शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

आता पार्किंग कोंडी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 01:01 IST

आगामी वीस वर्षांत संबंधित शहर कसे असावे, यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यामुळे नियोजनाची दिशा ठरल्याचा आणि त्यात अनेक सवलती असल्याचा गाजावाजा केला गेला असला तरी या आराखड्याच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या बांधकाम नियंत्रण नियमावलीत अनेक गंभीर उणिवा असून, त्याचा फटका विकासकांना पर्यायाने थेट नागरिकांना बसत आहे.

नाशिक : आगामी वीस वर्षांत संबंधित शहर कसे असावे, यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यामुळे नियोजनाची दिशा ठरल्याचा आणि त्यात अनेक सवलती असल्याचा गाजावाजा केला गेला असला तरी या आराखड्याच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या बांधकाम नियंत्रण नियमावलीत अनेक गंभीर उणिवा असून, त्याचा फटका विकासकांना पर्यायाने थेट नागरिकांना बसत आहे. कपाट कोंडीसारख्या विषयात शासनाच्या निर्बंधामुळे वाढीव टीडीआर आणि पर्यायाने अतिरिक्त चटई क्षेत्र न मिळाल्याने कपाट कोंडी झाली. ती फोडण्याची प्रक्रिया राबविण्यास तब्बल तीन वर्षे गेली. आता विकासक आणि पर्यायाने नाशिककरांसमोरच बांधकामे करताना नवीनच संकट उभे राहिले आहे ते म्हणजे पार्किंग म्हणजे वाहनतळाचे!  मुंबई-पुण्याच्या तुलनेत नाशिक शहराचीदेखील झपाट्याने वाढ होत असताना त्या तुलनेत निर्माण होणाऱ्या समस्या आज ना उद्या नाशिककरांना भेडसावणार आहेत, हे उघड आहे. परंंतु त्यावर नियंत्रण म्हणून आत्तापासूनच महापालिकेच्या यंत्रणेने जी नियमावली केली आहे ती म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशा प्रकारातील आहे. मुंबई-पुण्यात एखाद्या वाहनतळासाठी जितकी जागा सोडावी लागत नाही त्यापेक्षा अधिक जागा नाशिकमध्ये नवीन इमारत बांधताना किंवा पुनर्विकासासाठी सोडावी लागत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात जागा सोडणे शक्य नाही आणि जागा सोडलीच तर त्यासाठी कराव्या लागणाºया उपाययोजनांमुळे बांधकाम खर्चात वाढ होते.मुळातच राज्य शासनाने सहा व साडेसात मीटर रस्त्याच्या रुंदीलगत बांधकाम करताना मूळ बांधकामाच्या व्यतिरिक्त अतिरिक्त टीडीआर देण्यास मनाई केली आहे. त्यात आता अ‍ॅमिनिटीसाठी जागा सोडणे आणि त्यावर पुन्हा वाहनतळासाठी जागा सोडणे अडचणीचे असून, छोट्या प्लॉटवर तर इमारतच उभी राहू शकत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळेच वाहनतळाच्या जागेसाठी जागा सोडविण्याची अट अडचणीची ठरली आहे.काय आहे समस्यानाशिक शहरात गावठाण वगळता कोणत्याही क्षेत्रात मूळ भूखंडाच्या मूलभूत चटई क्षेत्रानुसार तुलनेत १.१ इतके बांधकाम करता येते. त्यात टीडीआरचा वापर करून अतिरिक्त बांधकाम करता येत होते. परंतु नवीन बांधकाम नियंत्रण नियमावली (डीसीपीआर)नुसार सामासिक आणि वाहनतळासाठी इतकी जागा सोडावी लागत आहे की तेथे इमारतीचे बांधकाम होऊच शकत नाही, अशी स्थिती आहे. मुंबई-पुण्याच्या ठिकाणी वाहनांची घनता (व्हेडीकल डेन्सिटी) खूप आहे. त्या तुलनेत नाशिकमध्ये नाही.४विशेष म्हणजे नाशिकच्या वाहन घनतेचा फारसा अभ्यासच झालेला नाही. त्यामुळे कशाच्या आधारे इतके क्षेत्र सोडावे लागते हे कोडे सर्वांनाच पडले आहे. सध्या नॅशनल बिल्डिंग कोडनुसार आता स्टील आणि अन्य साहित्य वापराची मानके अलीकडेच बदलण्यात आली आहेत. त्यात मुळातच बांधकाम खर्च हा दीडशे ते दोनशे रुपये अधिक वाढला आहे. तो इमारतीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असला तरी आता तो परवडणारा नाही.

टॅग्स :Nashikनाशिक