शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशी भाविकांच्या संख्येत घट

By admin | Updated: February 22, 2016 23:36 IST

दुसऱ्या दिवशी भाविकांच्या संख्येत घट

वडांगळी : अखिल भारतीय बंजारा समाजाचे आराध्यदैवत असलेल्या येथील सतीमाता - सामतदादा यात्रोत्सवावर यंदा दुष्काळाचा परिणाम जाणवून आला. दरवर्षीच्या तुलनेत यंदा बंजारा भाविकांची संख्या घटल्याने व्यापाऱ्यांचा हिरमोड झाला. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सुमारे २० हजारांहून अधिक भाविकांनी सतीमाता व सामतदादा चरणी लीन होत दर्शन घेतले. नवसपूर्तीसाठी सोमवारी सुमारे दीडशे बोकडांचा बळी देण्यात आला.रविवारी रात्री १० वाजून ३३ मिनिटांनी माघ पौर्णिमेस प्रारंभ झाला. त्यामुळे आज पौर्णिमा असल्याने भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र आज दिवसभर पौर्णिमा असताना भाविकांची गर्दी कमी दिसून आली.सोमवारी नवसपूर्तीसाठी बोकडबळीचे प्रमाण कमी होते. पहाटे ५ वाजता आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते सामतदादा यांची तर पंचायत समितीच्या सभापती संगीता काटे व विजय काटे यांच्या हस्ते सतीमातेची महापूजा करण्यात आली. यावेळी देवस्थान संस्थानचे अध्यक्ष अशोक चव्हाण, उपाध्यक्ष रमेश खुळे, विश्वस्त उत्तम कुलथे, दिनकर खुळे, रमेश राठोड, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक खुळे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सुदेश खुळे, उपसरपंच नानासाहेब खुळे, ग्रामपंचायत सदस्य शरद खुळे उपस्थित होते.गावची गावठी पब्लिक ट्रस्टच्या वतीने कातडी लिलाव करण्यात आला. या लिलावाची बोली एक लाख सात हजार रुपयांना गेली. गावातील लियाकत शेख यांनी सदर लिलाव घेतला. भाविकांकडून कातडी खरेदी करताना शेख यांना वेगळा मोबदला द्यावा लागणार आहे. दुपारी ४ वाजता सतीमाता व सामतदादा काठी व मुखवट्याची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. (वार्ताहर)