शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

...अब क्यो आयेंगे नासिक कुंभमेला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2015 23:17 IST

परराज्यांतील भाविकांचा सवाल : पोलिसी अतिरेकीपणामुळे द्वितीय-तृतीय कुंभपर्वणीच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह

 नाशिक : ‘लग रहा है मानवता का मेला, आओ नासिक कुंभमेला’ असे आवाहन करत देशभर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ब्रँडिंगवर कोट्यवधी रुपये उधळणाऱ्या जिल्हा प्रशासनाभोवती आता असंख्य प्रश्नांचे मोहोळ घोंगावत असून, पहिल्या कुंभपर्वणीला पोलिसी अतिरेकीपणामुळे प्रचंड मनस्ताप सहन कराव्या लागणाऱ्या परराज्यातील भाविकांच्या मुखातून आता ‘हो गया मानवता का झमेला, अब क्यो आयेंगे नासिक कुंभमेला’ असे संतप्त भाव व्यक्त होताना दिसून येत आहेत. अनुभवशून्य अधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजनाचा जबर फटका पहिल्या कुंभपर्वणीला भाविकांना बसल्याने त्याची दुष्कीर्ती जगभर जाऊन पोहोचली असून, त्याचा परिणाम दि. १३ आणि १८ सप्टेंबरला होणाऱ्या शाहीपर्वणीला भाविकांच्या उपस्थितीवर जाणवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. एरव्ही आपल्या हक्कांसाठी बहिष्काराचे अस्त्र उगारणाऱ्या साधू-महंतांकडूनही भाविकांच्या श्रद्धेचा तसूभरही विचार न झाल्याने साधू आणि भाविक यांच्यातील आत्मभावाचे नाटकही यानिमित्ताने विंगेतून बाहेर आले आहे. शनिवार, दि. २९ आॅगस्टला झालेल्या पहिल्या शाही पर्वणीच्या दिवशी संपूर्ण शहराला बॅरिकेडिंगच्या माध्यमातून करकचून आवळणाऱ्या पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने कुंभमेळ्याचा मूळ आत्मा असलेल्या भाविकांनाच त्यापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. स्थानिक नागरिकांची घरातच कोंडी करत आणि बाहेरून येणाऱ्या भाविकांनाही १५-२० कि.मी. पायपीट करायला लावत प्रचंड मनस्ताप देणाऱ्या पोलीस आणि जिल्हा प्रशासनाविरुद्ध आता सर्वस्तरातून निषेधाचा सूर उमटू लागला आहे. शाही पर्वणीच्या आदल्या आणि नंतरच्या दिवशी सलग तीन दिवस शहरातील रस्ते वाहतुकीला बंद करण्याच्या ‘बाळबोध’ नियोजनाचा धसका स्थानिक नाशिककरांनी घेतला आणि त्यांनी दिवसभर घराबाहेर न पडणेच पसंत केले.