शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

खटल्यांच्या तुलनेत न्यायधीशांची संख्या कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:48 IST

नाशिक : देशभरात वाढत्या लोकसंख्येबरोबरच गुन्हेगारीही वाढत चालली असून, दिवसेंदिवस न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्याही वाढते आहे़ मात्र, या प्रलंबित खटल्यांच्या संख्येच्या तुलनेत सद्यस्थितीत काम करणाºया न्यायाधीशांची संख्या अत्यंत तोकडी आहे़ त्यामुळे उभय पक्षांमधील वाद समुपदेशनाने आणि सामंजस्याने सोडविण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी ...

नाशिक : देशभरात वाढत्या लोकसंख्येबरोबरच गुन्हेगारीही वाढत चालली असून, दिवसेंदिवस न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्याही वाढते आहे़ मात्र, या प्रलंबित खटल्यांच्या संख्येच्या तुलनेत सद्यस्थितीत काम करणाºया न्यायाधीशांची संख्या अत्यंत तोकडी आहे़ त्यामुळे उभय पक्षांमधील वाद समुपदेशनाने आणि सामंजस्याने सोडविण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष जयंत जायभावे यांनी ‘कोर्टाची पायरी चढण्याआधी’ या कार्यक्रमात केले़  रोटरी क्लब आॅफ नाशिक आणि रोटरी क्लब नाशिक (पश्चिम) यांच्या संयुक्तविद्यमाने गंजमाळ येथील रोटरी हॉलमध्ये ‘कोर्टाची पायरी चढण्याआधी’ या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. जायभावे पुढे बोलताना म्हणाले की, भारतीय दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये सन २००२ च्या दुरुस्त्यांचा गाभा हा कोर्टात प्रकरण दाखल करण्याच्या आधीपासून, प्रकरणाचे काम कोर्टात चालू असताना पक्षकारांमध्ये सामोपचाराने वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करणे हा महत्त्वाचा भाग आहे. उभय पक्षाचे वकील आणि न्यायालय यांच्यावरील जबाबदारी जायभावे यांनी सांगितली़  राजेश्वरी बालाजीवाले आणि मनीष चिंधडे यांनी मान्यवरांची मुलाखत घेतली.  या कार्यक्रमास रोटरी क्लब आॅफ नाशिकचे अध्यक्ष दिलीपसिंग बेनिवाल आणि रोटरी क्लब आॅफ वेस्टच्या अध्यक्ष सीमा पछाडे यांच्यासह नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेखर ब्राह्मणकर आणि उपासना टिबरेवाल यांनी परिश्रम घेतले.लोकन्यायालयाचे महत्त्वन्या. सुधीरकुमार बुके यांनी लोकन्यायालयाचे महत्त्व विशद करून त्यातील तरतुदींची माहिती दिली. न्याय मिळणे खर्चिक होत असताना, लोकन्यायालयाच्या माध्यमातून खटले सामोपचाराने सोडवण्यावर समाजाने भर देणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले़ अ‍ॅड़ इंद्रायणी पटणी यांनी कौटुंबिक वादाच्या वाढत्या तक्रारींबाबत चिंता व्यक्तकरून या न्यायालयातील वादाच्या निराकरणासाठी समुपदेशनाची गरज असल्याचे सांगितले़

टॅग्स :advocateवकिल