शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

अपघातातील मृतांची संख्या २६

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:21 IST

देवळा-मालेगाव रस्त्यावरील मेशी फाट्याजवळील विहिरीत बस आणि रिक्षा पडून मंगळवारी (दि. २८) झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या २६ झाली आहे. बुधवारी (दि. २९) सकाळी दोन वर्षाच्या बालकाचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर १८ तासांनी मदतकार्य थांबविण्यात आले. मृतांवर त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ठळक मुद्देमृतांवर अंत्यसंस्कार : रिक्षातील मयतांच्या वारसांनाही मदत जाहीर

नाशिक : देवळा-मालेगाव रस्त्यावरील मेशी फाट्याजवळील विहिरीत बस आणि रिक्षा पडून मंगळवारी (दि. २८) झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या २६ झाली आहे. बुधवारी (दि. २९) सकाळी दोन वर्षाच्या बालकाचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर १८ तासांनी मदतकार्य थांबविण्यात आले. मृतांवर त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, परिवहनमंत्री अनिल परब आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी देवळा-मालेगाव येथील रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता धुळे-कळवण बस रिक्षेवर धडकल्यानंतर बससह रिक्षा विहिरीत पडली. या भीषण अपघातात २६ जणांचा बळी गेला. मंगळवारी रात्री २ वाजेपर्यंत विहिरीत अडकलेल्या २५ प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. परंतु, मदतकार्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे रात्री उशिरा थांबविण्यात आलेले मदतकार्य बुधवारी (दि.२९) सकाळी पुन्हा सुरू करण्यात आले. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास निंबायती येथील दोन वर्षाच्या बालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान, एनडीआरएफचे पथकही मदतकार्यात सहभागी झाले होते. घटनास्थळी विहिरीतून बाहेर काढलेल्या प्रवाशांचे सामान, चपला-बूट यांचा खच पडलेला होता, तर रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झालेला होता. रिक्षात असलेल्या मन्सुरी कुटुंबीयांतील आठ जणांचा बळी गेल्याने त्यांचे मूळ गाव येसगाव तर शोकसागरात बुडाले होते.रिक्षातील मयतांच्या वारसांना मदत जाहीरपालकमंत्री छगन भुजबळ, परिवहनमंत्री अनिल परब आणि कृषिमंत्री दादा भुसे यांनी मालेगाव-देवळा येथील रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच रिक्षातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये मदत देण्याचे जाहीर केले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनीही घटनास्थळी पाहणी करतानाच जखमींची विचारपूस केली.अपघाताच्या कारणांचा शोध सुरूअपघाताच्या कारणांचा शोध परिवहन महामंडळाने सुरू केला आहे. जखमी प्रवाशांनीही चालकास जबाबदार धरले आहे. बसचे पुढील टायर फुटून सदर अपघात घडल्याचे प्रारंभी सांगितले जात होते; परंतु, विहिरीतून अपघातग्रस्त बस बाहेर काढल्यानंतर बसचे सर्व टायर्स सुस्थितीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे नेमका अपघात कशामुळे झाला, याची चौकशी परिवहन महामंडळाने आरंभली आहे.राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून शोक संदेशअपघाताबद्दल राष्टÑपती आणि पंतप्रधान यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. राष्टÑपती रामनाथ कोविंद यांनी शोकसंदेशात म्हटले आहे, महाराष्टÑातील नाशिकमध्ये झालेल्या अपघाताची घटना ऐकून दु:ख झाले. अपघातात प्राण गमावलेल्यांच्याप्रति संवेदना प्रकट करतो. जखमी व्यक्ती लवकरच बरे होवोत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्टÑाच्या नाशिकमध्ये घडलेला अपघात हा दुर्दैवी आहे. या दु:खदप्रसंगी मी मृतांच्या नातेवाइकांसोबत आहे. अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत हीच इच्छा, असे ट्विट केले आहे.

टॅग्स :Accidentअपघात