शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
2
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
3
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
4
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
5
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
6
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
7
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
8
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
9
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
11
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
12
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
13
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
14
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
15
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
16
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
17
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
18
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
19
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
20
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
Daily Top 2Weekly Top 5

आता २०० वऱ्हाडींच्या उपस्थितीत होऊ शकणार ‘शुभ मंगल सावधान’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:20 IST

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध शिथिल करताना आता २०० वऱ्हाडींच्या उपस्थितीत विवाहाला परवानगी देण्यात आली असल्याने विवाह सोहळ्यात किमान ...

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध शिथिल करताना आता २०० वऱ्हाडींच्या उपस्थितीत विवाहाला परवानगी देण्यात आली असल्याने विवाह सोहळ्यात किमान कुटुंबातील जवळच्या नातेवाईकांना तरी उपस्थित राहणे शक्य होणार आहे. तसेच या विवाह सोहळ्यांमुळे या क्षेत्राशी निगडित अर्थचक्रदेखील सुरळीतपणे सुरू होऊ शकणार आहे.

राज्य शासनाने दिलेल्या निर्णयानुसार खुल्या प्रांगणातील किंवा लॉन्सवरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित आसनव्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने मात्र त्यातही जास्तीत जास्त २०० व्यक्ती इतक्या मर्यादेत उपस्थित राहू शकणार आहेत. या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई तसेच संबंधित जागेचा अर्थात मंगल कार्यालय, हॉटेल्सवर परवाना रद्दची कारवाई करण्याचा इशारादेखील या आदेशात देण्यात आला आहे.

मंगल कार्यालयासाठी या आहेत अटी

सर्व संबंधितांचे लसीकरण अत्यावश्यक

कोणत्याही परिस्थितीत विवाह सोहळ्याशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे दोन लसीकरण झालेले असणे अत्यावश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित संलग्न संस्था, व्यवस्थापक, कर्मचारी यांचीही दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे, याबाबतचे व्हीडिओ रेकॉर्डींग तसेच मागणीनुसार सक्षम अधिकाऱ्याकडे त्याचा पुरावा उपलब्ध करून देणेदेखील बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे विवाह सोहळ्यात कोणत्याही परिस्थितीत निर्धारित व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्ती बोलावणे शक्य होणार नाही.

मंगल कार्यालय चालकांना उत्साह

निदान ऑगस्टच्या मध्यापासून आता पुढील विवाहांना २०० नागरिकांची उपस्थिती शक्य होणार असल्याने काहीसा दिलासा मिळणार आहे. प्रशासनाचा निर्णय स्वागतार्ह असून त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करू. तसेच भविष्यात त्यातही अजून थोडी सूट मिळणे आवश्यक आहे.

देवदत्त जोशी, प्रसाद मंगल कार्यालय

विवाहाला २०० नागरिकांची मुभा देण्याचे आम्ही स्वागत करतो. मात्र, त्यातही शनिवार, रविवारी दिवसभर विवाहांना परवानगी मिळाल्यास ते नागरिकांच्या दृष्टीने अधिक सोयीस्कर होईल. तसेच हळूहळू निर्बंध अजून शिथिल केले जातील, अशी अपेक्षा आहे.

सुनील चोपडा, चोपडा लॉन्स

बॅन्ड पथकांना रोजगार

५० नागरिकांच्या उपस्थितीतील विवाहाला कुणी बॅन्डवाल्यांना बोलावत नव्हते. त्यामुळे सर्वच बॅन्डवाल्यांचा आणि त्यात काम करणाऱ्या सामान्य वादकांचा रोजगार बुडाला होता. या शासनामुळे आता थोड्या फार प्रमाणात तरी रोजगार मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.

नितीन देवरे, ओम ब्रास बॅन्ड

आमच्या वादकांना गत वर्षभरापासून काहीच काम उपलब्ध होत नसल्याने त्यांना कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवायचा असा प्रश्न पडलेला होता. या निर्णयामुळे थोडीशी आशा निर्माण झाली असली तरी हा निर्णय किती काळ राहील याबाबत निश्चितता वाटत नाही.

रंजन गुप्ता, गुप्ता ब्रास बॅन्ड

विवाह मुहूर्त

विवाहाचे प्रमुख मुहूर्त हे १५ जुलैपूर्वीच होते. त्यानंतर पंचांगांतील मुहूर्त थेट १५ नोव्हेंबरनंतर १३ डिसेंबरपर्यंतच आहेत. मात्र, अधिक काळ लांबवल्यास विवाहात विघ्ने निर्माण होतात. तसेच भविष्यातील कोरोना परिस्थितीचाही अंदाज नसल्याने नागरिकांचा कोरोना कमी असल्याच्या कालावधीत विवाह उरकून घेण्याकडे कल वाढला आहे. आपत्कालीन स्थितीमध्ये काही शुभ दिवसांनादेखील विवाह उरकून घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.