शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

जिल्ह्यात ३० दिवसांत बळींची संख्या १२ वरून १०२वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:59 IST

नाशिक : जिल्ह्यात रुग्ण सापडण्याचे प्रमाण गत पंधरवड्यात चौपट झाले असून, महिनाभरात एकूण रुग्णसंख्या ५२१वरून १५३६ अशी सुमारे तिपटीने वाढली आहे. रुग्णसंख्येचा वेग गत महिन्याच्या सुरुवातीपासूनच खूप वाढला असून, दोन पंधरवड्यात त्यात दुपटीने वाढ झाली आहे. महिनाभराच्या प्रारंभी अवघा १२ असलेला बळींचा आकडा शतकी संख्या ओलांडून १०२वर पोहोचला आहे.

नाशिक : जिल्ह्यात रुग्ण सापडण्याचे प्रमाण गत पंधरवड्यात चौपट झाले असून, महिनाभरात एकूण रुग्णसंख्या ५२१वरून १५३६ अशी सुमारे तिपटीने वाढली आहे. रुग्णसंख्येचा वेग गत महिन्याच्या सुरुवातीपासूनच खूप वाढला असून, दोन पंधरवड्यात त्यात दुपटीने वाढ झाली आहे. महिनाभराच्या प्रारंभी अवघा १२ असलेला बळींचा आकडा शतकी संख्या ओलांडून १०२वर पोहोचला आहे.नाशकात चौथ्या टप्प्यापासूनच लॉकडाऊन संपुष्टात आल्याप्रमाणेच नागरिकांचे व्यवहार सुरू झाल्याने रुग्णसंख्येत प्रचंड वेगाने वाढ होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यानंतर गत आठवड्यात लॉकडाऊन उठल्यानंतर तर जिल्ह्यातील नाशिक आणि मालेगाव या दोन्ही महापालिका क्षेत्रात बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण तिप्पट झाले आहे.मृतांच्या आकड्याने जिल्ह्यात शंभरी ओलांडल्याने अधिकच घबराट निर्माण झाली आहे. सलग आठवडाभर ग्रामीणपेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळून येण्याची नाशिकची वाटचाल मंगळवारी-देखील कायम राहिली. मंगळवारी आढळलेल्या ३२ रुग्णांपैकी तब्बल २७ रुग्ण हे नाशिक महानगरातील आहेत. शहरातील बाधित रुग्णसंख्या आढळण्याचे प्रमाण आठवडाभरात अधिक पटीने वाढले आहे.-----------------------------जिल्ह्यात सर्वेक्षण यंत्रणेचे प्रभावी काममे महिन्याच्या प्रारंभी बरे झालेल्या रुग्णांची संख्या अवघी १४ होती. त्यात दोन आठवड्यात लक्षणीय सुधारणा होऊन ती १४ मे रोजी ४५९वर पोहोचली, तर ३१ मेपर्यंत ८२६ आणि गत दहा दिवसात तर १०९३वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नाशिक जिल्ह्यात अधिक असण्याचे कारण जिल्ह्यातील सर्वेक्षण यंत्रणेचे प्रभावी काम आहे. कोरोनाबाधित रुग्ण प्राथमिक अवस्थेत शोधून काढल्याने त्यांच्यापासून इतरांना होणारी बाधा टळते तसेच हे रुग्ण बरे होण्याची शक्यतादेखील खूप मोठ्या प्रमाणात वाढते.-----------------------महानगरात नियमांचा भंगजिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सामान्य ग्रामस्थ सर्व नियमांचे पालन करीत असताना महानगरातील नागरिक मात्र महानगरातील प्रत्येक बाजारपेठेत गर्दी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे.------------------------मृत्युदरातील वाढ धोक्याची घंटानाशिक जिल्ह्यात १ मेपर्यंत १२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यात दोन आठवड्यात २१ने वाढ होऊन १४ मेदरम्यान मृतांचा आकडा ३३वर पोहोचला होता. त्यानंतरच्या आठवडाभरात १३ जणांचा बळी गेल्याने मृतांची संख्या ४६ झाली, तर २१ मेपासून ९ जून या २० दिवसांत मृतांची संख्या ४६वरून १०२वर म्हणजेच दुपटीहून अधिक वाढली असून, हे वाढते प्रमाण नाशिकसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. दरम्यान, महानगरातील बाधित रुग्णसंख्येच्या प्रमाणात वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणादेखील संभ्रमित झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक