शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

जिल्ह्यात ३० दिवसांत बळींची संख्या १२ वरून १०२वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:59 IST

नाशिक : जिल्ह्यात रुग्ण सापडण्याचे प्रमाण गत पंधरवड्यात चौपट झाले असून, महिनाभरात एकूण रुग्णसंख्या ५२१वरून १५३६ अशी सुमारे तिपटीने वाढली आहे. रुग्णसंख्येचा वेग गत महिन्याच्या सुरुवातीपासूनच खूप वाढला असून, दोन पंधरवड्यात त्यात दुपटीने वाढ झाली आहे. महिनाभराच्या प्रारंभी अवघा १२ असलेला बळींचा आकडा शतकी संख्या ओलांडून १०२वर पोहोचला आहे.

नाशिक : जिल्ह्यात रुग्ण सापडण्याचे प्रमाण गत पंधरवड्यात चौपट झाले असून, महिनाभरात एकूण रुग्णसंख्या ५२१वरून १५३६ अशी सुमारे तिपटीने वाढली आहे. रुग्णसंख्येचा वेग गत महिन्याच्या सुरुवातीपासूनच खूप वाढला असून, दोन पंधरवड्यात त्यात दुपटीने वाढ झाली आहे. महिनाभराच्या प्रारंभी अवघा १२ असलेला बळींचा आकडा शतकी संख्या ओलांडून १०२वर पोहोचला आहे.नाशकात चौथ्या टप्प्यापासूनच लॉकडाऊन संपुष्टात आल्याप्रमाणेच नागरिकांचे व्यवहार सुरू झाल्याने रुग्णसंख्येत प्रचंड वेगाने वाढ होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यानंतर गत आठवड्यात लॉकडाऊन उठल्यानंतर तर जिल्ह्यातील नाशिक आणि मालेगाव या दोन्ही महापालिका क्षेत्रात बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण तिप्पट झाले आहे.मृतांच्या आकड्याने जिल्ह्यात शंभरी ओलांडल्याने अधिकच घबराट निर्माण झाली आहे. सलग आठवडाभर ग्रामीणपेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळून येण्याची नाशिकची वाटचाल मंगळवारी-देखील कायम राहिली. मंगळवारी आढळलेल्या ३२ रुग्णांपैकी तब्बल २७ रुग्ण हे नाशिक महानगरातील आहेत. शहरातील बाधित रुग्णसंख्या आढळण्याचे प्रमाण आठवडाभरात अधिक पटीने वाढले आहे.-----------------------------जिल्ह्यात सर्वेक्षण यंत्रणेचे प्रभावी काममे महिन्याच्या प्रारंभी बरे झालेल्या रुग्णांची संख्या अवघी १४ होती. त्यात दोन आठवड्यात लक्षणीय सुधारणा होऊन ती १४ मे रोजी ४५९वर पोहोचली, तर ३१ मेपर्यंत ८२६ आणि गत दहा दिवसात तर १०९३वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नाशिक जिल्ह्यात अधिक असण्याचे कारण जिल्ह्यातील सर्वेक्षण यंत्रणेचे प्रभावी काम आहे. कोरोनाबाधित रुग्ण प्राथमिक अवस्थेत शोधून काढल्याने त्यांच्यापासून इतरांना होणारी बाधा टळते तसेच हे रुग्ण बरे होण्याची शक्यतादेखील खूप मोठ्या प्रमाणात वाढते.-----------------------महानगरात नियमांचा भंगजिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सामान्य ग्रामस्थ सर्व नियमांचे पालन करीत असताना महानगरातील नागरिक मात्र महानगरातील प्रत्येक बाजारपेठेत गर्दी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे.------------------------मृत्युदरातील वाढ धोक्याची घंटानाशिक जिल्ह्यात १ मेपर्यंत १२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यात दोन आठवड्यात २१ने वाढ होऊन १४ मेदरम्यान मृतांचा आकडा ३३वर पोहोचला होता. त्यानंतरच्या आठवडाभरात १३ जणांचा बळी गेल्याने मृतांची संख्या ४६ झाली, तर २१ मेपासून ९ जून या २० दिवसांत मृतांची संख्या ४६वरून १०२वर म्हणजेच दुपटीहून अधिक वाढली असून, हे वाढते प्रमाण नाशिकसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. दरम्यान, महानगरातील बाधित रुग्णसंख्येच्या प्रमाणात वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणादेखील संभ्रमित झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक