शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

नोटबंदीचा फटका सर्वसामान्यांनाच बसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 02:23 IST

देशातील काळा पैसा बाहेर येईल, असे सांगत केंद्र शासनाच्या नोटबंदीचा फटका केवळ सर्वसामान्यांना बसला. यामधून मात्र कोणत्याही प्रकारचा काळा पैसा बाहेर निघाला नसल्याने नोटबंदी पूर्णत: फसवी आणि त्रासदायक ठरली असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. शहरातील शनि पटांगणावर शुक्रवारी सायंकाळी उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या ‘हल्लाबोल’ मोर्चाला सुरुवात झाली त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, नबाब मलिक आदी राज्यस्तरीय नेते उपस्थित होते.

येवला : देशातील काळा पैसा बाहेर येईल, असे सांगत केंद्र शासनाच्या नोटबंदीचा फटका केवळ सर्वसामान्यांना बसला. यामधून मात्र कोणत्याही प्रकारचा काळा पैसा बाहेर निघाला नसल्याने नोटबंदी पूर्णत: फसवी आणि त्रासदायक ठरली असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. शहरातील शनि पटांगणावर शुक्रवारी सायंकाळी उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या ‘हल्लाबोल’ मोर्चाला सुरुवात झाली त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, नबाब मलिक आदी राज्यस्तरीय नेते उपस्थित होते.  येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने फसव्या सरकारचा सार्वत्रिक निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत खासदार सुळे यांनी सरकारवर विविध धोरणे आणि मुद्द्यांवरून घणाघाती हल्ला चढवला. येवल्यातील शनि पटांगण संपूर्ण भरले होते. खासदार सुळे म्हणाल्या, हे सरकार शेतकरी, कष्टकरी आणि जनतेला दु:खाच्या खाईत लोटण्यासह राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्यावर सूड उगवत आहे. भुजबळ यांच्यावर २२ महिने अन्याय करणाºया सरकारला नियती व जनता कधीच माफ करणार नाही, असे त्या म्हणाल्या.‘महाराष्ट्रात कॉपी जमणार नाही’डिजिटल इंडियामागे धावणे बंद करा, असे आवाहन करून सुप्रिया सुळे म्हणाल्या, गुजरातमध्ये भाजपा कॉपी करून पास झाले. जनतेलाच अडचणीत आणणाºया भाजपा सरकारला महाराष्ट्रात जनता कॉपी करू देणार नाही, असेही त्या म्हणाल्या.च्महाराष्टÑाचे भाग्यविधाते यशवंतराव चव्हाण आणि राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आदर्श आणि शिकवण जमेल तेवढे करा, जमेल तेच जनतेला सांगा, यावर आम्ही वाटचाल करणार आहोत. उगीच फसवणूक करण्याचा आपला धर्म नाही. ही शिकवण घेऊन राष्ट्रवादी काम करीत आहे. भाजपासारखी जनतेची दिशाभूल करीत सत्ता मिळवण्याची आमची संस्कृती नाही. सर्वसामान्यांना अडचणीत आणणारे सरकार जनताच खाली खेचेल, असा विश्वास सुळे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस