शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना वेतनकपातीच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:11 IST

नांदगावसह ५६ गाव पाणीपुरवठा योजनेवर जिल्हा परिषदेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही त्याप्रमाणात वसुली होत नसल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये करण्यात आलेल्या ठरावानुसार ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कर्मचाऱ्यांना वसुली न केल्यास ५० टक्केवेतनकपात करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.

ठळक मुद्देपाणीपट्टी वसुली : ग्रामपंचायतींकडे ११ कोटी थकीत

नाशिक : नांदगावसह ५६ गाव पाणीपुरवठा योजनेवर जिल्हा परिषदेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही त्याप्रमाणात वसुली होत नसल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये करण्यात आलेल्या ठरावानुसार ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कर्मचाऱ्यांना वसुली न केल्यास ५० टक्केवेतनकपात करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. दुसरीकडे या कर्मचाºयांनी आपण तांत्रिक कर्मचारी असून, पाणीपट्टी वसुलीचे आमचे काम नसल्याचा दावा करून, सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळावे, अशी मागणी केली आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने नांदगावसह ५६ गाव पाणीपुरवठा, दाभाडी व १२ गावे, देवळा व दहा गावे अशा तीन योजना राबविल्या जात असून, या तिन्ही योजनांपोटी ११ कोटी ३४ लाखांची पाणीपट्टी नांदगाव नगरपालिका, दाभाडी व देवळ्याच्या ज्या ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा केला जातो त्यांच्याकडे थकली आहे. दरवर्षी थकबाकीची रक्कम वाढत जात असल्याने त्याचा बोजा जिल्हा परिषदेवर पडत आहे. दरवर्षी जिल्हा परिषदेकडून सात ते दहा कोटी या योजनेवर खर्च केले जातात, परंतु वसुली होत नसल्याने जिल्हा परिषदेचे नुकसान होत असल्याची भावनासभेत सदस्यांनी वेळोवेळी व्यक्त केली होती.कर्मचाºयांचे जि.प. अध्यक्षांना निवेदनमंगळवारी कर्मचाºयांनी एकत्र येत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना निवेदन दिले असून, त्यात पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन, व्हॉल्व्ह, एअर व्हॉल्व्ह व विविध कामांची देखभाल, दुरुस्ती करण्याचे काम नियमित करीत आहेत. त्याचबरोबर संबंधित ग्रामपंचायतींना वेळोवेळी भेट देत पाणीपट्टी वसुलीबाबत ग्रामपंचायत ग्रामसेवक, सरपंचांना जाणीव करून दिले जाते. सदरचे कर्तव्य स्वत:हून बजावत असल्यामुळे वेतन कपात करू नये, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकzpजिल्हा परिषद