शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

आता सेना-मनसेच्या युतीची चर्चा

By admin | Updated: August 2, 2016 01:37 IST

राज-उद्धव भेट : उभय पक्षांना फुटल्या उकळ्या

नाशिक : मुंबईत राज ठाकरे यांनी मातोश्रीवर हजेरी लावून उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेनेत युती होण्याच्या चर्चांना ऊत आला आहे. विशेषत: हीच संधी साधून मनसेच्या वतीने सोशल मीडियावरच युती होणार असल्याचे व्हायरल केले जात आहे. त्यातही सेनेत प्रवेश करणाऱ्यांनो सावधान, तुमची अवस्था घर का ना घाट का अशी होऊ शकते, अशा पोस्ट पाठविल्या जात आहेत.राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधीही राजकीयदृष्ट्या एकत्र येऊ शकतात, अशी अटकळ बांधणाऱ्यांना शुक्रवारच्या राज आणि उद्धव भेटीने बळकटी मिळाली आहे. उभयतांकडून काहीही दावे प्रतिदावे केले जात असले तरी सेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना उकळी फुटली आहे. विशेषत: उभय पक्षांचे लक्ष महापालिका निवडणुकीत भाजपाला रोखण्याचे असल्याने या राजकीय स्वार्थासाठी ते एकत्र येऊ शकतात, अशी प्रतिक्रिया उभय पक्षांतून व्यक्त होत आहेत. त्यातच मनसेच्या वतीने काहींनी मनसे-शिवसेना युती होणार असेच व्हायरल केले आणि मनसेला लागलेली गळती थांबविण्यासाठी त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला. मनसे आणि शिवसेनेत युती होणार असल्याने शिवसेनेत जाणाऱ्यांनो सावधान, तुमची अवस्था घर का ना घाट का अशी होऊ शकते असे त्यात नमूद केले आहे. उभय पक्षात युती झाली तर सेनेत गेलेल्यांना उमेदवारी न देण्याच्या अटीवर युती होऊ शकते, असे नमूद केले आहे. त्याचप्रमाणे युती का होईल याची कारणे पोस्टमध्ये या कार्यकर्त्यांनी नमूद केली असून भाजपा शिवसेनेला चांगली वागणूक देत नाही, प्रादेशिक पक्ष संपविण्याचे भाजपाचे धोरण आहे, त्या विरोधात दोघे बंधू एकत्र येऊ शकतात. त्याचबरोबर शिवसेनेला मुंबईत, तर मनसेला नाशिकमध्ये सत्ता हवी आहे, त्यामुळे युती होऊ शकते असे नमूद करताना चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत दोन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन उमेदवार याप्रमाणे रचना केली जाईल, असेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या अगोदरच मनसेकडूनच युतीची हवा पसरवली जात आहे. (प्रतिनिधी)