शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

आता २०० वऱ्हाडींच्या उपस्थितीत होऊ शकणार ‘शुभ मंगल सावधान’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:20 IST

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध शिथिल करताना आता २०० वऱ्हाडींच्या उपस्थितीत विवाहाला परवानगी देण्यात आली असल्याने विवाह सोहळ्यात किमान ...

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध शिथिल करताना आता २०० वऱ्हाडींच्या उपस्थितीत विवाहाला परवानगी देण्यात आली असल्याने विवाह सोहळ्यात किमान कुटुंबातील जवळच्या नातेवाईकांना तरी उपस्थित राहणे शक्य होणार आहे. तसेच या विवाह सोहळ्यांमुळे या क्षेत्राशी निगडित अर्थचक्रदेखील सुरळीतपणे सुरू होऊ शकणार आहे.

राज्य शासनाने दिलेल्या निर्णयानुसार खुल्या प्रांगणातील किंवा लॉन्सवरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित आसनव्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने मात्र त्यातही जास्तीत जास्त २०० व्यक्ती इतक्या मर्यादेत उपस्थित राहू शकणार आहेत. या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई तसेच संबंधित जागेचा अर्थात मंगल कार्यालय, हॉटेल्सवर परवाना रद्दची कारवाई करण्याचा इशारादेखील या आदेशात देण्यात आला आहे.

मंगल कार्यालयासाठी या आहेत अटी

सर्व संबंधितांचे लसीकरण अत्यावश्यक

कोणत्याही परिस्थितीत विवाह सोहळ्याशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे दोन लसीकरण झालेले असणे अत्यावश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित संलग्न संस्था, व्यवस्थापक, कर्मचारी यांचीही दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे, याबाबतचे व्हीडिओ रेकॉर्डींग तसेच मागणीनुसार सक्षम अधिकाऱ्याकडे त्याचा पुरावा उपलब्ध करून देणेदेखील बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे विवाह सोहळ्यात कोणत्याही परिस्थितीत निर्धारित व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्ती बोलावणे शक्य होणार नाही.

मंगल कार्यालय चालकांना उत्साह

निदान ऑगस्टच्या मध्यापासून आता पुढील विवाहांना २०० नागरिकांची उपस्थिती शक्य होणार असल्याने काहीसा दिलासा मिळणार आहे. प्रशासनाचा निर्णय स्वागतार्ह असून त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करू. तसेच भविष्यात त्यातही अजून थोडी सूट मिळणे आवश्यक आहे.

देवदत्त जोशी, प्रसाद मंगल कार्यालय

विवाहाला २०० नागरिकांची मुभा देण्याचे आम्ही स्वागत करतो. मात्र, त्यातही शनिवार, रविवारी दिवसभर विवाहांना परवानगी मिळाल्यास ते नागरिकांच्या दृष्टीने अधिक सोयीस्कर होईल. तसेच हळूहळू निर्बंध अजून शिथिल केले जातील, अशी अपेक्षा आहे.

सुनील चोपडा, चोपडा लॉन्स

बॅन्ड पथकांना रोजगार

५० नागरिकांच्या उपस्थितीतील विवाहाला कुणी बॅन्डवाल्यांना बोलावत नव्हते. त्यामुळे सर्वच बॅन्डवाल्यांचा आणि त्यात काम करणाऱ्या सामान्य वादकांचा रोजगार बुडाला होता. या शासनामुळे आता थोड्या फार प्रमाणात तरी रोजगार मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.

नितीन देवरे, ओम ब्रास बॅन्ड

आमच्या वादकांना गत वर्षभरापासून काहीच काम उपलब्ध होत नसल्याने त्यांना कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवायचा असा प्रश्न पडलेला होता. या निर्णयामुळे थोडीशी आशा निर्माण झाली असली तरी हा निर्णय किती काळ राहील याबाबत निश्चितता वाटत नाही.

रंजन गुप्ता, गुप्ता ब्रास बॅन्ड

विवाह मुहूर्त

विवाहाचे प्रमुख मुहूर्त हे १५ जुलैपूर्वीच होते. त्यानंतर पंचांगांतील मुहूर्त थेट १५ नोव्हेंबरनंतर १३ डिसेंबरपर्यंतच आहेत. मात्र, अधिक काळ लांबवल्यास विवाहात विघ्ने निर्माण होतात. तसेच भविष्यातील कोरोना परिस्थितीचाही अंदाज नसल्याने नागरिकांचा कोरोना कमी असल्याच्या कालावधीत विवाह उरकून घेण्याकडे कल वाढला आहे. आपत्कालीन स्थितीमध्ये काही शुभ दिवसांनादेखील विवाह उरकून घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.