शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

नोटबंदीचा फटका सर्वसामान्यांनाच बसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 02:23 IST

देशातील काळा पैसा बाहेर येईल, असे सांगत केंद्र शासनाच्या नोटबंदीचा फटका केवळ सर्वसामान्यांना बसला. यामधून मात्र कोणत्याही प्रकारचा काळा पैसा बाहेर निघाला नसल्याने नोटबंदी पूर्णत: फसवी आणि त्रासदायक ठरली असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. शहरातील शनि पटांगणावर शुक्रवारी सायंकाळी उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या ‘हल्लाबोल’ मोर्चाला सुरुवात झाली त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, नबाब मलिक आदी राज्यस्तरीय नेते उपस्थित होते.

येवला : देशातील काळा पैसा बाहेर येईल, असे सांगत केंद्र शासनाच्या नोटबंदीचा फटका केवळ सर्वसामान्यांना बसला. यामधून मात्र कोणत्याही प्रकारचा काळा पैसा बाहेर निघाला नसल्याने नोटबंदी पूर्णत: फसवी आणि त्रासदायक ठरली असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. शहरातील शनि पटांगणावर शुक्रवारी सायंकाळी उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या ‘हल्लाबोल’ मोर्चाला सुरुवात झाली त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, नबाब मलिक आदी राज्यस्तरीय नेते उपस्थित होते.  येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने फसव्या सरकारचा सार्वत्रिक निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत खासदार सुळे यांनी सरकारवर विविध धोरणे आणि मुद्द्यांवरून घणाघाती हल्ला चढवला. येवल्यातील शनि पटांगण संपूर्ण भरले होते. खासदार सुळे म्हणाल्या, हे सरकार शेतकरी, कष्टकरी आणि जनतेला दु:खाच्या खाईत लोटण्यासह राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्यावर सूड उगवत आहे. भुजबळ यांच्यावर २२ महिने अन्याय करणाºया सरकारला नियती व जनता कधीच माफ करणार नाही, असे त्या म्हणाल्या.‘महाराष्ट्रात कॉपी जमणार नाही’डिजिटल इंडियामागे धावणे बंद करा, असे आवाहन करून सुप्रिया सुळे म्हणाल्या, गुजरातमध्ये भाजपा कॉपी करून पास झाले. जनतेलाच अडचणीत आणणाºया भाजपा सरकारला महाराष्ट्रात जनता कॉपी करू देणार नाही, असेही त्या म्हणाल्या.च्महाराष्टÑाचे भाग्यविधाते यशवंतराव चव्हाण आणि राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आदर्श आणि शिकवण जमेल तेवढे करा, जमेल तेच जनतेला सांगा, यावर आम्ही वाटचाल करणार आहोत. उगीच फसवणूक करण्याचा आपला धर्म नाही. ही शिकवण घेऊन राष्ट्रवादी काम करीत आहे. भाजपासारखी जनतेची दिशाभूल करीत सत्ता मिळवण्याची आमची संस्कृती नाही. सर्वसामान्यांना अडचणीत आणणारे सरकार जनताच खाली खेचेल, असा विश्वास सुळे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस