शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
4
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
5
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
6
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
7
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
8
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
9
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
10
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
11
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
12
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
13
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
14
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
15
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
16
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
18
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
19
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
20
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई

आता वीस टक्के निधी भूसंपादनासाठी राखीव

By admin | Updated: July 12, 2014 00:25 IST

आता वीस टक्के निधी भूसंपादनासाठी राखीव

नाशिक : शहर विकास आराखडा विकसित करण्यासाठी पालिकेच्या अंदाजपत्रकात आता २० टक्के तरतूद करणे राज्य शासनाने बंधनकारक केले आहे. त्यामुळे पालिकेने सध्याच्या आर्थिक वर्षाचा विचार केला तर किमान साडेतीनशे कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. आर्थिक ओढग्रस्त असलेल्या पालिकेची अशी तरतूद करताना दमछाक होणार आहे.सर्व महापालिकांसाठी शहर विकास आराखडा तयार केला जातो. महापालिकेने या आराखड्यात लोकोपयोगी कारणांसाठी आरक्षित असलेले भूखंड संबंधित भूखंडमालकांना मोबदला देऊन ताब्यात घ्यावे लागतात. आरक्षित भूखंड ताब्यात घेण्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूद केली जात असली तरी ती पुरेशी नसते. साहजिकच आरक्षित भूखंड ताब्यात घेण्यात कालहरण होते आणि अनेक भूखंड तर आराखडा अंमलबजावणीच्या कालावधीत ताब्यात न घेता आल्याने त्यावरील आरक्षण व्यपगत होते. त्याचा विचार राज्य शासनाने गेल्या फेब्रुवारी महिन्यात पालिकेच्या अंदाजपत्रकाच्या वीस टक्के निधी भूसंपादनासाठी राखीव ठेवावा लागेल असा निर्णय घेतला आहे. नाशिकसह सर्व महापालिकांना त्यासाठी तरतूद करावी लागणार आहे.नाशिक महापालिकेचा विचार केला तर आजवर अंदाजपत्रकात वीस ते पंचवीस कोटी रुपयांची तरतूद केली जात होती. गेल्यावर्षी प्रथमच सुमारे ८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आणि ती खर्चीही पडली आहे. तथापि, अंदाजपत्रकाच्या आकारमानानुसार ती कमीच आहे. चालू आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक लक्षात घेतले तर आयुक्तांनी सुमारे १८०० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले होते. त्याच्या वीस टक्के तरतूद म्हटली तरी आता पालिकेला ३६० कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. तथापि, एवढ्या मोठ्या रकमेची तरतूद करण्यात आलेली नाही. सद्यस्थितीत भांडवली कामांसाठीच पुरेसा निधी नसताना इतकी मोठी रक्कम भूसंपादनासाठी कशी उपलब्ध होणार, असा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)