शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

जिल्ह्यात ३० दिवसांत बळींची संख्या १२ वरून १०२वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:59 IST

नाशिक : जिल्ह्यात रुग्ण सापडण्याचे प्रमाण गत पंधरवड्यात चौपट झाले असून, महिनाभरात एकूण रुग्णसंख्या ५२१वरून १५३६ अशी सुमारे तिपटीने वाढली आहे. रुग्णसंख्येचा वेग गत महिन्याच्या सुरुवातीपासूनच खूप वाढला असून, दोन पंधरवड्यात त्यात दुपटीने वाढ झाली आहे. महिनाभराच्या प्रारंभी अवघा १२ असलेला बळींचा आकडा शतकी संख्या ओलांडून १०२वर पोहोचला आहे.

नाशिक : जिल्ह्यात रुग्ण सापडण्याचे प्रमाण गत पंधरवड्यात चौपट झाले असून, महिनाभरात एकूण रुग्णसंख्या ५२१वरून १५३६ अशी सुमारे तिपटीने वाढली आहे. रुग्णसंख्येचा वेग गत महिन्याच्या सुरुवातीपासूनच खूप वाढला असून, दोन पंधरवड्यात त्यात दुपटीने वाढ झाली आहे. महिनाभराच्या प्रारंभी अवघा १२ असलेला बळींचा आकडा शतकी संख्या ओलांडून १०२वर पोहोचला आहे.नाशकात चौथ्या टप्प्यापासूनच लॉकडाऊन संपुष्टात आल्याप्रमाणेच नागरिकांचे व्यवहार सुरू झाल्याने रुग्णसंख्येत प्रचंड वेगाने वाढ होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यानंतर गत आठवड्यात लॉकडाऊन उठल्यानंतर तर जिल्ह्यातील नाशिक आणि मालेगाव या दोन्ही महापालिका क्षेत्रात बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण तिप्पट झाले आहे.मृतांच्या आकड्याने जिल्ह्यात शंभरी ओलांडल्याने अधिकच घबराट निर्माण झाली आहे. सलग आठवडाभर ग्रामीणपेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळून येण्याची नाशिकची वाटचाल मंगळवारी-देखील कायम राहिली. मंगळवारी आढळलेल्या ३२ रुग्णांपैकी तब्बल २७ रुग्ण हे नाशिक महानगरातील आहेत. शहरातील बाधित रुग्णसंख्या आढळण्याचे प्रमाण आठवडाभरात अधिक पटीने वाढले आहे.-----------------------------जिल्ह्यात सर्वेक्षण यंत्रणेचे प्रभावी काममे महिन्याच्या प्रारंभी बरे झालेल्या रुग्णांची संख्या अवघी १४ होती. त्यात दोन आठवड्यात लक्षणीय सुधारणा होऊन ती १४ मे रोजी ४५९वर पोहोचली, तर ३१ मेपर्यंत ८२६ आणि गत दहा दिवसात तर १०९३वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नाशिक जिल्ह्यात अधिक असण्याचे कारण जिल्ह्यातील सर्वेक्षण यंत्रणेचे प्रभावी काम आहे. कोरोनाबाधित रुग्ण प्राथमिक अवस्थेत शोधून काढल्याने त्यांच्यापासून इतरांना होणारी बाधा टळते तसेच हे रुग्ण बरे होण्याची शक्यतादेखील खूप मोठ्या प्रमाणात वाढते.-----------------------महानगरात नियमांचा भंगजिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सामान्य ग्रामस्थ सर्व नियमांचे पालन करीत असताना महानगरातील नागरिक मात्र महानगरातील प्रत्येक बाजारपेठेत गर्दी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे.------------------------मृत्युदरातील वाढ धोक्याची घंटानाशिक जिल्ह्यात १ मेपर्यंत १२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यात दोन आठवड्यात २१ने वाढ होऊन १४ मेदरम्यान मृतांचा आकडा ३३वर पोहोचला होता. त्यानंतरच्या आठवडाभरात १३ जणांचा बळी गेल्याने मृतांची संख्या ४६ झाली, तर २१ मेपासून ९ जून या २० दिवसांत मृतांची संख्या ४६वरून १०२वर म्हणजेच दुपटीहून अधिक वाढली असून, हे वाढते प्रमाण नाशिकसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. दरम्यान, महानगरातील बाधित रुग्णसंख्येच्या प्रमाणात वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणादेखील संभ्रमित झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक