शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

आता रिपाइंचेही राज्यात सोशल इंजिनिअरिंग

By admin | Updated: July 1, 2015 00:24 IST

आता रिपाइंचेही राज्यात सोशल इंजिनिअरिंग

नाशिक : ‘सर्वजन हिताय सर्वजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन रिपब्लिकन पक्षाने आता राज्यात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग राबविण्याची तयारी सुरू केली असून, नाशिकमध्ये खासदार रामदास आठवले यांच्या हस्ते सामाजिक समता अभियानाचे उद््घाटन करून त्याची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत आठवले म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या अपेक्षेने १९३० साली समता आंदोलन उभारले होते त्याचीच पुनरावृत्ती यानिमित्ताने करायची आहे. डॉ. आंबेडकरांच्या जयंतीला १२५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल २ मार्च २०१६ पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार असून, २ मार्च रोजी त्याचा समारोप गोल्फ क्लब मैदानावर करण्यात येणार आहे. समारोपप्रसंगी आंबेडकर चळवळीशी संबंधित सर्वच जाती धर्मातील १२५ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार असून, काळाराम मंदिरापासून ते गोल्फ क्लबपर्यंत भव्य रॅलीचेही आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आठवले यांनी दिली. याप्रसंगी जिल्'ाध्यक्ष प्रकाश लोंढे, महानगरप्रमुख पवन क्षीरसागर, दीपक डोके आदि उपस्थित होते. सत्तेत लवकरच वाटा मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला आहे. ते जेव्हा अमेरिकेतून येतील त्यानंतर आम्हाला सत्तेत वाटा मिळेल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. विविध महामंडळांची पदे देतानाही पाच टक्के महामंडळ आमच्या वाटेला येणार असून, आम्ही त्याचे वाटप पक्षातील सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये करणार आहोत, असेही ते म्हणाले. सत्ता मिळण्यासाठी चळवळीतील सर्व गट तट एकत्र येणार असतील तर त्याच्या नेतृत्वाचीही अट मी ठेवली नसून ते एकत्र यावेत हीच माझी इच्छा असल्याचेही ते म्हणाले.