शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
6
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
7
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
8
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
9
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
10
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
11
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
12
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
13
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
14
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
15
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
16
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
17
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
18
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
19
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
20
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
Daily Top 2Weekly Top 5

नोटबंदीचा फटका सर्वसामान्यांनाच बसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 02:23 IST

देशातील काळा पैसा बाहेर येईल, असे सांगत केंद्र शासनाच्या नोटबंदीचा फटका केवळ सर्वसामान्यांना बसला. यामधून मात्र कोणत्याही प्रकारचा काळा पैसा बाहेर निघाला नसल्याने नोटबंदी पूर्णत: फसवी आणि त्रासदायक ठरली असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. शहरातील शनि पटांगणावर शुक्रवारी सायंकाळी उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या ‘हल्लाबोल’ मोर्चाला सुरुवात झाली त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, नबाब मलिक आदी राज्यस्तरीय नेते उपस्थित होते.

येवला : देशातील काळा पैसा बाहेर येईल, असे सांगत केंद्र शासनाच्या नोटबंदीचा फटका केवळ सर्वसामान्यांना बसला. यामधून मात्र कोणत्याही प्रकारचा काळा पैसा बाहेर निघाला नसल्याने नोटबंदी पूर्णत: फसवी आणि त्रासदायक ठरली असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. शहरातील शनि पटांगणावर शुक्रवारी सायंकाळी उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या ‘हल्लाबोल’ मोर्चाला सुरुवात झाली त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, नबाब मलिक आदी राज्यस्तरीय नेते उपस्थित होते.  येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने फसव्या सरकारचा सार्वत्रिक निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत खासदार सुळे यांनी सरकारवर विविध धोरणे आणि मुद्द्यांवरून घणाघाती हल्ला चढवला. येवल्यातील शनि पटांगण संपूर्ण भरले होते. खासदार सुळे म्हणाल्या, हे सरकार शेतकरी, कष्टकरी आणि जनतेला दु:खाच्या खाईत लोटण्यासह राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्यावर सूड उगवत आहे. भुजबळ यांच्यावर २२ महिने अन्याय करणाºया सरकारला नियती व जनता कधीच माफ करणार नाही, असे त्या म्हणाल्या.‘महाराष्ट्रात कॉपी जमणार नाही’डिजिटल इंडियामागे धावणे बंद करा, असे आवाहन करून सुप्रिया सुळे म्हणाल्या, गुजरातमध्ये भाजपा कॉपी करून पास झाले. जनतेलाच अडचणीत आणणाºया भाजपा सरकारला महाराष्ट्रात जनता कॉपी करू देणार नाही, असेही त्या म्हणाल्या.च्महाराष्टÑाचे भाग्यविधाते यशवंतराव चव्हाण आणि राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आदर्श आणि शिकवण जमेल तेवढे करा, जमेल तेच जनतेला सांगा, यावर आम्ही वाटचाल करणार आहोत. उगीच फसवणूक करण्याचा आपला धर्म नाही. ही शिकवण घेऊन राष्ट्रवादी काम करीत आहे. भाजपासारखी जनतेची दिशाभूल करीत सत्ता मिळवण्याची आमची संस्कृती नाही. सर्वसामान्यांना अडचणीत आणणारे सरकार जनताच खाली खेचेल, असा विश्वास सुळे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस