शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

अपघातातील मृतांची संख्या २६

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:21 IST

देवळा-मालेगाव रस्त्यावरील मेशी फाट्याजवळील विहिरीत बस आणि रिक्षा पडून मंगळवारी (दि. २८) झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या २६ झाली आहे. बुधवारी (दि. २९) सकाळी दोन वर्षाच्या बालकाचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर १८ तासांनी मदतकार्य थांबविण्यात आले. मृतांवर त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ठळक मुद्देमृतांवर अंत्यसंस्कार : रिक्षातील मयतांच्या वारसांनाही मदत जाहीर

नाशिक : देवळा-मालेगाव रस्त्यावरील मेशी फाट्याजवळील विहिरीत बस आणि रिक्षा पडून मंगळवारी (दि. २८) झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या २६ झाली आहे. बुधवारी (दि. २९) सकाळी दोन वर्षाच्या बालकाचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर १८ तासांनी मदतकार्य थांबविण्यात आले. मृतांवर त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, परिवहनमंत्री अनिल परब आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी देवळा-मालेगाव येथील रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता धुळे-कळवण बस रिक्षेवर धडकल्यानंतर बससह रिक्षा विहिरीत पडली. या भीषण अपघातात २६ जणांचा बळी गेला. मंगळवारी रात्री २ वाजेपर्यंत विहिरीत अडकलेल्या २५ प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. परंतु, मदतकार्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे रात्री उशिरा थांबविण्यात आलेले मदतकार्य बुधवारी (दि.२९) सकाळी पुन्हा सुरू करण्यात आले. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास निंबायती येथील दोन वर्षाच्या बालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान, एनडीआरएफचे पथकही मदतकार्यात सहभागी झाले होते. घटनास्थळी विहिरीतून बाहेर काढलेल्या प्रवाशांचे सामान, चपला-बूट यांचा खच पडलेला होता, तर रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झालेला होता. रिक्षात असलेल्या मन्सुरी कुटुंबीयांतील आठ जणांचा बळी गेल्याने त्यांचे मूळ गाव येसगाव तर शोकसागरात बुडाले होते.रिक्षातील मयतांच्या वारसांना मदत जाहीरपालकमंत्री छगन भुजबळ, परिवहनमंत्री अनिल परब आणि कृषिमंत्री दादा भुसे यांनी मालेगाव-देवळा येथील रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच रिक्षातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये मदत देण्याचे जाहीर केले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनीही घटनास्थळी पाहणी करतानाच जखमींची विचारपूस केली.अपघाताच्या कारणांचा शोध सुरूअपघाताच्या कारणांचा शोध परिवहन महामंडळाने सुरू केला आहे. जखमी प्रवाशांनीही चालकास जबाबदार धरले आहे. बसचे पुढील टायर फुटून सदर अपघात घडल्याचे प्रारंभी सांगितले जात होते; परंतु, विहिरीतून अपघातग्रस्त बस बाहेर काढल्यानंतर बसचे सर्व टायर्स सुस्थितीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे नेमका अपघात कशामुळे झाला, याची चौकशी परिवहन महामंडळाने आरंभली आहे.राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून शोक संदेशअपघाताबद्दल राष्टÑपती आणि पंतप्रधान यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. राष्टÑपती रामनाथ कोविंद यांनी शोकसंदेशात म्हटले आहे, महाराष्टÑातील नाशिकमध्ये झालेल्या अपघाताची घटना ऐकून दु:ख झाले. अपघातात प्राण गमावलेल्यांच्याप्रति संवेदना प्रकट करतो. जखमी व्यक्ती लवकरच बरे होवोत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्टÑाच्या नाशिकमध्ये घडलेला अपघात हा दुर्दैवी आहे. या दु:खदप्रसंगी मी मृतांच्या नातेवाइकांसोबत आहे. अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत हीच इच्छा, असे ट्विट केले आहे.

टॅग्स :Accidentअपघात