शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

बागलाण तालुक्यात एक हजार बोगस लाभार्थींना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 20:38 IST

सटाणा : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या बागलाणमधील तब्बल १ हजार ३७ शेतकऱ्यांना संबंधित विभागाने अपात्र ठरविले असून, त्यांना एकूण एक कोटी ५४ हजार रुपये वसुलीच्या नोटिसा बजावल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देपीएम किसान सन्मान निधी योजनेची एक कोटीची वसुली

नितीन बोरसेसटाणा : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या बागलाणमधील तब्बल १ हजार ३७ शेतकऱ्यांना संबंधित विभागाने अपात्र ठरविले असून, त्यांना एकूण एक कोटी ५४ हजार रुपये वसुलीच्या नोटिसा बजावल्याने एकच खळबळ उडाली आहे.शासनाने सन २०१९ मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबास वार्षिक तीन समान हप्त्यांमध्ये ६००० रुपयांचे अनुदान देण्यात येते. बागलाण तालुक्यात तब्बल एक लाखाहून अधिक खातेदार शेतकरी आहेत. त्यापैकी ५८ हजार शेतकऱ्यांना शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ मिळाला आहे.या योजनेचा सर्वाधिक फायदा कोरोनाच्या महासंकट काळात गरीब शेतकऱ्यांना मिळाला. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना ही योजना दिलासादायक ठरली. दरम्यान, ऐन दिवाळीच्या तोंडावर महसूल यंत्रणेने अचानक बागलाण तालुक्यातील १ हजार ३७ लाभार्थी शेतकऱ्यांना अपात्र ठरवून वसुलीसाठी नोटीस बजावली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतला; परंतु या योजनेच्या निकषाप्रमाणे लाभ घेतलेले शेतकरी अपात्र असल्याचे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.हे ठरले अपात्र......नोकरदार आहे; परंतु त्यांच्या नावावर शेती असे शेतकरी, सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी अथवा अधिकारी, आयकरदाता, पती-पत्नी दोघांची नोंदणी, बँकेतील एफडी, मयत लाभार्थी अशांना अपात्र ठरविण्यात आले असून, नोटीस बजावल्यानंतर अपात्र शेतकऱ्यांनी पैसे परत न केल्यास उताऱ्यावर बोजा चढविण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. लाभ घेतलेल्या बहुतांश लाभार्थींना नोटीस देऊन अन्याय केला आहे. सुराणे येथील भाऊसाहेब शिवाजी अहिरे यांच्याकडे १ हेक्टर ९६ गुंठे जमीन आहे. त्यांच्या घरात कोणीही नोकरीला नाही किंवा ते आयकरदाता नाहीत, ना कोणत्या बँकेत एफडी केली आहे. असे असताना त्यांना अपात्र ठरवून त्यांच्याकडून १० हजार रुपयांची वसुली केली आहे. ते पात्र असताना कोणतीही चौकशी न करता तलाठ्याकडून त्यांना बोजा चढविण्याची धमकी दिली जात असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.संबंधित विभागाने पीएम किसान सन्मान निधी वसुलीच्या नोटीस दिल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांनी घाबरून न जाता चौकशी करून तांत्रिक बाबींची पूर्तता करावी, जेणेकरून लाभ घेता येईल. संबंधित अधिकाऱ्यांनी देखील त्यासाठी सहकार्य करावे.- दिलीप बोरसे, अमदारपीएम किसान सन्मान निधीच्या अपात्रतेबाबत संबंधित विभागानेच महसूल यंत्रणेला याद्या सादर केल्या आहेत. त्यानुसार कारवाई केली जात आहे. ज्या कोणी शेतकऱ्यांवर अन्यायकारक कारवाई होत असले अशा शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.- जितेंद्र इंगळे पाटील, तहसीलदार, बागलाणअपात्र लाभार्थी २०३ झ्र वसुलीची रक्कम १६ लाख ६८ हजारआयकरदाता ८३४ झ्र वसुलीची रक्कम ८३ लाख ८६ हजार

 

 

टॅग्स :Governmentसरकारagricultureशेती