शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

जिल्ह्यात आणखी दोन शेतकऱ्याची आत्महत्या; संख्या ९६ च्या घरात पोहोचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 20:16 IST

नाशिक : जिल्ह्यात दोन दिवसात दोन शेतकऱ्यानी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याने आत्महत्या करणाऱ्या  शेतकऱ्याची संख्या ९६ झाली असून, शेतकऱ्याच्या लागोपाठच्या आत्महत्येने प्रशासन हवालदिल झाले आहे.कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून शेतकºयांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण यंदा जानेवारी महिन्यापासून कायम असून, त्यात एक महिनाही खंड पडलेला नाही. विशेष म्हणजे यंदा राज्य सरकारने शेतकऱ्या  दिड लाखापर्यंतचे ...

ठळक मुद्देकर्जबाजारी व नापिकीला कंटाळून शेतकºयांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण यंदा जानेवारी महिन्यापासून कायम दोन दिवसाच्या शेतकरी आत्महत्येने जिल्ह्यातील संख्या ९६ च्या घरात पोहोचली

नाशिक : जिल्ह्यात दोन दिवसात दोन शेतकऱ्यानी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याने आत्महत्या करणाऱ्या  शेतकऱ्याची संख्या ९६ झाली असून, शेतकऱ्याच्या लागोपाठच्या आत्महत्येने प्रशासन हवालदिल झाले आहे.कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून शेतकºयांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण यंदा जानेवारी महिन्यापासून कायम असून, त्यात एक महिनाही खंड पडलेला नाही. विशेष म्हणजे यंदा राज्य सरकारने शेतकऱ्या  दिड लाखापर्यंतचे कर्जमाफ करण्याबरोबरच केंद्र सरकारनेही शेतकऱ्यासाठी अनेक योजना लागू केल्या आहेत. शिवाय चालू वर्षी मान्सूननेही चांगला हात दिल्याने खरीपाची पीक चांगलेच बहरले आहे. अशा परिस्थितीतही जिल्ह्यातील सधन तालुक्यातील शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे विदारक चित्र आहे. मंगळवारी दिंडोरी तालुक्यातील चौसाळे येथील आनंदा नारायण केदारे (७०) या वृद्ध शेतकºयाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यापाठोपाठ बुधवारी बागलाण तालुक्यातील जायखेडा येथे राहणारे मधुकर पुंडलिक पवार (५४) या शेतकऱ्याने निताने शिावारात विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. पवार यांची लाडूत शिवारात शेती असून, त्यांच्या नावे सोसायटीचे कर्ज आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व तीन मुली असा परिवार आहे. या घटनेची खबर तहसिल कार्यालयात तसेच नामपुर पोलिसांना देण्यात आली आहे. लागोपाठ दोन दिवसाच्या शेतकरी आत्महत्येने जिल्ह्यातील संख्या ९६ च्या घरात पोहोचली असून, गेल्या वर्षी हेच प्रमाण ८६ इतके होते. शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्याकामी शासनाची कोणतीही मात्रा लागू पडत नसल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.