शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

जनतंत्र उलथवणाऱ्यांवर आता हल्लाबोलची वेळ : मेधा पाटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 01:17 IST

: इंधन महागाई, ऊर्जा महागाई तसेच उर्जेच्या स्त्रोतांसह सर्वत्र खासगीकरणाचे थैमान सुरू आहे. समाजाच्या सर्व जीवनावश्यक बाबींना धनिकांच्या हाती सोपविण्याचा या केंद्र सरकारचा डाव आहे. त्यामुळे केवळ शेतकरी किंवा कामगारांच्या विरोधात नव्हे तर हे सरकार सामान्यांच्या विरोधात, संविधानाच्या विरोधात असून हा समस्त जनतंत्रावरील हल्ला असल्याने त्याविरोधात सर्वांनी एकत्र येऊन हल्लाबोल करण्याची हीच वेळ असल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केले. यावेळी पाटकर यांच्या हस्ते ज्येष्ठ नेते मोहन शर्मा यांना माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देमोहन शर्मा यांना माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार प्रदान

नाशिक : इंधन महागाई, ऊर्जा महागाई तसेच उर्जेच्या स्त्रोतांसह सर्वत्र खासगीकरणाचे थैमान सुरू आहे. समाजाच्या सर्व जीवनावश्यक बाबींना धनिकांच्या हाती सोपविण्याचा या केंद्र सरकारचा डाव आहे. त्यामुळे केवळ शेतकरी किंवा कामगारांच्या विरोधात नव्हे तर हे सरकार सामान्यांच्या विरोधात, संविधानाच्या विरोधात असून हा समस्त जनतंत्रावरील हल्ला असल्याने त्याविरोधात सर्वांनी एकत्र येऊन हल्लाबोल करण्याची हीच वेळ असल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केले. यावेळी पाटकर यांच्या हस्ते ज्येष्ठ नेते मोहन शर्मा यांना माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने आयोजित भव्य वीज कामगार मेळावा आणि माधवराव गायकवाड जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना पाटकर यांनी मोदींनी त्यांची खुर्ची सोडून संपूर्ण देश लिलावात काढला असल्याचे सांगितले. त्यामुळे आता केवळ शेतकरी किंवा केवळ कामगारांचे स्वतंत्र प्रश्न आणि स्वतंत्र आंदोलने करून चालणार नसून सर्वांनी मिळून एकत्रित लढाई लढावी लागणार आहे. या शासनाला सर्व शासकीय, निमशासकीय प्रकल्पांतील सर्व लाभ त्यांच्या जवळच्या उद्योजकांना द्यायचे असल्याने हा लढा आता जिद्दीने, चिकाटीने लढावा लागणार आहे. गत ५० वर्षात जितके बेरोजगार नव्हते, तेवढे बेरोजगार या काळात झाले असून सारं काही तंत्रज्ञान आणि खासगीकरणाच्या घशात ढकलायचे आहे. प्रत्येक क्षेत्रात कंत्राट, नफेखोरीतून कमाई काढण्याचे त्यांचे डावपेच आहेत. सत्कारार्थी मोहन शर्मा यांनी खासगी कंपन्यांनी मध्यप्रदेशात वीज पारेषण कंपनी केवळ १२०० रुपयांमध्ये विकत घेतली असून ही केवळ सुरुवात आहे. भविष्यात ते मध्यप्रदेशसह देशभरात वीजनिर्मिती कंपन्या हातात घेणार असल्याने आताच मोठा संघर्ष उभारुन हे सरकार उलथवून टाकण्याचे आवाहन शर्मा यांनी केले. यावेळी कृष्णा भोयर, व्ही.डी. धनवटे, मिलिंद रानडे, अरुण म्हस्के, एम. आर. खतीब यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचीदेखील भाषणे झाली. राजू देसले यांनी सोमवारचा देशव्यापी बंद यशस्वी करण्याचा ठराव करीत त्यांचे विचार मांडले.

इन्फो

केवळ १ रुपया माझा

या सोहळ्यात मोहन शर्मा आणि श्रीमती रूपकमल शर्मा यांना भव्य पुष्पहार घालून गौरविण्यात आले. ३१ हजार रुपये सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी बोलताना शर्मा यांनी आयुष्यभराच्या संघर्षाबद्दल करण्यात आलेल्या या पुरस्काराचे मोल पैशात मोजता येणार नसून तो माझ्यासाठी अनमोल असल्याचे सांगितले. त्यामुळे या पुरस्काराच्या रकमेतील केवळ एक रुपया माझ्याकडे ठेवून उर्वरित सर्व निधी हा खंडकरी शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर लढा दिलेल्या माधवराव गायकवाड यांच्या विधानसभेतील भाषणांच्या पुस्तकांच्या प्रती छापण्याच्या निधीसाठी अर्पण करीत असल्याचे शर्मा यांनी सांगताच त्यांच्या या कृतीला सर्वांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

 

इन्फो

जिद्दीसह चिवट प्रतिकाराची गरज

तीन शेतकरीविरोधी कायदे मागे घेण्यास विरोध करतानाच २९ कामगारविरोधी कायदे मागे घेण्यास या शासनाला भाग पाडावे लागणार आहे. राज्यांना विचारात न घेता श्रमिक कायदे पुढे रेटले जात असल्याने आता केवळ जिद्द आणि चिवटतेच्या बळावरच केंद्र शासनाशी सर्व स्तरावरून संघर्ष करावा लागणार असल्याचे पाटकर यांनी नमूद केले.

 

टॅग्स :NashikनाशिकMedha Patkarमेधा पाटकर