शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

...आता काश्मीरमध्ये देशभक्ती होईल बळकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 00:37 IST

कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीरला मिळालेले विशेषाधिकार हे केवळ कागदोपत्री होते. भारताचे ते आविभाज्य अंग असूनदेखील नसल्यासारखे होते. त्या राज्याचा स्वतंत्र राष्टÑध्वज होता, यामुळे भारताविषयीचे प्रेम तेथील जनतेत वृद्धिंगत होण्यास अडथळा निर्माण होत होता. कलम ३७० हटविण्यात आल्याने भारतीय देशप्रेम, राष्टÑभक्तीची भावना काश्मीरमध्ये अधिक बळकट होईल आणि भारतासोबत काश्मीरच्या भविष्याची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होण्यास मदत होईल, असा आशावाद जम्मू-काश्मीर अभ्यास केंद्राचे संचालक अरुणकुमार यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देअरुणकुमार : ३७० हटविल्याने भारतीय संविधानाचा काश्मीर प्रवेश

नाशिक : कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीरला मिळालेले विशेषाधिकार हे केवळ कागदोपत्री होते. भारताचे ते आविभाज्य अंग असूनदेखील नसल्यासारखे होते. त्या राज्याचा स्वतंत्र राष्टÑध्वज होता, यामुळे भारताविषयीचे प्रेम तेथील जनतेत वृद्धिंगत होण्यास अडथळा निर्माण होत होता. कलम ३७० हटविण्यात आल्याने भारतीय देशप्रेम, राष्टÑभक्तीची भावना काश्मीरमध्ये अधिक बळकट होईल आणि भारतासोबत काश्मीरच्या भविष्याची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होण्यास मदत होईल, असा आशावाद जम्मू-काश्मीर अभ्यास केंद्राचे संचालक अरुणकुमार यांनी व्यक्त केला.सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित भोसला मिलिटरी कॉलेज संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाच्या वतीने रविवारी (दि.१५) गंगापूररोडवरील कुर्तकोटी सभागृहात ‘जम्मू-काश्मीर आणि लडाख : ५ आॅगस्ट २०१९ पूर्वी आणि नंतर’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी अरुणकुमार प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल तथा सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय शेकटकर, कार्याध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, कॅप्टन डॉ. श्रीपाद नरवणे व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी अरुणकुमार म्हणाले, काश्मीरच्या संघर्षात मागील ७२ वर्षांमध्ये अनेक शूरवीरांनी हौतात्म्य पत्करले आहे. त्यामुळे काश्मीर भारताच्या नकाशात टिकून आहे. काश्मीरचे महत्त्व लडाख, पाकव्याप्त काश्मीर आणि चीन व्याप्त प्रदेशामुळे अधिक आहे. कलम ३७० हा काश्मीरच्या विकासमार्गातील आणि तेथील जनतेला त्यांचे मूलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी मोठा अडसर होता, असेही अरुणकुमार यावेळी म्हणाले.व्यवस्था सुधारणारजम्मू-काश्मीरमध्ये ७२ वर्षांत ढासळलेली व्यवस्था सुधारण्याचा मार्ग ५ आॅगस्ट २०१९ नंतर या सरकारने खुला केला. त्यामुळे आता भविष्यात काश्मीरमध्ये वाईट काही नाही, तर चांगलेच घडणार असून तेथील जनतेच्या मनात आत्मविश्वास वाढीस लागून भारताविषयीची अस्मिता अधिक मजबूत होईल, असे अरुणकुमार यावेळी म्हणाले. कोणत्याही राष्टÑाची उभारणी व निर्मिती ही देशप्रेमाच्या भावनेने होत असते, हे आपण विसरून चालणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिकPoliticsराजकारण