शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
2
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
3
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
4
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
5
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
6
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
7
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
8
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
9
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
10
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
11
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
12
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
13
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
14
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
15
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
16
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
17
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
18
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
19
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
20
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले

जिल्ह्यात बळींचा आकडा हजाराच्या पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 01:32 IST

शहरासह जिल्ह्यात वाढणारा कोरोनाग्रस्तांचा व बळींचा आकडा उंचावत असल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. गुरुवारी जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक २९ रुग्ण उपचारादरम्यान दगावले. यामुळे मृतांचा एकूण आकडा हजाराच्या पार पोहोचला आहे. जिल्ह्यात गुरुवारी १ हजार २९ रुग्ण बरे झाले. मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वाधिक १९ रुग्ण शहरातील आहे.

ठळक मुद्देकोरोना : एकाच दिवशी २९ बाधितांचा मृत्यू; नवे १ हजार ४६५ रुग्ण आढळले

नाशिक : शहरासह जिल्ह्यात वाढणारा कोरोनाग्रस्तांचा व बळींचा आकडा उंचावत असल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. गुरुवारी जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक २९ रुग्ण उपचारादरम्यान दगावले. यामुळे मृतांचा एकूण आकडा हजाराच्या पार पोहोचला आहे. जिल्ह्यात गुरुवारी १ हजार २९ रुग्ण बरे झाले. मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वाधिक १९ रुग्ण शहरातील आहे.कोरोनाचे वाढते थैमान रोखायचे कसे, असा प्रश्न आता प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. दररोज जिल्ह्यात चौदाशे रुग्ण आढळून येत आहे. तसेच मागील तीन दिवसांपासून पंधराच्यापुढे रुग्ण दगावत होते; मात्र गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात २९ रुग्ण मृत्युमुखी पडले. यापूर्वी मृतांचा दिवसभराचा २३ हा उच्चांक होता. आतापर्यंत नाशिक ग्रामीणमध्ये २९८, शहरात ५७६, मालेगावात १२२ आणि जिल्ह्याबाहेरील २४ असे एकूण १ हजार २० रुग्ण कोरोनाशी झुंज देताना मृत्युमुखी पडले आहेत.मागील दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. सण-उत्सवाच्या काळापासून कोरोनाग्रस्तांचा आलेख चढता असून, अद्याप घसरण होत नसल्याने प्रशासनही चिंतित आहे. गुरुवारी दिवसभरात जिल्ह्णात १ हजार ३२१ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झालेत. त्यापैकी १०७४ रुग्ण नाशिक शहरातील आहे.शहराची कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ३३ हजार ८४३ झाली आहे, तर ग्रामीणचा कोरोनाबाधितांचा आकडा १२ हजार ९७ वर पोहोचला आहे. शहरात आतापर्यंत २७ हजार ६६० रुग्ण, तर ग्रामीणमध्ये ८ हजार ५०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.मालेगाव मनपा हद्दीत रुग्णसंख्या ३ हजार २१ झाली असून, २ हजार २८९ रुग्ण बरे झाले आहेत. शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीणमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढता वाढत असल्याने गाव, तालुका-पातळीवरसुद्धा नागरिकांनी अधिकाधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे.दहा दिवसांत जिल्ह्यात १४८ मृत्यू१ सप्टेंबर - ५२ सप्टेंबर - १७३ सप्टेंबर - ६४ सप्टेंबर - ११५ सप्टेंबर - १०६ सप्टेंबर - १२७ सप्टेंबर - २०८ सप्टेंबर - २०९ सप्टेंबर - १८१० सप्टेंबर - २९गुरुवारी शहरात ९५०, ग्रामीणमध्ये ४६९, तर मालेगावात ४४ नवे रुग्ण आढळले.आतापर्यंत ३७ हजार ६३९ रुग्ण बरे झाले आहेत, तर ९ हजार रुग्ण उपचार घेत आहेत.येवला तालुक्यातील ३४ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. बाधितांच्या संपर्कातील ७ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत.मनमाड शहरात नव्याने २७ बाधित रु ग्ण सापडले आहेत. पॉझिटिव्ह रु ग्णांची संख्या आता ५४०वर गेली आहे. त्यापैकी ४५५ जण बरे झाले आहेत.