शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

खटल्यांच्या तुलनेत न्यायधीशांची संख्या कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:48 IST

नाशिक : देशभरात वाढत्या लोकसंख्येबरोबरच गुन्हेगारीही वाढत चालली असून, दिवसेंदिवस न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्याही वाढते आहे़ मात्र, या प्रलंबित खटल्यांच्या संख्येच्या तुलनेत सद्यस्थितीत काम करणाºया न्यायाधीशांची संख्या अत्यंत तोकडी आहे़ त्यामुळे उभय पक्षांमधील वाद समुपदेशनाने आणि सामंजस्याने सोडविण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी ...

नाशिक : देशभरात वाढत्या लोकसंख्येबरोबरच गुन्हेगारीही वाढत चालली असून, दिवसेंदिवस न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्याही वाढते आहे़ मात्र, या प्रलंबित खटल्यांच्या संख्येच्या तुलनेत सद्यस्थितीत काम करणाºया न्यायाधीशांची संख्या अत्यंत तोकडी आहे़ त्यामुळे उभय पक्षांमधील वाद समुपदेशनाने आणि सामंजस्याने सोडविण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष जयंत जायभावे यांनी ‘कोर्टाची पायरी चढण्याआधी’ या कार्यक्रमात केले़  रोटरी क्लब आॅफ नाशिक आणि रोटरी क्लब नाशिक (पश्चिम) यांच्या संयुक्तविद्यमाने गंजमाळ येथील रोटरी हॉलमध्ये ‘कोर्टाची पायरी चढण्याआधी’ या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. जायभावे पुढे बोलताना म्हणाले की, भारतीय दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये सन २००२ च्या दुरुस्त्यांचा गाभा हा कोर्टात प्रकरण दाखल करण्याच्या आधीपासून, प्रकरणाचे काम कोर्टात चालू असताना पक्षकारांमध्ये सामोपचाराने वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करणे हा महत्त्वाचा भाग आहे. उभय पक्षाचे वकील आणि न्यायालय यांच्यावरील जबाबदारी जायभावे यांनी सांगितली़  राजेश्वरी बालाजीवाले आणि मनीष चिंधडे यांनी मान्यवरांची मुलाखत घेतली.  या कार्यक्रमास रोटरी क्लब आॅफ नाशिकचे अध्यक्ष दिलीपसिंग बेनिवाल आणि रोटरी क्लब आॅफ वेस्टच्या अध्यक्ष सीमा पछाडे यांच्यासह नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेखर ब्राह्मणकर आणि उपासना टिबरेवाल यांनी परिश्रम घेतले.लोकन्यायालयाचे महत्त्वन्या. सुधीरकुमार बुके यांनी लोकन्यायालयाचे महत्त्व विशद करून त्यातील तरतुदींची माहिती दिली. न्याय मिळणे खर्चिक होत असताना, लोकन्यायालयाच्या माध्यमातून खटले सामोपचाराने सोडवण्यावर समाजाने भर देणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले़ अ‍ॅड़ इंद्रायणी पटणी यांनी कौटुंबिक वादाच्या वाढत्या तक्रारींबाबत चिंता व्यक्तकरून या न्यायालयातील वादाच्या निराकरणासाठी समुपदेशनाची गरज असल्याचे सांगितले़

टॅग्स :advocateवकिल