांतर्गत मध्यम व तीव्र वजगटातील बालक, मध्यम व तीव्र कुपोषित श्रेणीतील बालक, गरोदर माता यांच्यासाठी दररोज ५ मि.ली. खोबरेल तेल, १ उकडलेला बटाटा, १ अंडी, २० ते ४० ग्रॅम मोड आलेले कडधान्य, मुठभर चणे, फुटाणे, गूळ देण्यात येणार आहे. यामुळे बालक तसेच मातांचे पोषण होण्यास मदत होणार असून, यामध्ये ग्रामपंचायतीही सहभागी आहेत.

टॅग्स :Governmentसरकारzpजिल्हा परिषद