शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

जिल्ह्यात बळींचा आकडा हजाराच्या पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 01:32 IST

शहरासह जिल्ह्यात वाढणारा कोरोनाग्रस्तांचा व बळींचा आकडा उंचावत असल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. गुरुवारी जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक २९ रुग्ण उपचारादरम्यान दगावले. यामुळे मृतांचा एकूण आकडा हजाराच्या पार पोहोचला आहे. जिल्ह्यात गुरुवारी १ हजार २९ रुग्ण बरे झाले. मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वाधिक १९ रुग्ण शहरातील आहे.

ठळक मुद्देकोरोना : एकाच दिवशी २९ बाधितांचा मृत्यू; नवे १ हजार ४६५ रुग्ण आढळले

नाशिक : शहरासह जिल्ह्यात वाढणारा कोरोनाग्रस्तांचा व बळींचा आकडा उंचावत असल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. गुरुवारी जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक २९ रुग्ण उपचारादरम्यान दगावले. यामुळे मृतांचा एकूण आकडा हजाराच्या पार पोहोचला आहे. जिल्ह्यात गुरुवारी १ हजार २९ रुग्ण बरे झाले. मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वाधिक १९ रुग्ण शहरातील आहे.कोरोनाचे वाढते थैमान रोखायचे कसे, असा प्रश्न आता प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. दररोज जिल्ह्यात चौदाशे रुग्ण आढळून येत आहे. तसेच मागील तीन दिवसांपासून पंधराच्यापुढे रुग्ण दगावत होते; मात्र गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात २९ रुग्ण मृत्युमुखी पडले. यापूर्वी मृतांचा दिवसभराचा २३ हा उच्चांक होता. आतापर्यंत नाशिक ग्रामीणमध्ये २९८, शहरात ५७६, मालेगावात १२२ आणि जिल्ह्याबाहेरील २४ असे एकूण १ हजार २० रुग्ण कोरोनाशी झुंज देताना मृत्युमुखी पडले आहेत.मागील दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. सण-उत्सवाच्या काळापासून कोरोनाग्रस्तांचा आलेख चढता असून, अद्याप घसरण होत नसल्याने प्रशासनही चिंतित आहे. गुरुवारी दिवसभरात जिल्ह्णात १ हजार ३२१ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झालेत. त्यापैकी १०७४ रुग्ण नाशिक शहरातील आहे.शहराची कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ३३ हजार ८४३ झाली आहे, तर ग्रामीणचा कोरोनाबाधितांचा आकडा १२ हजार ९७ वर पोहोचला आहे. शहरात आतापर्यंत २७ हजार ६६० रुग्ण, तर ग्रामीणमध्ये ८ हजार ५०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.मालेगाव मनपा हद्दीत रुग्णसंख्या ३ हजार २१ झाली असून, २ हजार २८९ रुग्ण बरे झाले आहेत. शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीणमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढता वाढत असल्याने गाव, तालुका-पातळीवरसुद्धा नागरिकांनी अधिकाधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे.दहा दिवसांत जिल्ह्यात १४८ मृत्यू१ सप्टेंबर - ५२ सप्टेंबर - १७३ सप्टेंबर - ६४ सप्टेंबर - ११५ सप्टेंबर - १०६ सप्टेंबर - १२७ सप्टेंबर - २०८ सप्टेंबर - २०९ सप्टेंबर - १८१० सप्टेंबर - २९गुरुवारी शहरात ९५०, ग्रामीणमध्ये ४६९, तर मालेगावात ४४ नवे रुग्ण आढळले.आतापर्यंत ३७ हजार ६३९ रुग्ण बरे झाले आहेत, तर ९ हजार रुग्ण उपचार घेत आहेत.येवला तालुक्यातील ३४ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. बाधितांच्या संपर्कातील ७ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत.मनमाड शहरात नव्याने २७ बाधित रु ग्ण सापडले आहेत. पॉझिटिव्ह रु ग्णांची संख्या आता ५४०वर गेली आहे. त्यापैकी ४५५ जण बरे झाले आहेत.